Maratha Reservation : शिवनेरी किल्ल्यावर आज मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाबाबत केलं सूचक विधान

म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी...


पुणे : लोकसभा निवडणुका (Loksabha Elections) जवळ आलेल्या असताना राज्य सरकारसमोर मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) देण्याचे एक मोठे आव्हान उभे ठाकले आहे. जालन्यामध्ये मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) पुन्हा एकदा बेमुदत उपोषण करत असून त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे मराठा समाज आणखी संतापायच्या आत मराठा आरक्षण मिळवून देण्यासाठी सरकारच्या वेगाने हालचाली सुरु आहेत. त्यातच आज शिवजयंती (Shivjayanti) सोहळ्यासाठी किल्ले शिवनेरीवर (Shivneri fort) आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शिवनेरीवरून मराठा आरक्षणाबाबत महत्त्वपूर्ण आणि सूचक विधान केलं आहे.


शिवजयंती सोहळ्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून आपण काम करतोय. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी उद्या आपण विशेष अधिवेशन बोलावलं आहे. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी किंवा इतर कुठल्याही समाजाला धक्का न लावता इतर कुणाचंही नुकसान न करता मराठा समाजाला टिकणारं कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्यासाठी उद्या खास अधिवेशन बोलावलेलं आहे, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.


सर्व समाजाला सोबत घेऊन जाणारं हे सरकार आहे. तसेच राज्याचा सर्वांगीण विकास साधणारं हे सर्वसामान्यांचं सरकार आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.


मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसींच्या कोट्यामधून आरक्षण द्यावं या मागणीसाठी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथून पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे राज्य सरकारनेही कुणबी नोंदी न आढळलेल्या मराठा समाजातील व्यक्तींना स्वतंत्रपणे मराठा आरक्षण देण्याची तयारी केल्याचं वृत्त आहे. त्या पार्श्वभूमीवर उद्या बोलावलेल्या अधिवेशनात नेमका काय निर्णय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Comments
Add Comment

नागपूर AIMS मधील विद्यार्थ्यांच्या जेवणात आढळल्या चक्क अळ्या..... सोशल मीडियावर चर्चेला उधाण

नागपूर : अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आपल्या घरापासून दूर असतात. अशावेळी जेवणाची सोय होते ती खाणावळीतून किंवा

Pune ZP News : पुणे : राजकीय हालचालींना वेग; अध्यक्षपदाची खुर्ची कोणाची? निवडीची तारीख ठरली

पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा धुराळा शांत झाल्यानंतर आता खऱ्या

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोठी आनंदवार्ता जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे