Mann Ki Baat: पुढील तीन महिने 'मन की बात' होणार नाही, खुद्द पंतप्रधान मोदींनी सांगितले कारण

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी(pm narendra modi) रविवारी आपला मासिक रेडिओ कार्यक्रम मन की बात(mann ki baat)च्या ११०व्या एपिसोडच्या माध्यमातून लोकांना संबोधित केले. या दरम्यान पंतप्रधानांनी तीन लोकांशी फोनवर बातचीतही केली. तसेच विविध सरकारी योजनांबद्दलचा त्यांचा अनुभव जाणून घेतला. पंतप्रधान मोदींनी यावेळी प्राकृतिक शेतीचे महत्त्व रेखांकित करताना केमिकलने आपल्या धरती मातेला जो त्रास होत आहे तो वाचवण्यासाठी मातृसंस्थेचे मोठे योगदान होत आहे. देशातील कोपऱ्याकोपऱ्याक महिला आता नैसर्गिक शेतीचा विस्तार करत आहेत.



पुढील तीन महिन्यांपर्यंत 'मन की बात'ला ब्रेक


पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले की ते पुढील तीन महिने आता मन की बातचा कार्यक्रम करणार नाहीत. मन की बातमध्ये देशाची सामूहिक शक्ती तसेच मिळालेल्या यशाबद्दल चर्चा होत असे. हा एक प्रकारचा जनतेचा, जनतेसाठी आणि जनतेद्वारे तयार होणारा कार्यक्रम आहे. आता पुढील तीन महिने मन की बातचे प्रसारण होणार नाही.


पंतप्रधान मोदी म्हणाले, देशात लोकसभा निवडणुकीचा माहौल आहे. त्यामुळे जे गेल्यावेळेस झाले होते त्याप्रमाणे मार्च महिन्यात आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. मन की बातमध्ये देशाच्या सामूहिक शक्तीबद्दल बोलले जाते. देशाच्या यशाबद्दल बोलले जाते.


हा एक प्रकारचा जनतेचा, जनतेसाठी आणि जनतेने तयार केलेला कार्यक्रम आहे. मात्र तरीही राजकीय मर्यादेचे पालन करताना लोकसभा निवडणुकीच्या या दिवसांमध्ये पुढील ३ महिने मन की बातचे प्रसारण होणार नाही. आता मन की बातमध्ये संवाद होईल तो मन की बातच्या १११व्या एपिसोडमध्ये. पुढील वेळेस मन की बातची सुरूवात १११ या शुभ अंकांनी झाली तर यापेक्षा चांगले काय असणार आहे.

Comments
Add Comment

रेड फोर्ट स्फोट ‘दहशतवादी हल्ला’ घोषित!

केंद्र सरकारने निषेधाचा ठराव केला नवी दिल्ली : दिल्लीतील ऐतिहासिक रेड फोर्टजवळ झालेल्या कार स्फोटाला केंद्र

पीएम मोदी 'ॲक्शन मोड'मध्ये! भूतानमधून येताच केली बॉम्बस्फोटातील जखमींची विचारपूस, सायंकाळी तातडीची CCS बैठक

सुरक्षेवरील कॅबिनेट समितीच्या बैठकीकडे देशाचे लक्ष नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी (१२ नोव्हेंबर,

Delhi Blast : दिल्ली नव्हे, तर राम मंदिर टार्गेट होतं, लाल किल्ला स्फोटाच्या चौकशीत हादरवणारा खुलासा; दहशतवाद्यांनी राम मंदिरावर...

नवी दिल्ली : दिल्लीतील लाल किल्ला (Red Fort) स्फोटानंतर देशभरात सुरक्षा यंत्रणांनी हाय अलर्ट जारी केला असून, अनेक

लाल किल्ला ब्लास्ट : 'आत्मघाती' नव्हे, 'अपघाती' स्फोट; तपास कुठे पोहोचला? १० पॉइंट्समध्ये जाणून घ्या

नवी दिल्ली : भारताची राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण स्फोटाने केवळ देशातच नव्हे, तर संपूर्ण

एक पोस्टर आणि जम्मू काश्मीर पोलीसांनी केला कट्टरपंथी व्यावसायिकांच्या व्हाईट कॉलर दहशतवादाचा पर्दाफाश! जाणून घ्या सविस्तर घटनाक्रम

नवी दिल्ली: राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या एका मोठ्या दहशतवादी नेटवर्कला उध

धरमशाला येथे २१ महिन्यांनंतर भारत-दक्षिण आफ्रिका टी-२० सामना

नवीन विंटर राई ग्रासने स्टेडियम सजवले धरमशाला : हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनला जवळजवळ २१ महिन्यांनंतर