Rahul Gandhi : झारखंड हायकोर्टाने राहुल गांधींची याचिका फेटाळत दिला मोठा झटका!

अमित शाहांविरोधात केलेलं वक्तव्य राहुल गांधींना भोवणार


मुंबई : झारखंड उच्च न्यायालयाने (Jharkhand Highcourt) काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची याचिका फेटाळून लावत मोठा झटका दिला आहे. राहुल गांधी यांनी तत्कालीन भाजप प्रमुख आणि विद्यमान गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांना 'हत्येचा आरोपी' म्हणून संबोधल्याबद्दल मानहानीचा (Defamation) खटला रद्द करण्याची मागणी करणारी ती याचिका होती. ती फेटाळून लावल्यामुळे राहुल गांधी यांच्या अडचणी वाढणार आहेत. आता या प्रकरणात राहुल गांधी यांच्याविरोधात कनिष्ठ न्यायालयात खटला चालवला जाणार आहे.


या आठवड्याच्या सुरुवातीला राहुल गांधी यांना मानहानीच्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील विशेष न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. त्यांना २५ हजार रुपयांच्या जामीनावर आणि तेवढ्याच रकमेच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला. मात्र, आता त्यांची याचिका झारखंड हायकोर्टाने फेटाळली आहे.



नेमकं प्रकरण काय आहे?


राहुल गांधी यांनी २०१८ साली बेंगळुरू येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विजय मिश्रा यांनी राहुल गांधी विरोधात तक्रार दाखल केली होती. यानंतर त्यांच्यावरोधात मानहानीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. राहुल गांधी यांनी ट्रायल कोर्टमध्ये सुरू असलेली कारवाही रद्द करण्यासाठी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. १६ फेब्रुवारी रोजी राहुल गांधी यांच्याकडून लिखीत बाजू कोर्टात मांडण्यात आली होती. यानंतर जस्टिस अंबुज नाथ यांच्या खंडपीठाने निर्णय राखून ठेवला होता.



यापूर्वी राहुल गांधींना मोदींवरील टिप्पणीदेखील भोवली


यापूर्वी मोदी आडनावाबद्दल अक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी सूरत कोर्टाने राहुल गांधी यांना शिक्षा सुनावली होती. त्याच आधारावर त्यांना लोकसभा सदस्यत्व देखील गमवावे लागले होते. मात्र नंतर सर्वोच्च न्यायालयाने या शिक्षेला स्थगिती दिली आणि त्यानंतर राहुल गांधीची सदस्यता पुन्हा बहाल करण्यात आली होती.

Comments
Add Comment

Hydrogen Train : भारताच्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनला आज हिरवा झेंडा; जाणून घ्या काय आहेत खास वैशिष्ट्ये

जिंद : तब्बल ११० वर्षांपूर्वी, म्हणजेच १९१६ मध्ये ईस्ट इंडिया रेल्वेने (East India Railway) जिंद–पानीपत रेल्वेमार्ग (Railway Line)

India's energy storage : भारताची ऊर्जा साठवणूक क्षमता २०३५-३६ पर्यंत दहा पटींनी वाढणार

नवी दिल्ली : भारताच्या विकासाच्या प्रवासात ऊर्जा क्षेत्राचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. देशाची वाढती वीज गरज आणि

CUTS International : बाईक टॅक्सींसाठी देशव्यापी सुसंगत धोरणाची गरज, 'कट्स इंटरनॅशनल'चा अहवाल

नवी दिल्ली : देशातील बाईक टॅक्सी सेवांसाठी सध्या असलेल्या विसंगत राज्यनिहाय नियमांऐवजी, एक सुसंगत आणि

Jagannath Rath Yatra Stampede : जगन्नाथ रथयात्रेदरम्यान प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती; एकाचा मृत्यू, अनेक जखमी

भुवनेशवर : ओडिसातील पुरी येथे गुरुवारी जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेदरम्यान चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती

Strait of Hormuz : होर्मुज सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर भारतीय नाविकांच्या तैनातीला मनाई

अमेरिका-इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर डीजीएमएचा मोठा निर्णय नवी दिल्ली : अमेरिका आणि इराण यांच्यात वाढलेल्या

Narendra Modi : पंतप्रधान मोदी शुक्रवारी देशातील पहिल्या हायड्रोजन ट्रेनला दाखवणार हिरवा झेंडा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी हरियाणातील जिंद रेल्वे स्थानकावरून जिंद आणि सोनीपत दरम्यान