Mann Ki Baat: पुढील तीन महिने 'मन की बात' होणार नाही, खुद्द पंतप्रधान मोदींनी सांगितले कारण

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी(pm narendra modi) रविवारी आपला मासिक रेडिओ कार्यक्रम मन की बात(mann ki baat)च्या ११०व्या एपिसोडच्या माध्यमातून लोकांना संबोधित केले. या दरम्यान पंतप्रधानांनी तीन लोकांशी फोनवर बातचीतही केली. तसेच विविध सरकारी योजनांबद्दलचा त्यांचा अनुभव जाणून घेतला. पंतप्रधान मोदींनी यावेळी प्राकृतिक शेतीचे महत्त्व रेखांकित करताना केमिकलने आपल्या धरती मातेला जो त्रास होत आहे तो वाचवण्यासाठी मातृसंस्थेचे मोठे योगदान होत आहे. देशातील कोपऱ्याकोपऱ्याक महिला आता नैसर्गिक शेतीचा विस्तार करत आहेत.



पुढील तीन महिन्यांपर्यंत 'मन की बात'ला ब्रेक


पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले की ते पुढील तीन महिने आता मन की बातचा कार्यक्रम करणार नाहीत. मन की बातमध्ये देशाची सामूहिक शक्ती तसेच मिळालेल्या यशाबद्दल चर्चा होत असे. हा एक प्रकारचा जनतेचा, जनतेसाठी आणि जनतेद्वारे तयार होणारा कार्यक्रम आहे. आता पुढील तीन महिने मन की बातचे प्रसारण होणार नाही.


पंतप्रधान मोदी म्हणाले, देशात लोकसभा निवडणुकीचा माहौल आहे. त्यामुळे जे गेल्यावेळेस झाले होते त्याप्रमाणे मार्च महिन्यात आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. मन की बातमध्ये देशाच्या सामूहिक शक्तीबद्दल बोलले जाते. देशाच्या यशाबद्दल बोलले जाते.


हा एक प्रकारचा जनतेचा, जनतेसाठी आणि जनतेने तयार केलेला कार्यक्रम आहे. मात्र तरीही राजकीय मर्यादेचे पालन करताना लोकसभा निवडणुकीच्या या दिवसांमध्ये पुढील ३ महिने मन की बातचे प्रसारण होणार नाही. आता मन की बातमध्ये संवाद होईल तो मन की बातच्या १११व्या एपिसोडमध्ये. पुढील वेळेस मन की बातची सुरूवात १११ या शुभ अंकांनी झाली तर यापेक्षा चांगले काय असणार आहे.

Comments
Add Comment

२८ फेब्रुवारीपासून आखाती देशांमधून किती भारतीय परतले ?, परराष्ट्र मंत्रालयाकडून खुलासा

नवी दिल्ली: अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर बदललेल्या परिस्थितीत, आखाती देशांमधून मोठ्या

भारताकडून कठोर शब्दांत पाकिस्तानच्या हवाई हल्ल्याचा निषेध

- गुन्हेगारी कृत्याच्या दोषींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी पाकिस्तानकडून काबुलमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यात

'Nanda Devi' Ship : तब्बल ४६,५०० मेट्रिक टनहुन अधिक एलपीजी घेऊन ‘नंदा देवी’ जहाज भारतात दाखल

‘शिवालिक’नंतर आणखी एक एलपीजी टँकर भारतात दाखल झाला आहे. ‘नंदा देवी’ हे जहाज आज म्हणजेच मंगळवार १७ मार्च रोजी

एनआयएची मोठी कारवाई, युक्रेनच्या सहा आणि अमेरिकेच्या एका नागरिकाला अटक

नवी दिल्ली : कोलकाता विमानतळ येथे अमेरिकन नागरिकाला तर लखनऊ विमानतळ आणि दिल्ली विमानतळ येथे प्रत्येकी तीन

West Bengal ED Raid : पश्चिम बंगालमध्ये ईडीअँक्शन मोडवर; एकूण १० ठिकाणी छापेमारी

- अवैध कॉल सेंटरद्वारे फसवणुकीचे प्रकरण पश्चिम बंगालमध्ये अंमलबजावणी संचनालयाने (ईडी) सोमवारी (१६ मार्च) मोठी

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक, भाजपची १४४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने १४४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. शुभेंदू अधिकारी