MLA disqualification case : ठाकरे गटाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आता थेट राज्यसभा निवडणुकीनंतर सुनावणी

आमदार अपात्रता निकालानंतर दाखल केली होती याचिका


नवी दिल्ली : शिवसेनेत (Shivsena) फूट पडल्यानंतर शिंदे व ठाकरे गटातील (Thackeray Group) संघर्ष टिपेला पोहोचला. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) आमदार अपात्रतेचा (MLA disqualification case) निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांच्या हाती सोपवला होता. मागच्याच महिन्यात हा निकाल लावत नार्वेकरांनी कोणत्याही पक्षाचे आमदार अपात्र न ठरवता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची शिवसेना खरी असल्याचा निकाल दिला. त्यामुळे ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, या प्रकरणात सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयाकडून थेट राज्यसभा निवडणुकीनंतरची (Rajyasabha Elतारीख जाहीर करण्यात आली आहे. १ मार्च रोजी ही सुनावणी पार पडणार आहे.


देशभरात राज्यसभेच्या निवडणुका २७ फेब्रुवारी रोजी होणार आहेत. यानंतर ठाकरे गटाच्या याचिकेवर १ मार्च २०२४ रोजी सुनावणी पार पडेल. ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल (Kapil Sibal) हे न्यायालयात युक्तीवाद करत आहेत. तर शिवसेना शिंदे गटाच्या वतीने हरिश साळवे आणि महेश जेठमलानी यांनी युक्तीवाद केला आहे. या प्रकरणी न्यायालय कोणता ऐतिहासिक निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.



निकालानंतर राहुल नार्वेकर काय म्हणाले होते?


"मी कुणाला संतुष्ट करायला निकाल दिला नाही, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांनुसारच निकाल दिला. भारतातील कोणत्याही नागरिकाला सर्वोच्च न्यायालयात जाण्याची मुभा आहे", अशी प्रतिक्रिया विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अपात्रता प्रकरणाचा निकाल जाहीर केल्यानंतर दिली होती. नार्वेकर यांनी निकाल दिल्यानंतर ठाकरे गटाने लगेच सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. ठाकरे गटाशिवाय शिवसेना शिंदे गटानेही मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे.

Comments
Add Comment

LOAN WAIVER : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना: फडणवीस सरकारच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून दिलासा!

MAHARASHTRA : महाराष्ट्र सरकारने राज्यातील शेतकरी बांधवांसाठी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना'

Car Accident : धक्कादायक! १५ वर्षाच्या मुलाने भरधाव कारने ९ जणांना उडवलं, ५ गंभीर जखमी

जळगाव : जळगाव (Jalgaon) शहरातील रामानंदनगर परिसरात एक धक्कादायक अपघात घडला असून, एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलाने भरधाव

मालाडमध्ये बेस्ट बसचा अपघात; अनेक वाहनांना धडक, महामार्गावर वाहतूक कोंडी

मुंबई : मुंबईतील मालाड (Malad Accident) पूर्व परिसरात गुरुवारी सकाळी बेस्ट बसच्या अपघातामुळे मोठी वाहतूक कोंडी निर्माण

Ashadhi Ekadashi Wari : संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर; ७ जुलैला देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान

पुणे : आषाढी वारीची आतुरतेने वाट पाहणाऱ्या लाखो वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. श्री संत तुकाराम महाराज

School Reopening : राज्यातील शाळांबाबत शिक्षण विभागाचा निर्णय; १५ जूनला वाजणार शाळेची घंटा!

मुंबई : राज्यातील राज्य मंडळाच्या शाळांबाबत गेल्या काही दिवसांपासून विविध चर्चा रंगत होत्या. शाळा (School) उशीरा सुरू

Pune Crime : नसरापूर प्रकरणी न्यायालयात तीन लहान मुलांची साक्ष

पुणे : पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील चिमुकलीवर झालेल्या अत्याचार आणि खून प्रकरणाच्या खटल्यात एक मोठी घडामोडी