Manoj Jarange Patil : ‘जरांगे उपचार घेणार की नाहीत?’ मुंबई उच्च न्यायालयाने केली विचारणा

Share

मी मेलो तर मला शासनाच्या दारात नेऊन टाका : मनोज जरांगे

जालना : मराठा आरक्षणाची (Maratha Reservation) मागणी लावून धरत मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) पुन्हा एकदा बेमुदत उपोषणाला बसले आहेत. जालन्यातील आंतरवाली सराटी जेथून खरी मराठा आरक्षणाला सुरुवात झाली त्या ठिकाणी जरांगेंनी पुन्हा बेमुदत उपोषण पुकारले आहे. त्यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस असून प्रकृती अत्यंत खालावली आहे. त्यामुळे जरांगेंनी लवकरात लवकर उपचार घ्यावेत अशी मागणी मराठा बांधवांकडून केली जात आहे. मात्र, उपचार न घेण्यावर जरांगे ठाम आहेत. तसेच मेलो तर शासनाच्या दारात नेऊन टाका, असं मनोज जरांगे म्हणाले आहेत.

राजपत्रित अध्यादेश व मसुदा यांची अंमलबजावणी करावी, अधिवेशन घेऊन ‘सगेसोयऱ्या’बाबत कायदा मंजूर करावा, यासाठी शनिवार १० फेब्रुवारीपासून मनोज जरांगे अंतरवाली सराटी येथे बेमुदत उपोषण करत आहेत. जरांगे यांची परवानगी नसताना त्यांच्यावर उपचार करण्यात आले याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. काळजीची गरज असेल तर सरकारने मराठा आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करावी अन्यथा पुढील आंदोलनासाठी मुंबईला जाण्याचा इशारा जरांगे यांनी दिला आहे.

‘मी वैद्यकीय उपचार घेणार नाही. मला झोपेत सलाईन लावू नका. सलाईन लावायचे असेल तर अगोदर अंमलबजावणी कधी करता ते सांगा. मायबाप समाज तुम्ही सरकारला धारेवर धरा. मी एकटा मुंबईत जाऊन बसेन. अंमलबजावणी झाल्याशिवाय उठणार नाही. सरकारने त्वरित निर्णय घ्यावा. अंत पाहू नका. मी जर मेलो तर मला शासनाच्या दारात नेऊन टाका,’’ असे मनोज जरांगे यांनी काल आंतरवाली सराटी येथे उपस्थित मोठ्या जनसमुदायाला सांगितले. यावेळी जरांगे यांनी त्यांना लावलेली सलाईन काढून फेकून दिली.

उच्च न्यायालयाकडून जरांगेंना उपचाराबाबत विचारणा

दरम्यान मनोज जरांगे यांना उच्च न्यायालयाने (Mumbai Highcourt) औषध उपचाराच्या संदर्भात विचारणा केली आहे. जरांगे उपचार घेणार की नाही, असा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाने केला आहे. अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी जरांगे यांच्या उपोषणाच्या संदर्भात एक याचिका दाखल केली. त्यावरून न्यायालयाने जरांगे यांना आपली भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत.

Recent Posts

T20 World Cup नंतर ऑलिम्पिकमध्ये फडकणार तिरंगा? राहुल द्रविडने पंतप्रधान मोदींना दिले वचन!

मुंबई: भारतीय खेळाडू टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर मायदेशात परतले आहेत. यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाच्या…

51 mins ago

प्रहार बुलेटीन: ०५ जुलै २०२४

दिवसभरातील (Prahaar Bulletin) महत्वाच्या बातम्या… टीम इंडियाच्या विजयी मिरवणुकीत काही चाहते आजारी तर काही झाले…

3 hours ago

Mumbai News : व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेणाऱ्या ‘या’ विद्यार्थिनींना मिळणार मोफत प्रवेश!

राज्य मंत्रिमंडळाने घेतला मोठा निर्णय मुंबई : सरकारने माझी लाडकी बहीण योजना जाहीर केल्यानंतर आता…

3 hours ago

NEET PG Exam पुढे ढकलली! नवीन तारीख आली समोर

प्रश्नपत्रिका तयार करतानाच घेणार 'ही' खास काळजी मुंबई : NEET PG परीक्षा रद्द झाल्यानंतर जवळपास…

4 hours ago

Ranjeet Nimbalkar : राहुल गांधींनी पंढरपुरच्या वारीत कॅट वॉक करायला येऊ नये!

यांचा वारीतला सहभाग केवळ राजकीय फायद्यासाठी भाजपाच्या माजी खासदारांची विरोधकांवर बोचरी टीका सोलापूर : आषाढी…

4 hours ago

Nitesh Rane : गुजरातच्या बसवर टीका करणारा मविआचा नेता अदानींचा खास ड्रायव्हर!

आमदार नितेश राणे यांचा रोहित पवारांना अप्रत्यक्ष टोला कोणाची बुद्धी लहान याबाबत राहुल गांधी आणि…

5 hours ago