महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन

मुंबई: महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचे आज पहाटेच्या सुमारास निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. हिंदुजा रुग्णालयात त्यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. गुरूवारी रात्रीच्या वेळेस त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र आयसीयूमध्ये उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू तसेच महाराष्ट्रातील बिगर काँग्रेसी पहिले मुख्यमंत्री अशी त्यांची ओळख होते. गेल्या अनेक वर्षांपासून ते राजकारणापासून दूर होते. त्यांनी आपल्या राजकीय प्रवासादरम्यान अनेक महत्त्वाची पदे भूषवली.

अशी झाली राजकीय कारकीर्द सुरू


सुरूवातीला शिवसेनेकडून ते विधानपरिषदेवर निवडून आले. त्यांनी शिवसेनेकडून मुंबईचे महापौरपदही भू।वले. १९९५मध्ये शिवसेना-भाजप युतीचे सरकार सत्तेत आले आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मनोहर जोशी यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी दिली होती.

मनोहर जोशी यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी माटुंगा पश्चिम, रुपारेल कॉलेजजवळच्या W54 या त्यांच्या निवासस्थानी सकाळी ११ ते दुपारी २ पर्यंत ठेवले जाणार आहे. त्यानंतर अंत्ययात्रा सुरू होईल. दादरच्या स्मशानभूमीत शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील.
Comments
Add Comment

Mumbai Local Train Fire : ब्रेकिंग : विद्याविहार ते कुर्ल्या दरम्यान लोकलच्या डब्याने घेतला पेट; विद्याविहारहून CSMT कडे जाणारी 'स्लो' लोकल सेवा विस्कळीत

मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या मध्य रेल्वेवर आज ऐन गर्दीच्या वेळी एक थरारक घटना घडली. कुर्ला आणि

राज्यात १५ जानेवारीला सार्वजनिक सुट्टी, शाळा-सरकारी कार्यालये राहणार बंद

मुंबई  : राज्यात सध्या महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडाला आहे. १५ जानेवारी रोजी २९ महापालिकेसाठी

ईव्हीएम सुसज्ज करण्याच्या कामाची राज्य निवडणूक आयुक्तांकडून पाहणी

मुंबई : राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज विल्सन महाविद्यालयास भेट देऊन बृहन्मुंबई महानगरपालिका

पाणंद रस्ते समितीत सह अध्यक्षांसह परिषद सदस्य अन पाच प्रगतशील शेतकरी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय योजना प्रभावी करण्याचे चंद्रशेखर चंद्रशेखर बावनकुळे यांचे

धक्कादायक! बापाचं संतापजनक कृत्य, चोरीच्या संशयावरून पोटच्या मुलाला दिले....

मुंबई : मुंबईच्या गोरेगाव परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गोरेगाव येथे वडिलांनी आपल्याच मुलांना

Ambarnath News : अंबरनाथचे काँग्रेसचे १२ नगरसेवक भाजपच्या वाटेवर; मोठी खळबळ

अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिकेच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली असून काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे.