संगमनेरमधील किर्तनकार महिलेला तहसिलदारांनी दिला न्याय

संगमनेर (सहदेव जाधव) - गमनेर तालुक्यातील पिंपळगाव देपा येथे वारकारी संप्रदायातील महिला किर्तनकार ह भ प रोहिणी राऊत यांचा गावातील काही लोकांनी जाणून बुजून रस्ता अडविला होता. यामुळे अनेक महिन्यांपासून त्यांच्या शेतात व घराकडे जाण्याचा मार्ग बंद होता.


पिंपळगाव देपा येथील काही लोकांनी त्यांना हकनाक त्रास देत त्यांच्या शेतावर जाणारा रस्ता अडविला होता. या रस्त्यावर चर खोदून व रस्त्यावर माती टाकून हा रस्ता जाणून बुजून अडविण्यात आला होता. या अडबंगपणाला कंटाळून किर्तनकार महिलेने संगमनेर तहसीलदार यांच्याकडे न्यायाची मागणी केली होती.


अखेर सर्व चौकशी करुन संगमनेर तहसीलदार धीरज मांजरे यांनी अर्जदार किर्तनकार महिलेला न्याय मिळवून दिला आहे. यावेळी तहसीलदार व महसूल पथकाने स्वतः उपस्थित राहत या महिलेचा रस्ता पुन्हा पुर्ववत करुन दिला आहे. तसेच यापुढे या रस्त्यावर अटकाव न करण्याचा आदेश दिला आहे.


यावेळी किर्तनकार ह भ प रोहिणी राऊत या अतिशय भावनिक झाल्या होत्या. यावेळी त्यांनी तहसीलदार धीरज मांजरे, मंडल अधिकारी खाडे साहेब, तलाठी शिरोळे आप्पा, घारगांव पोलीसांचे तसेच पत्रकार बांधवांचे आभार मानले आहेत.

Comments
Add Comment

अचानक येऊन पाहणी करा, पुणेकर महिलेची अजित पवारांकडे मागणी

पुणे : वाहनांची वाढती संख्या विचारात घेता रस्ते रुंद करण्यावर शासनाचा भर आहे, वाढत्या वाहनामुळे वाहतूक कोंडी

कॉल सेंटरमध्ये बेकायदेशीर उद्योग! सीबीआयने आवळल्या मुसक्या, केली मोठी कारवाई

कल्याण: सीबीआयने अलिकडेच महाराष्ट्रातील नाशिक आणि कल्याणमधील इगतपुरी येथील एक बेकायदेशीर कॉल सेंटरचा भंडाफोड

भारत - पाकिस्तान सामन्यावरुन मविआत बेबनाव

नाशिक : आशिया चषक टी २० क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात आज भारत आणि पाकिस्तान दुबईत आमनेसामने असतील. हा सामना

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या