दिल्लीच्या अलीपूरमध्ये फॅक्टरीत भीषण आग, ११ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली: राजस्थानी दिल्लीमध्ये आणखी एका आगीची भीषण घटना घडली आहे. दिल्लीच्या अलीपूरमध्ये पेंट फॅक्टरीमध्ये आग लागली होती. या आगीत होरपळून ११ जणांचा मृत्यू झाला. सुरूवातीला या दुर्घटनेत ३ जणांचा मृत्यू झाला होता तर ३ जखमीही झाले होते. अग्निशमन दलाच्या २२ गाड्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले.


अधिकतर मृतांची ओळख पटवणे मुश्किल आहे. त्यांचे शरीर पूर्णपणे जळाले आहेत. मृत व्यक्ती कंपनीतील कामगार असल्याचे सांगितले जात आहे. ज्यावेळेस ही आग लागली तेव्हा ते आग विझवण्याचे काम करत होते. याचदरम्यान पेंट बनवणाऱ्या केमिकल ड्रमचा स्फोट झाला.


फॅक्टरमध्ये लागलेल्या भीषण आगीच्या घटनेत मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. दिल्लीमधील अलीपूर हा भाग गर्दीचा भाग आहे. त्यातच ही पेंट फॅक्टरी चालवली जात होती. गुरुवारी संध्याकाळी येथे आगीचा भडका उडाला. केमिकलमुळे ही आग आणखी पसरत गेली. यामुळे फॅक्टरीमधील लोकांचा जळून मृत्यू झाला. सुरूवातीला ही संख्या ३ होती मात्र रात्री उशिरापर्यंत हा आकडा ७वर गेला. यामुळे परिसरात हाहाकाराची स्थिती झाली आहे.



अग्निशमन दलाच्या २२ गाड्यांनी विझवली आग


माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या २२ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. रात्री उशिरापर्यंत मृतदेहाची ओळख पटू शकली नाही.

Comments
Add Comment

५५ देशांच्या युद्धनौकांचे भारताच्या समुद्रात शक्तीप्रदर्शन होणार; पाच दिवसांचा संयुक्त अभ्यास, शस्त्र पाहणी

नवी दिल्ली : सध्याच्या भारत-पाकिस्तान, अफगाणिस्तान-पाकिस्तान, अमेरिका-भारत, अमेरिका-रशिया-युक्रेन, इस्रायल-इराण,

ट्रेन तिकीटांच्या बुकींग नियमांत मोठा बदल; आता याच लोकांना मिळणार लोअर बर्थ

नवी दिल्ली : रेल्वे प्रवाशांची सुविधा लक्षात घेऊन तिकीट बुकींगच्या प्रक्रीयेला अधिक सोपी आणि पारदर्शक

११ कोटींची लॉटरी जिंकली, पण विजेता गायब !

पंजाब : पंजाब सरकारने काढलेल्या दिवाळी बंपर लॉटरीमध्ये बठिंडा येथील एका व्यक्तीचे नशीब एका रात्रीत बदलले आहे. या

'स्वस्थ नारी, सशक्त परिवार' चा वर्ल्ड रेकॉर्ड!

पंतप्रधान मोदींकडून महिला-केंद्रित आरोग्य अभियानाचे कौतुक नवी दिल्ली: 'स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान' (Swasth Nari,

सिकंदर शेखमुळे महाराष्ट्राच्या कुस्तीला लागला बट्टा : पंजाब पोलिसांनी केली अटक

पुणे : महाराष्ट्र केसरी ही मानाची स्पर्धा जिंकणं प्रत्येक कुस्तीपट्टूचं स्वप्न असतं. २०२३ - २०२४ वर्षी

दिल्ली नाही इंद्रप्रस्थ म्हणा, भाजप खासदाराची मागणी, अमित शाहंना पाठवलं पत्र

नवी दिल्ली : देशातील अनेक शहरांची आणि जिल्ह्यांची नावे बदलल्यानंतर 'आता थेट राजधानी दिल्लीचं नाव बदलण्याची