Nitesh Rane on Jarange : जरांगेंच्या स्क्रिप्टला तुतारीचा वास! आमच्या नेतृत्वाला धमक्या दिल्या, तर...

आमदार नितेश राणेंचा मनोज जरांगेना इशारा


मुंबई : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) समाधानी नसून आज त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर आज त्यांनी अत्यंत गंभीर आरोप केले. त्यांनी फडणवीसांना सागर बंगल्यावर येण्याची धमकी दिली. शिवाय माझा बळी सागर बंगल्यावर घ्या, असंही जरांगे म्हणाले. यावर भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मनोज जरांगेंना धमकीवजा इशारा दिला आहे. 'जरांगे-पाटलांनी राजकारण केलं आणि आमच्या नेतृत्वाला धमक्या दिल्या, तर सागर बंगल्याची भिंत ओलांडणं अवघड जाईल', असं नितेश राणे म्हणाले.


नितेश राणे म्हणाले, "जरांगे-पाटलांचा लढा आरक्षणासाठी आहे की फडणवीसांना लक्ष्य करण्यासाठी? त्यांना मराठा समाजाचे प्रश्न सोडवायचे आहेत की फडणवीस यांच्या नावाने राजकारण करायचं आहे? जरांगे-पाटील वाचून दाखवत असलेली स्क्रिप्ट कुणी लिहिली आहे? कारण, या स्क्रिप्टवरून मला तुतारीचा वास येत आहे. हा लढा मराठा समाजासाठी असेल, तर समाजापुरताच मर्यादित ठेवावा. जरांगे-पाटलांनी राजकारण केलं, आमच्या नेतृत्वाला धमक्या दिल्या, तर सागर बंगल्याची भिंत ओलांडणं अवघड जाईल", असा इशारा नितेश राणे यांनी दिला.


पुढे नितेश राणे म्हणाले, "मराठा समाजाला १० टक्के आरक्षण मिळालं आहे. आता कोर्टात जी लढाई लढली जाणार आहे. त्यासाठी सर्वात मोठा आधार देवेंद्र फडणवीस यांचा मिळणार आहे. आमच्या सरकारने दिलेलं आरक्षण मराठा समाजाने स्वीकारलं आहे. जरांगे-पाटलांचं समाधान होत नसल्याने ते फडणवीसांवर टीका करत आहेत. मनोज जरांगे सागर बंगल्यावर येणार तर आम्ही काय गप्प बसणार का? आम्ही मराठेही येथे उभे आहोत,"


राजकारण करु नका. सगेसोयऱ्यांची मागणी आहे तर त्यावर मार्ग निघेल पण उठ सुठ फडणवीसांवर टीका करता, धमक्या देता, तर सागर बंगल्याआधी आमची भिंत आहे, आधी ती क्रॉस करुन दाखवा, मग पुढचं पुढे बघू, असा इशारा देखील नितेश राणे यांनी दिला.



मनोज जरांगे यांनी काय आरोप केले?


मनोज जरांगे यांनी आजच्या बैठकीत फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. मराठा समाजाला ओबीसमधून आरक्षण मिळू नयेत यासाठी फडणवीस यांच्याकडून षडयंत्र सुरु आहे. त्यांच्याकडून मला फसवण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. माझा बळी घायचा असेल तर मी स्वतःच फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर जातो. फडणवीस यांना आयुष्यातून उठवून टाकील असंही जरांगे म्हणाले आहेत. विशेष म्हणजे व्यासपीठावरून उठून जरांगे थेट मुंबईच्या दिशेने निघाले. जमलेल्या मराठा समाजाने त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला, मात्र ते शांत होत नव्हते आणि एकच गोंधळ उडाला.


Comments
Add Comment

FDA Inspections : गणेशोत्सवात महाप्रसादासाठी लागणार परवाना

- भंडाऱ्यावरही असणार ‘एफडीए’ची नजर मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांततर्फे

Pratap Sarnaik : ‘रॅपिडो’शी व्यावसायिक संबंधांचे पुरावे द्या!

- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे संजय राऊतांना प्रत्युत्तर; प्रत्येक गोष्टीला राजकीय रंग देणे योग्य

Nepal floods : नेपाळमधील पूरपरिस्थितीत नांदेडचे पर्यटक अडकले; मदतीसाठी जिल्हा प्रशासनाने जारी केले तात्काळ संपर्क क्रमांक

नांदेड : नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या भीषण पूरस्थितीमुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले

CM Devendra Fadnavis : गडचिरोलीच्या विकासाला नवी दिशा; ‘ग्रीन स्टील हब’ म्हणून उदयास येणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : गडचिरोली जिल्हा निर्मितीला २६ ऑगस्ट रोजी ४४ वर्षे पूर्ण होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

CM Devendra Fadnavis : चाकण ‘एमआयडीसी’मध्ये ४९ उद्योगांसोबत सामंजस्य करार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती; २ हजार ३२० कोटींची गुंतवणूक प्रस्तावित मुंबई : चाकण-भोसरीच्या

Sunetra Pawar : चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे निर्देश

पुणे : चाकण परिसरातील अनेक समस्या वर्षानुवर्षे प्रलंबित असून, त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सर्व