नवी दिल्ली: राजस्थानी दिल्लीमध्ये आणखी एका आगीची भीषण घटना घडली आहे. दिल्लीच्या अलीपूरमध्ये पेंट फॅक्टरीमध्ये आग लागली होती. या आगीत होरपळून ११ जणांचा मृत्यू झाला. सुरूवातीला या दुर्घटनेत ३ जणांचा मृत्यू झाला होता तर ३ जखमीही झाले होते. अग्निशमन दलाच्या २२ गाड्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले.
अधिकतर मृतांची ओळख पटवणे मुश्किल आहे. त्यांचे शरीर पूर्णपणे जळाले आहेत. मृत व्यक्ती कंपनीतील कामगार असल्याचे सांगितले जात आहे. ज्यावेळेस ही आग लागली तेव्हा ते आग विझवण्याचे काम करत होते. याचदरम्यान पेंट बनवणाऱ्या केमिकल ड्रमचा स्फोट झाला.
फॅक्टरमध्ये लागलेल्या भीषण आगीच्या घटनेत मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. दिल्लीमधील अलीपूर हा भाग गर्दीचा भाग आहे. त्यातच ही पेंट फॅक्टरी चालवली जात होती. गुरुवारी संध्याकाळी येथे आगीचा भडका उडाला. केमिकलमुळे ही आग आणखी पसरत गेली. यामुळे फॅक्टरीमधील लोकांचा जळून मृत्यू झाला. सुरूवातीला ही संख्या ३ होती मात्र रात्री उशिरापर्यंत हा आकडा ७वर गेला. यामुळे परिसरात हाहाकाराची स्थिती झाली आहे.
माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या २२ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. रात्री उशिरापर्यंत मृतदेहाची ओळख पटू शकली नाही.
'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेसाठी अडवणूक, दिरंगाई, पैशांची मागणी केल्यास अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करणार मुख्यमंत्री…
मुंबई : विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी १२ जुलै रोजी मतदान होणार आहे. त्या ११ जागांसाठी १२…
मुंबई : दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त (Ashadi Wari) राज्यभरातून लाखो वारकरी पंढरपूरकडे (Pandharpur) जातात. यंदाही १७…
हवामान विभागाने दिला अतिवृष्टीचा इशारा मुंबई : महाराष्ट्रासह (Maharashtra Rain) संपूर्ण देशभरात पावसाने चांगलीच हजेरी…
आमदार धंगेकरांच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधानसभेत उत्तर मुंबई : समान पाणी वाटपाची योजना…
परिसरात मोठी वाहतूक कोंडी छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलक मनोज जरांगे (Manoj…