Mann Ki Baat: पुढील तीन महिने 'मन की बात' होणार नाही, खुद्द पंतप्रधान मोदींनी सांगितले कारण

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी(pm narendra modi) रविवारी आपला मासिक रेडिओ कार्यक्रम मन की बात(mann ki baat)च्या ११०व्या एपिसोडच्या माध्यमातून लोकांना संबोधित केले. या दरम्यान पंतप्रधानांनी तीन लोकांशी फोनवर बातचीतही केली. तसेच विविध सरकारी योजनांबद्दलचा त्यांचा अनुभव जाणून घेतला. पंतप्रधान मोदींनी यावेळी प्राकृतिक शेतीचे महत्त्व रेखांकित करताना केमिकलने आपल्या धरती मातेला जो त्रास होत आहे तो वाचवण्यासाठी मातृसंस्थेचे मोठे योगदान होत आहे. देशातील कोपऱ्याकोपऱ्याक महिला आता नैसर्गिक शेतीचा विस्तार करत आहेत.



पुढील तीन महिन्यांपर्यंत 'मन की बात'ला ब्रेक


पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले की ते पुढील तीन महिने आता मन की बातचा कार्यक्रम करणार नाहीत. मन की बातमध्ये देशाची सामूहिक शक्ती तसेच मिळालेल्या यशाबद्दल चर्चा होत असे. हा एक प्रकारचा जनतेचा, जनतेसाठी आणि जनतेद्वारे तयार होणारा कार्यक्रम आहे. आता पुढील तीन महिने मन की बातचे प्रसारण होणार नाही.


पंतप्रधान मोदी म्हणाले, देशात लोकसभा निवडणुकीचा माहौल आहे. त्यामुळे जे गेल्यावेळेस झाले होते त्याप्रमाणे मार्च महिन्यात आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. मन की बातमध्ये देशाच्या सामूहिक शक्तीबद्दल बोलले जाते. देशाच्या यशाबद्दल बोलले जाते.


हा एक प्रकारचा जनतेचा, जनतेसाठी आणि जनतेने तयार केलेला कार्यक्रम आहे. मात्र तरीही राजकीय मर्यादेचे पालन करताना लोकसभा निवडणुकीच्या या दिवसांमध्ये पुढील ३ महिने मन की बातचे प्रसारण होणार नाही. आता मन की बातमध्ये संवाद होईल तो मन की बातच्या १११व्या एपिसोडमध्ये. पुढील वेळेस मन की बातची सुरूवात १११ या शुभ अंकांनी झाली तर यापेक्षा चांगले काय असणार आहे.

Comments
Add Comment

Kashi Vishwanath Vedic Clock : टिक-टिक नव्हे, आता मुहूर्तात वेळ! काशीत ‘वैदिक घड्याळ’ची एंट्री!

वाराणसी : उत्तर प्रदेशातील जगप्रसिद्ध काशी विश्वनाथ मंदिर (Kashi Vishwnath Temple) आता केवळ अध्यात्माचेच नव्हे, तर भारताच्या

Ramdas Athawale: केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज्यसभा खासदार पदाची केली हॅट्ट्रिक

मुंबई: रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची तिस-यांदा

Delhi: हातात पुष्पगुच्छ घेऊन थेट शिरला विधानसभेत, अध्यक्षांच्या गाडीजवळ फुलांचा गुच्छ ठेवला अन्...

नवी दिल्ली: दिल्ली विधानसभेत सुरक्षेचा मोठा भंग झाल्याचे वृत्त आहे. एका वाहनाने बॅरियर तोडून गेट क्रमांक २ मधून

Umpire Killed Over Run-Out Argument : विशाखापट्टणम हादरलं! रनआऊट दिलं म्हणून थेट अंपायरचीच केली हत्या

विशाखापट्टणम येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेने क्रीडा क्षेत्र हादरले आहे. स्थानिक स्तरावर सुरू असलेल्या

Crime News : पाटण्यात माणुसकीला काळीमा; सख्ख्या काकाकडूनच ३ वर्षांच्या चिमुकलीवर सामूहिक बलात्कार

पाटणा : बिहारची राजधानी पाटणामध्ये नात्याला काळिमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. परसा बाजार

Ladakh: लिलावात २५ हजार रुपयांना विकले गेले १० रुपये किमतीचे अंडे; इराणी पीडितांसाठीचा अनोखा उपक्रम चर्चेत

नवी दिल्ली: लडाखमधील लेह जिल्ह्यातील लोक इराणच्या लोकांना मदत करण्यासाठी पुढे आले आहेत. युद्धाच्या काळात