Mohammed Shami: मोहम्मद शमीला करावी लागली पायाची सर्जरी, तब्येतीबाबत दिले हे अपडेट

मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी(mohammad shami) बऱ्याच दिवसांपासून क्रिकेटपासून दूर आहे. तो वर्ल्डकप २०२३ नंतर टीम इंडियामध्ये दिसला नाही. शमीला दुखापत झाली होते. त्यामुळे तो खूप त्रस्त होता.


दरम्यान, मोहम्मद शमीने तब्येतीबाबतचे ताजे अपडेट सोशल मीडियाद्वारे शेअऱ केले आहेत. शमीने सोशल मीडियावर सांगितले की त्याच्या पायाचे ऑपरेशन झाले आहे. ही सर्जरी यशस्वी झाली. शमीने हॉस्पिटलमधील काही फोटो शेअरही केले आहे.


शमीने फोटो शेअर करताना म्हटले की, नुकतेच माझ्या टाचेचे ऑपरेशन झाले आहे. ठीक होण्यासाठी वेळ लागेल. मात्र लवकरच मी माझ्या पायावर उभा राहीन'. शमीच्या पायाला दुखापत झाली होती. यामुळे तो बऱ्याच काळापासून टीम इंडियातून बाहेर होता. शमीच्या पुनरागमनाला आता अधिक वेळ लागेल. शमीला इंडियन प्रीमियर लीग २०२४मध्ये खेळता येणार नाही. त्याच्या दुखापतीमुळे गुजरात टायटन्सला मात्र मोठे नुकसान होणार आहे.


 

 



शमीने भारतासाठीचा शेवटचा वनडे सामना नोव्हेंबर २०२३मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता. हा वर्ल्डकपमधील फायनल सामना होता. या सामन्यात टीम इंडियाला ६ विकेटनी पराभव सहन करावा लागला होता. या सामन्यात शमीने एक विकेट घेतला होता. तर या वर्ल्डकपमध्ये शमी सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला होता. त्याने ७ सामन्यात २४ विकेट घेतल्या होत्या.
Comments
Add Comment

T - 20 world Cup : खेळाडूवर दुःखाचा डोंगर; रिंकू नंतर आणखी एका खेळाडूच्या वडिलांचे निधन

मुंबई : वर्ल्ड कपचा अंतिम सामना जसजसा जवळ येऊ लागला आहे, तसतशी प्रेक्षकांमध्ये सामन्याबद्दलची उत्सुकता वाढली

Smriti Mandhana : कौतुकास्पद! स्मृती मानधना पुन्हा ठरली आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत अव्वल

आयसीसी क्रमवारीमध्ये भारतीय महिला संघाची उपकर्णधार स्मृती मानधना एकदिवसीय फलंदाजांमध्ये अव्वल स्थानावर

CSK New Jersey : चेन्नई सुपर किंग्जच्या नव्या जर्सीचे अनावरण

पाच वेळा विजेत्या चेन्नई सुपर किंग्जने म्हणजेच सीएसकेने आयपीएल २०२६ च्या आधी त्यांची नवीन जर्सीचे अनावरण केले

T20 World Cup 2026 Ind vs WI : वेस्ट इंडिज विरुद्धच्या विजयी खेळीनंतर संजू सॅमसन भावुक

टी-२० विश्वचषकामध्ये सुपर ८ च्या एका महत्त्वाच्या सामन्यात वेस्ट इंडिजला पाच विकेट्सनी पराभूत करत भारताने

IND vs WI: एका ओव्हरमध्येच सगळंच बदललं; भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यात सर्वात मोठा टर्निंग पॉईंट कधी झाला?

मुंबई : भारताने दक्षिण आफ्रिका संघाचा पाच विकेटने पराभव करत सेमी फायनलमध्ये आपली जागा निश्चित केली आहे.

संजूची बॅट तळपली, टीम इंडिया उपांत्य फेरीत पोहोचली

कोलकाता : ईडन गार्डनवर झालेल्या सुपर आठ फेरीतल्या वेस्ट इंडिज विरूद्धच्या सामन्यात भारत पाच विकेट राखून जिंकला.