संगमनेरमधील किर्तनकार महिलेला तहसिलदारांनी दिला न्याय

  117

संगमनेर (सहदेव जाधव) - गमनेर तालुक्यातील पिंपळगाव देपा येथे वारकारी संप्रदायातील महिला किर्तनकार ह भ प रोहिणी राऊत यांचा गावातील काही लोकांनी जाणून बुजून रस्ता अडविला होता. यामुळे अनेक महिन्यांपासून त्यांच्या शेतात व घराकडे जाण्याचा मार्ग बंद होता.


पिंपळगाव देपा येथील काही लोकांनी त्यांना हकनाक त्रास देत त्यांच्या शेतावर जाणारा रस्ता अडविला होता. या रस्त्यावर चर खोदून व रस्त्यावर माती टाकून हा रस्ता जाणून बुजून अडविण्यात आला होता. या अडबंगपणाला कंटाळून किर्तनकार महिलेने संगमनेर तहसीलदार यांच्याकडे न्यायाची मागणी केली होती.


अखेर सर्व चौकशी करुन संगमनेर तहसीलदार धीरज मांजरे यांनी अर्जदार किर्तनकार महिलेला न्याय मिळवून दिला आहे. यावेळी तहसीलदार व महसूल पथकाने स्वतः उपस्थित राहत या महिलेचा रस्ता पुन्हा पुर्ववत करुन दिला आहे. तसेच यापुढे या रस्त्यावर अटकाव न करण्याचा आदेश दिला आहे.


यावेळी किर्तनकार ह भ प रोहिणी राऊत या अतिशय भावनिक झाल्या होत्या. यावेळी त्यांनी तहसीलदार धीरज मांजरे, मंडल अधिकारी खाडे साहेब, तलाठी शिरोळे आप्पा, घारगांव पोलीसांचे तसेच पत्रकार बांधवांचे आभार मानले आहेत.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या