दिल्लीच्या अलीपूरमध्ये फॅक्टरीत भीषण आग, ११ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली: राजस्थानी दिल्लीमध्ये आणखी एका आगीची भीषण घटना घडली आहे. दिल्लीच्या अलीपूरमध्ये पेंट फॅक्टरीमध्ये आग लागली होती. या आगीत होरपळून ११ जणांचा मृत्यू झाला. सुरूवातीला या दुर्घटनेत ३ जणांचा मृत्यू झाला होता तर ३ जखमीही झाले होते. अग्निशमन दलाच्या २२ गाड्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले.


अधिकतर मृतांची ओळख पटवणे मुश्किल आहे. त्यांचे शरीर पूर्णपणे जळाले आहेत. मृत व्यक्ती कंपनीतील कामगार असल्याचे सांगितले जात आहे. ज्यावेळेस ही आग लागली तेव्हा ते आग विझवण्याचे काम करत होते. याचदरम्यान पेंट बनवणाऱ्या केमिकल ड्रमचा स्फोट झाला.


फॅक्टरमध्ये लागलेल्या भीषण आगीच्या घटनेत मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. दिल्लीमधील अलीपूर हा भाग गर्दीचा भाग आहे. त्यातच ही पेंट फॅक्टरी चालवली जात होती. गुरुवारी संध्याकाळी येथे आगीचा भडका उडाला. केमिकलमुळे ही आग आणखी पसरत गेली. यामुळे फॅक्टरीमधील लोकांचा जळून मृत्यू झाला. सुरूवातीला ही संख्या ३ होती मात्र रात्री उशिरापर्यंत हा आकडा ७वर गेला. यामुळे परिसरात हाहाकाराची स्थिती झाली आहे.



अग्निशमन दलाच्या २२ गाड्यांनी विझवली आग


माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या २२ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. रात्री उशिरापर्यंत मृतदेहाची ओळख पटू शकली नाही.

Comments
Add Comment

Income Tax Return भरणाऱ्यांसाठी ही सर्वात मोठी बातमी...

नवी दिल्ली: प्राप्तिकर विभागाने करदात्यांना मोठा दिलासा दिला आहे. आर्थिक वर्ष 2024-25 (मूल्यांकन वर्ष 2025-26) साठी आयकर

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीच्या मुदतवाढीवर सुप्रीम कोर्टात मंगळवारी सुनावणी

नवी दिल्ली : महाराष्ट्रात बहुप्रतिक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी जानेवारी

'वनतारा'चा मोठा विजय! रिलायन्सच्या ‘वनतारा’ला सर्वोच्च न्यायालयाची ‘क्लीन चिट’

नवी दिल्ली: प्राण्यांच्या खरेदी-विक्रीसंदर्भात कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप असलेल्या रिलायन्स

Railway Ticket Booking : १ ऑक्टोबरपासून बदलणार तिकीट बुकिंगचे नियम, या लोकांना होणार मोठा फायदा

मुंबई: भारतीय रेल्वेने ऑनलाइन तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये एक मोठा बदल केला आहे, जो 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू होणार

रतन टाटांचे TCS कार्यालय बंद होणार! हजारो नोकऱ्या धोक्यात

भोपाळ: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने मध्य प्रदेशातील भोपाळ येथील आपले कार्यालय १३ वर्षांनी बंद करण्याचा

BMW Car Accident: कारच्या धडकेने अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

नवी दिल्ली येथे काल रविवारी (१५ सप्टेंबर), अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागात उपसचिव म्हणून कार्यरत