Mann Ki Baat: पुढील तीन महिने 'मन की बात' होणार नाही, खुद्द पंतप्रधान मोदींनी सांगितले कारण

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी(pm narendra modi) रविवारी आपला मासिक रेडिओ कार्यक्रम मन की बात(mann ki baat)च्या ११०व्या एपिसोडच्या माध्यमातून लोकांना संबोधित केले. या दरम्यान पंतप्रधानांनी तीन लोकांशी फोनवर बातचीतही केली. तसेच विविध सरकारी योजनांबद्दलचा त्यांचा अनुभव जाणून घेतला. पंतप्रधान मोदींनी यावेळी प्राकृतिक शेतीचे महत्त्व रेखांकित करताना केमिकलने आपल्या धरती मातेला जो त्रास होत आहे तो वाचवण्यासाठी मातृसंस्थेचे मोठे योगदान होत आहे. देशातील कोपऱ्याकोपऱ्याक महिला आता नैसर्गिक शेतीचा विस्तार करत आहेत.



पुढील तीन महिन्यांपर्यंत 'मन की बात'ला ब्रेक


पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले की ते पुढील तीन महिने आता मन की बातचा कार्यक्रम करणार नाहीत. मन की बातमध्ये देशाची सामूहिक शक्ती तसेच मिळालेल्या यशाबद्दल चर्चा होत असे. हा एक प्रकारचा जनतेचा, जनतेसाठी आणि जनतेद्वारे तयार होणारा कार्यक्रम आहे. आता पुढील तीन महिने मन की बातचे प्रसारण होणार नाही.


पंतप्रधान मोदी म्हणाले, देशात लोकसभा निवडणुकीचा माहौल आहे. त्यामुळे जे गेल्यावेळेस झाले होते त्याप्रमाणे मार्च महिन्यात आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. मन की बातमध्ये देशाच्या सामूहिक शक्तीबद्दल बोलले जाते. देशाच्या यशाबद्दल बोलले जाते.


हा एक प्रकारचा जनतेचा, जनतेसाठी आणि जनतेने तयार केलेला कार्यक्रम आहे. मात्र तरीही राजकीय मर्यादेचे पालन करताना लोकसभा निवडणुकीच्या या दिवसांमध्ये पुढील ३ महिने मन की बातचे प्रसारण होणार नाही. आता मन की बातमध्ये संवाद होईल तो मन की बातच्या १११व्या एपिसोडमध्ये. पुढील वेळेस मन की बातची सुरूवात १११ या शुभ अंकांनी झाली तर यापेक्षा चांगले काय असणार आहे.

Comments
Add Comment

Street Dogs: भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांवर सर्वोच्च न्यायालयाचा कडक निर्णय, खाऊ घालणाऱ्यांनाही जबाबदार ठरवणार

नवी दिल्ली: देशभरात रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांचे हल्ल्याचे प्रकरण वाढताना दिसत आहेत यावर सर्वोच्च

Bhopal News: कारमध्ये अडकलेला दीड वर्षांचा चिमुकला,अन् आई वडील शॅापिंगला गेले,पुढे असं घडलं...

भोपाळ :मध्य प्रदेशातील छिंदवाडा शहरात संध्याकाळच्या सुमारास पाया खालची जमीन हलवणारी घटना घडली. पालकांच्या

Crime News: रात्री हलवा खाल्ला अन् सकाळी उठलेच नाही..तिघांचा मृत्यु,घडली विचीत्र घटना..!

चंदीगड : हरियाणातील फरिदाबादच्या सरूरपूर भागात एक भयंकर व पाय खालची जमीन हलवणारी घटना घडली आहे. एका कुटुंबातील

Madhya Pradesh News : मुस्लिम मुलीच्या पायावर पाय पडला अन्....मध्य प्रदेशात मारहाण, लाठीमार आणि महामार्गावर चक्काजाम

खरगोन : मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यात एका मुस्लिम मुलीच्या पायावर पाय पडण्यावरून झालेल्या वादाचे रूपांतर

Sabarimala Temple : सबरीमाला मंदिरात तूप विक्रीत लाखो रुपयांचा महाघोटाळा! केरळ उच्च न्यायालयाचे कठोर पाऊल; एका महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश

तिरुअनंतपुरम : केरळमधील जगप्रसिद्ध सबरीमाला मंदिरात सोन्याच्या दरोड्यानंतर आता 'तूप घोटाळा' समोर आल्याने खळबळ

जर्मनीच्या कैदेत असलेल्या अरिहासाठी आईने ओलांडली भाषेची भिंत

लेकीला परत आणण्यासाठी आई-वडिलांचा ४० महिन्यांपासून लढा नवी दिल्ली : आपल्या काळजाच्या तुकड्याला, पाच वर्षांच्या