महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन

मुंबई: महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचे आज पहाटेच्या सुमारास निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. हिंदुजा रुग्णालयात त्यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. गुरूवारी रात्रीच्या वेळेस त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र आयसीयूमध्ये उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू तसेच महाराष्ट्रातील बिगर काँग्रेसी पहिले मुख्यमंत्री अशी त्यांची ओळख होते. गेल्या अनेक वर्षांपासून ते राजकारणापासून दूर होते. त्यांनी आपल्या राजकीय प्रवासादरम्यान अनेक महत्त्वाची पदे भूषवली.

अशी झाली राजकीय कारकीर्द सुरू


सुरूवातीला शिवसेनेकडून ते विधानपरिषदेवर निवडून आले. त्यांनी शिवसेनेकडून मुंबईचे महापौरपदही भू।वले. १९९५मध्ये शिवसेना-भाजप युतीचे सरकार सत्तेत आले आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मनोहर जोशी यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी दिली होती.

मनोहर जोशी यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी माटुंगा पश्चिम, रुपारेल कॉलेजजवळच्या W54 या त्यांच्या निवासस्थानी सकाळी ११ ते दुपारी २ पर्यंत ठेवले जाणार आहे. त्यानंतर अंत्ययात्रा सुरू होईल. दादरच्या स्मशानभूमीत शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील.
Comments
Add Comment

BMC : स्वच्छतेबाबत महापालिकेचा वॉर रुम; महापालिका आयुक्तांनी दिले निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईत स्वच्छतेसंदर्भातील कामकाज प्रभावीपणे होत असल्याच

Gargai Water Project : उबाठाला द्यायचे नाही मुंबईकरांना अतिरक्त पाणी; गारगाई पाणी प्रकल्पाला केला विरोध

- गारगाई पाणी प्रकल्पाला महापालिकेची मंजुरी, बहुमताच्या जोरावर प्रस्ताव मंजूर मुंबई (विशेष

Metro-3 'Aqua Line' : मेट्रो-३ ‘अॅक्वा लाईन’चा प्रवाशांना मोठा दिलासा; विद्यार्थी आणि पर्यटकांसाठी सवलतीच्या दरात पास मिळणार

मुंबई : मुंबईची नवी जीवनवाहिनी ठरणाऱ्या मेट्रो-३ म्हणजेच ‘अॅक्वा लाईन’ने मुंबईकर विद्यार्थी आणि पर्यटकांना एक

Reduce Plastic : तुमचा पहिला टूथब्रश आजही पृथ्वीवर कोठेतरी पडून आहे

प्लास्टिक प्रदूषण कमी करण्यासाठी प्रत्येक घटकाला योगदान द्यावे लागेल: राज्यपाल जिष्णु देव वर्मा देशात दरवर्षी

Green Asha Indian Ship : इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जहाज ‘ग्रीन आशा’ मुंबईत दाखल

- होर्मुझ पार करत १५ हजार टन एलपीजीचा पुरवठा मुंबई : इराण युद्धामुळे निर्माण झालेल्या ऊर्

Mumbai Local : आता बिनधास्त प्रवास करा, महिलांच्या सुरक्षेसाठी रेल्वे सुरक्षा दलानं सुरू केला 'हा' नवा उपक्रम

मुंबई : लोकलमधून प्रवास करणाऱ्या महिलांना आता घाबरण्याची गरज नाही कारण चर्चगेट ते डहाणू दरम्यान लोकलनं प्रवास