Mann Ki Baat: पुढील तीन महिने 'मन की बात' होणार नाही, खुद्द पंतप्रधान मोदींनी सांगितले कारण

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी(pm narendra modi) रविवारी आपला मासिक रेडिओ कार्यक्रम मन की बात(mann ki baat)च्या ११०व्या एपिसोडच्या माध्यमातून लोकांना संबोधित केले. या दरम्यान पंतप्रधानांनी तीन लोकांशी फोनवर बातचीतही केली. तसेच विविध सरकारी योजनांबद्दलचा त्यांचा अनुभव जाणून घेतला. पंतप्रधान मोदींनी यावेळी प्राकृतिक शेतीचे महत्त्व रेखांकित करताना केमिकलने आपल्या धरती मातेला जो त्रास होत आहे तो वाचवण्यासाठी मातृसंस्थेचे मोठे योगदान होत आहे. देशातील कोपऱ्याकोपऱ्याक महिला आता नैसर्गिक शेतीचा विस्तार करत आहेत.



पुढील तीन महिन्यांपर्यंत 'मन की बात'ला ब्रेक


पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले की ते पुढील तीन महिने आता मन की बातचा कार्यक्रम करणार नाहीत. मन की बातमध्ये देशाची सामूहिक शक्ती तसेच मिळालेल्या यशाबद्दल चर्चा होत असे. हा एक प्रकारचा जनतेचा, जनतेसाठी आणि जनतेद्वारे तयार होणारा कार्यक्रम आहे. आता पुढील तीन महिने मन की बातचे प्रसारण होणार नाही.


पंतप्रधान मोदी म्हणाले, देशात लोकसभा निवडणुकीचा माहौल आहे. त्यामुळे जे गेल्यावेळेस झाले होते त्याप्रमाणे मार्च महिन्यात आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. मन की बातमध्ये देशाच्या सामूहिक शक्तीबद्दल बोलले जाते. देशाच्या यशाबद्दल बोलले जाते.


हा एक प्रकारचा जनतेचा, जनतेसाठी आणि जनतेने तयार केलेला कार्यक्रम आहे. मात्र तरीही राजकीय मर्यादेचे पालन करताना लोकसभा निवडणुकीच्या या दिवसांमध्ये पुढील ३ महिने मन की बातचे प्रसारण होणार नाही. आता मन की बातमध्ये संवाद होईल तो मन की बातच्या १११व्या एपिसोडमध्ये. पुढील वेळेस मन की बातची सुरूवात १११ या शुभ अंकांनी झाली तर यापेक्षा चांगले काय असणार आहे.

Comments
Add Comment

आता 'ईव्हीएम' मतपत्रिकेवर उमेदवारांचे रंगीत फोटो; बिहारमधून सुरुवात

नवी दिल्ली: निवडणुकीदरम्यान मतदारांना स्पष्टता मिळावी आणि गोंधळ कमी व्हावा या उद्देशाने 'भारतीय निवडणूक

'राहुल गांधींनी काढली घुसखोर वाचवा यात्रा'

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त राजधानी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात

लिओनेल मेस्सीने पंतप्रधान मोदींना पाठवली वाढदिवसाची 'ही' खास भेट

नवी दिल्ली: आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशभर ७५ वा वाढदिवस साजरा होत आहे. वेगवेगळ्या

केरळमध्ये 'ब्रेन-इटिंग अमीबा'चा हाहाकार; १८ जणांचा बळी, ही लक्षणे दिसल्यास तातडीने व्हा सावधान!

नवी दिल्ली : केरळमध्ये पुन्हा एकदा 'ब्रेन-इटिंग अमीबा' (Brain-Eating Amoeba) चा धोका वाढला असून, या वर्षी या जीवघेण्या संसर्गाचे

पंतप्रधान मोदींनी वाढदिवसानिमित्त महिलांना दिली खास भेट; सुरु केले 'हे' नवे अभियान

धार: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशातील धार येथे महिलांसाठी 'स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान'ची घोषणा

भारत धमक्यांना घाबरत नाही, घरात घुसून मारतो - पंतप्रधान मोदी

भोपाळ : “हा नवा भारत आहे, तो कोणत्याही अणुबॉम्बच्या धमक्यांपासून घाबरत नाही. हा नवा भारत घरात घुसून मारतो,” असे