मुंबई: बारावी इयत्तेच्या बोर्डाच्या परीक्षेला आज बुधवारपासून सुरूवात आहे. राज्यातील १५ लाख १३ हजार ९०९ विद्यार्थी ही परीक्षा देत आहेत. या परीक्षेदरम्यान कोणत्याही प्रकारचे गैरप्रकार घडू नयेत यासाठी परीक्षा केंद्रांच्या ठिकाणी भरारी पथक नेमण्यात आली आहेत.
यंदाची बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २३ मार्चदरम्यान होणार आहे. यावर्षी पहिल्यांदाच प्रात्यक्षिक, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापनाचे गुण ऑनलाईन पद्धतीने भरून घेतले जातील. राज्यात विज्ञान शाखेसाठी ७ लाख ६० हजार ४६ विद्यार्थी, कला शाखेसाठी ३ लाख ८१ हजार ९८२ विद्यार्थी, वाणिज्य शाखेसाठी ३ लाख २९ हजार ९०५ विद्यार्थी, व्यवसायिक अभ्यासक्रमांसाठी ३७ हजार २२६ विद्यार्थी, आयटीआयसाठी ४ हजार ७५० विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे.
परीक्षेसाठी किमान अर्धा तास आधी उपस्थित रहावे. पेपर सुरू झाल्यानंतर दहा मिनिटांनी विद्यार्थी आल्यास त्याला परीक्षेला बसू दिले जाणार नाही.
विद्यार्थ्यांना शेवटी दहा मिनिटे जास्त मिळणार आहेत. त्यावेळेस आपण लिहिलेली उत्तरपत्रिकेच्या मुख्यपृष्ठावरील माहिती योग्य असल्याची खात्री करावी. तसेच उत्तरे आणि प्रश्नांचे क्रमांकही पुन्हा एकदा तपासून खात्री करून घ्यावीत.
प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…
उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…
डॉ. सर्वेश सुहास सोमण, samrajyainvestments@gmail.com शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक ही नेहमीच फायद्याची ठरत आलेली आहे.…
महेश देशपांडे सरत्या आठवड्यामध्ये ऑटो जगताच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या बातम्या समोर आल्या. पहिली म्हणजे ग्रामीण…
- अल्पेश म्हात्रे, मुंबई डॉट कॉम मुंबईची दुसरी लाईफ लाईन असलेल्या बेस्ट उपक्रमाबद्दल गेले महिनाभर…
- सुनील जावडेकर सत्ताकारणाला समाजकारणाची जोड दिली तर एखादा राजकीय नेता त्याच्या आयुष्यात काय चमत्कार…