Mukesh Ambani : महाराष्ट्रातील 'ही' कंपनी आता मुकेश अंबानींच्या ताब्यात

  300

शाळकरी मुलांमध्ये प्रसिद्ध असलेली ८२ वर्षे जुनी कंपनी


नाशिक : महाराष्ट्रात सुमारे ८२ वर्षांचा इतिहास असलेली एक कंपनी रिलायन्स उद्योग समूहाचे (Reliance Industries) अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी विकत घेतली आहे. रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्सने रावळगाव शुगर फार्मचा (Ravalgaon Sugar Farm Ltd) मिठाई व्यवसाय खरेदी केला आहे. यासाठी रिलायन्सने २८ कोटी रुपये मोजले आहेत. करारानुसार या कंपनीचे ट्रेडमार्क, पाककृती आणि बौद्धिक संपदा हक्क आता रिलायन्सकडे आले आहेत.


रावळगाव कँडी विशेषतः शाळकरी मुलांमध्ये फार प्रसिद्ध होती. मात्र, अलिकडच्या काळात कंपनीला व्यवसाय टिकवणे कठीण झाले. या उद्योगातील वाढलेल्या स्पर्धेमुळे कंपनीचा बाजारातील हिस्सा कमी झाला. तसेच साखरेच्या किंमतीत झालेली वाढ आणि ऊर्जेचा आणि मजुरीचा जास्त खर्च यामुळे कंपनीचा नफा कमी झाला. कोविड आणि लॉकडाऊनमुळे शाळा आणि कार्यालये बंद झाली आणि कंपनीची विक्री या काळात कमी झाली. त्यामुळे या कंपनीने रिलायन्ससोबत डील केले. रावळगाव शुगर फार्म यांनी काल एका एक्सचेंज फाइलिंगमध्ये ही माहिती दिली.


एफएमसीजी (Fast-moving consumer goods) कंपन्यांमध्ये बाजारपेठेतील जास्तीत जास्त हिस्सा मिळविण्याची स्पर्धा सुरू आहे. अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी ते इतर कंपन्यांचे अधिग्रहण करत आहेत. मात्र, रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्सने या डीलबाबत कोणतेही स्टेटमेंट जाहीर केले नाही.



काय आहे रावळगाव कंपनीचा इतिहास?


उद्योगपती वालचंद हिराचंद यांनी १९३३ मध्ये महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील रावळगाव गावात साखर कारखान्याची स्थापना केली. सुरुवातीला साखरेचे काम सांभाळणारी ही कंपनी १९४० पासून मिठाई व्यवसायात उतरली. १९४२ मध्ये या कंपनीने रावळगाव ब्रँड अंतर्गत टॉफी बनवण्यास सुरुवात केली. या कंपनीचे पान पसंद, मँगो मूड आणि कॉफी ब्रेक यांसारखे नऊ ब्रँड आहेत. या कंपनीच्या एकूण विक्रीपैकी ५०% विक्री महाराष्ट्रातून होते. ही कंपनी अनेक दशकांपासून विविध उत्पादने तयार करत आहे.

Comments
Add Comment

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )

देवाला भेटण्यासाठी ५ व्या मजल्यावरून मारली उडी, महिलेची आत्महत्या

हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. हिमायतनगर येथील ४३ वर्षीय पूजा

Operation Akhal: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून चकमक सुरू, आतापर्यंत ३ दहशतवादी ठार; २ दहशतवाद्यांना घेराव

कुलगाम: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून लष्कराचे ऑपरेशन अखल सुरू आहे. याद्वारे एके-४७ रायफल, एके

लष्करी अधिकाऱ्याकडून स्पाइसजेटच्या कर्मचाऱ्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण, श्रीनगर विमानतळावर नेमके घडले काय?

एका कर्मचाऱ्याच्या पाठीच्या कण्याला फ्रॅक्चर आणि जबड्याला गंभीर दुखापत श्रीनगर: जम्मू काश्मीरमधील श्रीनगर

‘इस्राो’ची मंगळ तयारी

नवी दिल्ली : ३१ जुलै रोजी इस्रोने लडाखच्या त्सो कार या दुर्गम आणि मंगळ ग्रहासारख्या भासणाऱ्या प्रदेशात आपल्या

सैन्याच्या शौर्याचा काँग्रेसकडून सतत अपमान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाराणसीत आरोप वाराणसी  : ऑपरेशन सिंदूर पूर्णपणे यशस्वी झाले आहे, पहलगामचे