Marathi Movie : थोडं लूझ थोडं टाईट कॅरेक्टर... काय आहे अलीबाबा आणि चाळीशीतल्या चोरांचा मॅटर?

  223

सुबोध भावे, मुक्ता बर्वे आणि तगड्या स्टारकास्टसह नवीन चित्रपट येतोय प्रेक्षकांच्या भेटीला...


मुंबई : अलीबाबा आणि चाळीस चोरांची कथा आपण लहानपणी ऐकली, पण अलीबाबा आणि चाळीशीतल्या चोरांची कथा ऐकली आहे का? या चोरांची एक भन्नाट, धमाकेदार आणि हलकीफुलकी कथा दाखवणारा नवा मराठी चित्रपट (New Marathi Movie) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चाळीशीतले हे चोर विवाहित आहेत हा त्यांचा गुन्हा आहे, अशा आशयावर आधारलेला 'अलीबाबा आणि चाळीशीतले चोर' (Alibaba ani chalishitale chor) हा चित्रपट येत्या २९ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आज या चित्रपटाचा टीझर आऊट (Teaser out) झाला आहे.


खरं तर विवाहित असणं म्हणजे गुन्हा नव्हे, पण चित्रपटाच्या टीझरमध्ये प्रत्येक कलाकार हातात आरोपीची पाटी घेऊन उभा आहे, आणि त्या पाटीवर 'गुन्हा-विवाहित' असं लिहिलं आहे. शिवाय या चोरांचं वयदेखील चाळीशीच्या आसपासच आहे, हे पाटी वाचून लक्षात येतं. आता यामागे नेमकं काय रहस्य आहे, हे चित्रपट पाहिल्यानंतरच प्रेक्षकांच्या लक्षात येणार आहे.


या चित्रपटातून तगडी स्टारकास्ट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सुबोध भावे (Subodh Bhave), मुक्ता बर्वे (Mukta Barve) यांच्यासह उमेश कामत (Umesh Kamat), श्रुती मराठे (Shruti Marathe), अतुल परचुरे (Atul Parchure), मधुरा वेलणकर (Madhura Velankar), आनंद इंगळे (Anand Ingale) ही कलाकार मंडळी यामध्ये प्रेक्षकांचं मनोरंजन करायला सज्ज आहेत. आजारपणानंतर अतुल परचुरे कामात सक्रिय झाले असून त्यांचा हा चित्रपट पाहण्यास चाहते उत्सुक असणार आहेत.





'अलीबाबा आणि चाळीशीतले चोर' या चित्रपटाची निर्मिती नितीन वैद्य प्रोडक्शन्स आणि मृद्गंध फिल्म्सने केली आहे. चित्रपटाचे लेखन विवेक बेळे यांनी केले आहे तर दिग्दर्शनाची जबाबदारी आदित्य इंगळे यांनी सांभाळली आहे. २९ मार्च रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या