दिल्लीच्या अलीपूरमध्ये फॅक्टरीत भीषण आग, ११ जणांचा मृत्यू

  89

नवी दिल्ली: राजस्थानी दिल्लीमध्ये आणखी एका आगीची भीषण घटना घडली आहे. दिल्लीच्या अलीपूरमध्ये पेंट फॅक्टरीमध्ये आग लागली होती. या आगीत होरपळून ११ जणांचा मृत्यू झाला. सुरूवातीला या दुर्घटनेत ३ जणांचा मृत्यू झाला होता तर ३ जखमीही झाले होते. अग्निशमन दलाच्या २२ गाड्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले.


अधिकतर मृतांची ओळख पटवणे मुश्किल आहे. त्यांचे शरीर पूर्णपणे जळाले आहेत. मृत व्यक्ती कंपनीतील कामगार असल्याचे सांगितले जात आहे. ज्यावेळेस ही आग लागली तेव्हा ते आग विझवण्याचे काम करत होते. याचदरम्यान पेंट बनवणाऱ्या केमिकल ड्रमचा स्फोट झाला.


फॅक्टरमध्ये लागलेल्या भीषण आगीच्या घटनेत मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. दिल्लीमधील अलीपूर हा भाग गर्दीचा भाग आहे. त्यातच ही पेंट फॅक्टरी चालवली जात होती. गुरुवारी संध्याकाळी येथे आगीचा भडका उडाला. केमिकलमुळे ही आग आणखी पसरत गेली. यामुळे फॅक्टरीमधील लोकांचा जळून मृत्यू झाला. सुरूवातीला ही संख्या ३ होती मात्र रात्री उशिरापर्यंत हा आकडा ७वर गेला. यामुळे परिसरात हाहाकाराची स्थिती झाली आहे.



अग्निशमन दलाच्या २२ गाड्यांनी विझवली आग


माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या २२ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. रात्री उशिरापर्यंत मृतदेहाची ओळख पटू शकली नाही.

Comments
Add Comment

रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी, आता ४ नव्हे तर रेल्वे सुटण्याच्या इतके तास आधी तयार होणार चार्ट

नवी दिल्ली: तुम्ही जर रेल्वेमधून प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आता तिकीटिंग आणि रिझर्व्हेशन

Emergency : आणीबाणी लादणाऱ्यांनी संविधानाची हत्या केली - पंतप्रधान

नवी दिल्ली : देशावर आणीबाणी लादण्यात आली, त्या घटनेला काही दिवसांपूर्वी पन्नास वर्षे पूर्ण झाली. आपण

केरळच्या शाळांमध्ये झुंबा सक्ती

कोझिकोड : अमली पदार्थविरोधी मोहिमेचा भाग म्हणून शाळांमध्ये झुंबा नृत्याचे शिक्षण बंधनकारक करण्याचा निर्णय

Jagannath Yatra Stampede: डीएम-एसपींची बदली, दोन अधिकारी निलंबित...चेंगराचेंगरीत झालेल्या ३ मृत्यूंबाबत ओडिशा सरकारची मोठी कारवाई

ओडिशा: भगवान जगन्नाथ यांच्या रथयात्रेदरम्यान पुरीमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीची गंभीर दखल घेत, ओडिशा सरकारने

दुचाकी वाहनांसाठी आता दोन हेल्मेटची सक्ती, परिवहन मंत्रालयाचा आदेश

मुंबई : दुचाकी वाहनधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे! रस्ते अपघात कमी करण्याच्या उद्देशाने

राजस्थान सीमेजवळ आढळले दोन मृतदेह, पोलीस तपास सुरू

जैसलमेर : राजस्थानमध्ये जैसलमेर जिल्ह्यात भारत - पाकिस्तान सीमेजवळ दोन मृतदेह आढळले. यातील एक मृतदेह अल्पवयीन