मराठा आरक्षण, विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाकडे साऱ्यांचे लक्ष

मुंबई: मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नावरील तोडग्यासाठी आज म्हणजेच मंगळवारी राज्य विधिमंडळाचे एकदिवसीय विशेष अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनात मराठा आरक्षण लागू करण्याबाबतचा कायदा करण्यात येणार आहे.


मराठा समाजास नोकरी तसेच शिक्षणामध्ये १० टक्के स्वतंत्र आरक्षण देणारे विधेयक मंजूर केले जाणार आहे. तसेच ओबीसीप्रमाणेच इतर कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिले जाणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.


गेल्या आठवड्याभरापासून मनोज जरांगे मराठा आरक्षणासाठी उपोषण करत आहेत. २६ फेब्रुवारीपासून विधिमंडळाचे नियोजित अधिवेशन सुरू होणार आहे. मात्र त्यापूर्वीच मंगळवारी एकदिवसीय अधिवेशन बोलावण्यात आले आहे.


सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाला सुरूवात होणार आहे. त्यापूर्वी १० वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. नवीन वर्षातील हे पहिलेच अधिवेशन आहे त्यामुळे याची सुरूवात राज्यपालांच्या अभिभाषणाने होईल.


राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष सुनील शुक्रे यांनी मराठा समाजाच्या मागासलेपणाबद्दलचा अहवाल सरकारला सादर केला आहे. याआधीही दोनदा मराठा आरक्षणाचा कायदा न्यायालयात टिकू शकला नव्हता. त्यामुळे हा कायदा टिकवण्याचे मोठे आव्हान महायुतीसमोर आहे.

Comments
Add Comment

बळजबरीने धर्मांतर केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास; ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम २०२६’मध्ये कठोर तरतुदी

मुंबई: राज्यात गेल्या काही काळापासून प्रलोभने, फसवणूक आणि बळजबरीने होणाऱ्या धर्मांतराच्या घटनांमध्ये वाढ झाली

Ratnagiri: रत्नागिरीत भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीती

रत्नागिरी: कोकणात सध्या अनेक गावात पालखी येते.त्यामुळे कोकणवासियांची कोकणात प्रचंड गर्दी जमली आहे. अनेक

आपले सरकार सेवा केंद्र व्यवस्थापकांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक; राज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती

मुंबई: राज्यातील 'आपले सरकार सेवा केंद्र' प्रकल्पात कार्यरत असलेल्या तालुका, जिल्हा आणि ब्लॉक व्यवस्थापकांच्या

'सांगली-सातारा येथील सराफ व गलाई बांधवांच्या अडचणी सोडवण्यासाठी गृह विभाग स्वतंत्र कक्ष स्थापन करणार'

मुंबई : देशभरात सोन्या-चांदीच्या व्यवसायात नाव लौकिक मिळवलेल्या सांगली आणि सातारा जिल्ह्यातील गलाई बांधव आणि

घरगुती गॅस सिलेंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष स्थापन

मुंबई: इराण - इस्राईल युध्दाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या घरगुती व व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडर

'एआय' तंत्रज्ञानाच्या मदतीने गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन वाढवणार; मत्स्यव्यवसाय विकास मंत्री नितेश राणेंनी दिली माहिती

मुंबई: राज्यात गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन वाढवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर सुरू