Acharya Vidyasagar : जैन ऋषी आचार्य विद्यासागर महाराज यांनी घेतली समाधी

३ दिवसांच्या उपवासानंतर केला देहत्याग; जैन धर्मियांवर दु:खाचा डोंगर


रायपूर : जैन (Jain) धर्मियांचे दिगंबर पंथियाचे संत आचार्य विद्यासागर महाराज (Aacharya VidhyaSagar Maharaj) यांनी समाधी घेत देह त्याग केला आहे. रात्री २ वाजून ३५ मिनिटांनी छत्तीसगडच्या (Chattisgarh) डोंगरगड इथे त्यांचं निधन झालं. ते ७७ वर्षांचे होते. शिष्यवृत्ती आणि तपस्यांसाठी, तसेच दीर्घकाळ ध्यानधारणा करण्यासाठी ते ओळखले जायचे. त्यांच्या निधनामुळे जैन धर्मियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.


आचार्य विद्यासागर महाराज यांनी गेल्या तीन दिवसांपासून अन्न-जल त्याग केला होता. त्यानंतर त्यांनी आपल्या प्राणाचा त्याग केला आणि ते ब्रह्मलीन झाले. ते गेल्या सहा महिन्यांपासून डोंगरगढ येथील चंद्रगिरी येथे राहत होते आणि गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होते. आज त्यांना पंचतत्वात विलीन करण्यात येईल.


आचार्य विद्यासागर महाराज हे आचार्य ज्ञानसागर यांचे शिष्य होते. आचार्य ज्ञानसागर यांनी समाधी घेतल्यानंतर त्यांनी आपले आचार्यपद मुनी विद्यासागर यांच्याकडे सोपवले होते. वयाच्या अवघ्या २६ व्या वर्षी २२ नोव्हेंबर १९७२ रोजी मुनी विद्यासागर आचार्य बनले. त्याचप्रमाणे आचार्य विद्यासागर महाराज यांनीही तीन वर्षांपूर्वी आपल्या आचार्यपदाचा त्याग करून आपले आचार्यपद त्यांचे आद्य शिष्य ऋषी शिष्य निर्णयक श्रमण मुनी श्री समयसागर यांच्याकडे सोपवले.



कोण आहेत आचार्य विद्यासागर?


आचार्य विद्यासागरजी महाराज यांचा जन्म १० ऑक्टोबर १९४६ रोजी कर्नाटकमध्ये झाला. त्यांना ३ भाऊ आणि २ बहिणी आहेत. त्यांच्या बहिणी स्वर्णा आणि सुवर्णा यांनीही त्यांच्याकडून ब्रह्मचर्य धारण केले. आचार्य विद्यासागर महाराज यांनी राजस्थानमध्ये दीक्षा घेतली, पण त्यांनी बहुतेक वेळ बुंदेलखंड भागामध्ये वास्तव्य केलं. आत्तापर्यंत त्यांनी ५०० हून अधिक दीक्षा दिल्या आहेत. अलीकडेच ११ फेब्रुवारी रोजी, आचार्य विद्यासागर महाराज यांचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये विश्वाचा देव म्हणून गौरव करण्यात आला. छत्तीसगडच्या डोंगरगड इथे त्यांच्यावर आज दुपारी १ वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.



पंतप्रधान मोदींनीही घेतलं होतं दर्शन


गेल्या वर्षी ५ नोव्हेंबरला छत्तीसगड दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनीही डोंगरगड गाठून जैन साधू विद्यासागर महाराज यांचं दर्शन घेतलं होतं. आचार्य विद्यासागर महाराज हे लोककल्याणासाठी ओळखले जात. गरीबांपासून तुरुंगातील कैद्यांपर्यंत सर्वांसाठी त्यांनी काम केले. आचार्य विद्यासागर महाराज नेहमी देशासाठी 'इंडिया नव्हे , भारत बोला' असे म्हणत आणि हिंदी राष्ट्र आणि हिंदी भाषेच्या संवर्धनासाठी ते नेहमीच आघाडीवर होते.

Comments
Add Comment

Monsoon Update : राज्यात मान्सूनचे जोरदार पुनरागमन, पुढील आठवड्यापासून पावसाचा जोर वाढणार; शेतकऱ्यांना दिलासा

नवी दिल्ली : जुलै महिन्याच्या उत्तरार्धात पावसाने अचानक ओढ दिल्याने निर्माण झालेली चिंतेची स्थिती आता

Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये ढगफुटी, १२ जणांचा मृत्यू; ६ बेपत्ता, वैष्णोदेवी व अमरनाथ यात्रा स्थगित

जम्मू : जम्मू-काश्मीरमधील पूंछ आणि राजौरी जिल्ह्यांत शनिवारी रात्री झालेल्या ढगफुटीने भीषण रूप धारण केले असून,

Nagaland Landslide : नागालँडमध्ये दरड कोसळून ८ जणांचा मृत्यू, १२ जखमी; बचावकार्य सुरू

मोन : नागालँडमधील मोन जिल्ह्यात रविवारी सकाळी झालेल्या दरड कोसळण्याच्या अनेक भीषण घटनांमध्ये किमान ८ जणांचा

Amit Shah : अमित शाहांची जम्मू आणि काश्मीरमधील मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत नायब राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा

नवी दिल्ली : केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी रविवारी जम्मू आणि काश्मीरमधील (Jammu - Kashmir) मुसळधार

Supreme Court On SIR : SIR नंतर मतदार यादीतून नाव हटलं तरी नागरिकत्व रद्द होत नाही! सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वाचे स्पष्टीकरण

नवी दिल्ली : विशेष सघन पुनरिक्षण (SIR) प्रक्रियेनंतर एखाद्या व्यक्तीचे नाव मतदार यादीतून वगळले गेले, तरी त्यामुळे

Google Doodle for FIFA Final 2026 : Google Doodle वर FIFA फायनलचा जल्लोष! अर्जेंटिना विरुद्ध स्पेन अंतिम सामन्यासाठी गुगलकडून खास डुडलची रचना

नवी दिल्ली : फुटबॉल विश्वाचे लक्ष लागलेल्या FIFA World Cup 2026 च्या अंतिम सामन्याच्या पार्श्वभूमीवर Google ने आपल्या होमपेजवर