Maratha reservation : दहा टक्के आरक्षण दिल्याबद्दल वर्षावर जल्लोष!

नाशिकसह महाराष्ट्रातील हजारो मराठा शिवसैनिकांचे मुख्यमंत्र्यांना धन्यवाद


नाशिक : गेली चाळीस वर्षे संघर्ष केल्यानंतर तसेच दोनदा न्यायालयीन लढाईत रद्द झाल्यानंतर मराठा समाजाला दहा टक्के टिकणारे आरक्षण (Maratha reservation) देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी खऱ्या अर्थाने मराठा समाजाच्या (Maratha Samaj)भावनांना न्याय दिला या शब्दात नाशिक (Nashik) शिवसेना सहसंपर्कप्रमुख व छत्रपती युवा सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश कदम यांनी मुख्यमंत्र्यांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.


२० फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र विधी मंडळाचे विशेष अधिवेशन बोलावून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २८ टक्के मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली. त्यानंतर गणेश कदम यांच्या नेतृत्वाखाली नाशिकहून हजार पेक्षा अधिक तर महाराष्ट्रातून पाच हजाराहून अधिक शिवसैनिकांनी मुंबईला जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी उपस्थित हजारो शिवसैनिकांनी जल्लोष साजरा केला.


"एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून महाराष्ट्राला संवेदनशील मुख्यमंत्री लाभले आहेत. मराठा समाजाच्या अनेक वर्षांच्या दुःखावर त्यांनी फुंकर घातली आहे. या निर्णयामुळे कुणबी वगळून उर्वरित मराठा समाजालाही न्याय मिळणार आहे."

Comments
Add Comment

महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आता कर्करोग उपचार केंद्र! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सूचना

मुंबई: सध्या कर्करोगाचे प्रमाण वाढत चालले असून, यामुळे दरवर्षी अनेक लोकं मृत्युमुखी पडत असल्याच्या घटना वाढत

साठवून ठेवलेला कांदा खराब होत असल्याने शेतकरी चिंतेत

धुळे : धुळे तालुक्यातील नगाव येथील शेतकरी दिनेश पाटील यांनी साधारण २० ते २५ क्विंटल कांदा हा उकिरड्यावर फेकला

रामटेक चित्रनगरीसाठी ६० एकर जमिनीचे येत्या १५ दिवसात हस्तांतरण : ॲड आशिष शेलार

रामटेक चित्रनगरी व संरक्षित स्मारक संवर्धनातून विकास व वारसा जपण्यात येईल : वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड.आशिष

Pune Crime News : नोटीस फाडली, पोलिसांवर कुत्र्यांचा हल्ला, वादग्रस्त IAS अधिकारी खेडकर कुटुंबाचा खतरनाक खेळ उघडकीस

पुणे : बडतर्फ प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या घरावर पुन्हा एकदा पोलिसांनी नोटीस लावली आहे.

राज्यात टीईटी परीक्षा २३ नोव्हेंबरला

पुणे : इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गात अध्यापनासाठी अनिवार्य असलेली शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात घुमणार डरकाळी

 ताडोबा आणि पेंचमधून आठ वाघांचे टप्प्याटप्प्याने स्थलांतर सातारा : देशातील प्रमुख पाच व्याघ्र अभयारण्यांपैकी