Ashish Shelar : पत्रकार पोपटलाल यांचा अग्रलेख की हग्रलेख?

आमच्या कामांचं श्रेय घेण्यासाठी आवाज करणार्‍या राजकीय बगळ्यांना मुंबईकरच बाजूला करतील!


भाजपा आमदार आशिष शेलार यांचे उबाठाच्या संजय राऊत व आदित्य ठाकरेंना जबरदस्त टोले


मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) सामनाच्या अग्रलेखातून खालच्या पातळीची भाषा वापरत सत्ताधारी पक्षांवर टीका करतात. काल सामनाच्या अग्रलेखात त्यांनी भाजपा पक्ष (BJP Party) आणि चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्यावर टीका केली. यावर काल भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी 'स्वतःचा पक्ष संपलेल्या लोकांनी भाजपा संपवण्याची भाषा करु नये. संजय राऊतच्या दहा पिढ्या देखील भाजपाला संपवू शकणार नाहीत', अशी टीका केली होती. यानंतर आता भाजपा आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी देखील संजय राऊतांचा चांगलाच समाचार घेतला आहे. राऊतांचा 'पत्रकार पोपटलाल' असा उल्लेख करत आशिष शेलारांनी त्यांना चपराक लगावली आहे.


आशिष शेलार म्हणाले की, पत्रकार पोपटलाल यांचा अग्रलेख आज सामनामध्ये आला आहे. तो अग्रलेख आहे की हग्रलेख आहे? ते रात्री बसतात आणि सकाळी लिहितात. या बांडगुळ पक्षांना दिल्ली भाजपने जागा दाखवली आहे. संजय राऊत आता तुमच्या पक्षाला बैठकीसाठी नॅनो गाडी लागेल, अशी जहरी टीका त्यांनी संजय राऊतांवर केली आहे.



आदित्य ठाकरेंनाही लगावला टोला


आशिष शेलार म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्या सरकारने बाजू नीट लावली नाही. त्यामुळे मराठा आरक्षण गेले होते. मराठा समाजाच्या प्रत्येक मागणीचा सरकार विचार करेल, असेही त्यांनी म्हटले आहे. तसेच आम्ही केलेल्या कामाचे श्रेय घेण्यासाठी काही राजकीय बगळे आवाज काढत आहेत. अशांना बाजूला सारण्यासाठी मुंबईकर तयार आहेत, असा टोला त्यांनी आदित्य ठाकरेंना (Aaditya Thackeray) लगावला आहे.



...त्यावेळी मनोज जरांगे गप्प का?


मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर गंभीर आरोप केले. यावर आशिष शेलार म्हणाले की, 'मराठा समाजाला हे मान्य नाही, ते मान्य नाही, अशी भाषा मराठा समाजाला मान्य नाही. जे बोलतात त्या मागे स्क्रिप्ट कोणाची आहे? मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे ही भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांची भूमिका आहे. उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) काळात आरक्षण गेले त्यावेळी तुम्ही गप्प का बसला? शरद पवार (Sharad Pawar) इतकी वर्षे आरक्षण देऊ शकले नाही त्यावेळी गप्प का बसला? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.


Comments
Add Comment

मुबंईत येत्या मंगळवारपासून तीन दिवस १० टक्के पाणीकपात

मुंबई : मुंबई महानगरपालिकेस पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे, पांजरापूर येथील जलशुद्धीकरण केंद्रातील १०० किलोव्हॅट

भायखळा-सायन स्थानकांदरम्यान पायाभूत कामांसाठी ब्लॉक

मुंबई (प्रतिनिधी) : सायन (शीव) आणि भायखळा अशा दोन रेल्वे स्थानकांवरील पादचारी पुलाच्या कामांसाठी मध्य रेल्वेकडून

पथदर्शी धोरणानुसार मुंबई महापालिकेच्या शाळा १० मजली होणार

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेने आपल्या शाळांच्या जुन्या इमारतींचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेतला आहे.

गोवंडीतील शताब्दी रुग्णालयातही मिळणार महापलिकेच्या शीव रुग्णालयाप्रमाणे आरोग्यसेवा, वैद्यकीय महाविद्यालय बनणार

मुंबई(सचिन धानजी) : मुंबई महापालिकेच्या रुग्णालये खासगी संस्थांना चालवण्यास देण्याचा निर्णय घेत काही

IMD: महाराष्ट्रासाठी 'चक्रीवादळ शक्ती'चा इशारा; ४ ते ७ ऑक्टोबर दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता

पुणे/मुंबई: भारतीय हवामान विभागाने (IMD) अरबी समुद्रात विकसित होत असलेल्या 'चक्रीवादळ शक्ती' च्या पार्श्वभूमीवर

दिवाळीसाठी गावाला जाताय, रेल्वे सोडतेय ३० विशेष गाड्या

दिवाळीनिमित्त अतिरिक्त विशेष गाड्या धावणार मुंबई (प्रतिनिधी) : येत्या दिवाळी उत्सवानिमित्त प्रवाशांच्या