Devendra Fadnavis : 'माझे ठाम मत, उद्धव येडा झाला'

  344

देवेंद्र फडणवीस यांची जहरी टीका


मुंबई : उद्धवजींची भाषा आणि शब्द ऐकल्यानंतर माझे ठाम मत आहे की त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे, असे प्रत्युत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना दिले.


“फडणवीसांची मानसिक तपासणी करायला हवी. आपल्याला एक मनोरुग्ण गृहमंत्री लाभलाय का? अशीच शंका सध्या येत आहे, सरकारच जर खुन्यांच्या मागे उभे राहिले तर राज्यात गुन्हेगारी घटना वाढतील “अशी टीका पत्रकार परिषदेतून ठाकरे यांनी केली होती. त्यावर प्रत्युत्तर देताना फडणवीस यांनी ठाकरेंच्याच डोक्यावर परिणाम झाला असल्याची टीका केली.


फडणवीस म्हणाले, उद्धवजींची भाषा आणि शब्द ऐकल्यानंतर माझे ठाम मत आहे की त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे मी त्यांच्या कोणत्याही टीकेला प्रत्युत्तर देणार नाही. उद्धवजींनी आता काहीही म्हटले तरी मी त्यांना केवळ ‘गेट वेल सून’ एवढेच म्हणेन. मी आता ते लवकर बरे व्हावेत म्हणून केवळ ‘गेट वेल सून’ एवढ्याच शुभेच्छा देतो.


यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील गुन्हेगारी घटनांच्या मुद्द्यावरुन सरकारवर होणारे आरोप फेटाळून लावले. राज्यात गेल्या काही काळात ज्या गुन्हेगारी घटना घडल्या आहेत, त्या निश्चितच गंभीर आहेत. पण या सर्व घटना वैयक्तिक वैमनस्यातून घडल्या आहेत. त्यामुळे याचा थेट कायदा व सुव्यवस्थेशी संबंध जोडणे अयोग्य आहे. या गुन्हेगारी घटना आपापसातील हेवेदावे, भांडणांमुळे घडल्या होत्या. या प्रकरणांमध्ये योग्य ती कठोर कारवाई केली जाईल, असे फडणवीस यांनी सांगितले.


राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी अभिषेक घोसाळकर यांच्यावरील हल्लाप्रकरणात सत्ताधारी पक्षातील महिला किंवा पुरुष प्रवक्त्याचा हात असल्याचा आरोप केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना फडणवीसांनी म्हटले की, विजय वडेट्टीवार यांना फार काही माहिती नसते. ते काहीही बोलत असतात. अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणाची चौकशी होईल. पण अलीकडच्या काळात जे गोपीचंद जासूस, जग्गा जासूस तयार झालेत, त्यांनी सांभाळून बोलावे, असा सल्ला देवेंद्र फडणवीसांनी वडेट्टीवारांना दिला.


दरम्यान, आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जी टीका करताना आज तुम्ही सर्व मर्यादा ओलांडल्या. तुमच्याबद्दल कीव वाटू लागली. राजकारणात आपल्या विरोधकांवर टीका करायची असते. पण ती करताना सभ्यता, संस्कृती पाळावी लागते. परंतु अलीकडच्या काळात आपण ज्या पद्धतीने भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करीत आहात, ते बघितल्यानंतर आपल्या प्रकृतीची अधिकच काळजी वाटू लागते, अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.


जाहीर सभेतील आपली भाषणे, पत्रकार परिषदेतील आपली विधाने ऐकल्यानंतर आपण सध्या प्रचंड मानसिक तणावात आहात, हे लक्षात येते. आपली ही अवस्था आपण स्वतःचा हाताने करवून घेतली. ‘असंगाशी संग’ केल्यानंतर असेच होणार. फडणवीस यांच्यावर आज आपण ज्या खालच्या भाषेत टीका केली तो तळ आम्हाला गाठता येणार नाही. पण तुमची भाषा, तुमचे टोमणे, तुमच्या शिव्या, तुमचे नैराश्य या साऱ्याच गोष्टी हा महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी बघत आहे. तुम्ही या बिकट मनोवस्थेतून लवकर बाहेर पडावेत, एवढीच प्रार्थना करणे आमच्या हातात आहे, असेही चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.

Comments
Add Comment

Auto Rickshaw Rent Hike: आता शेअर रिक्षाचे भाडे वाढले! सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी एक चटका

कल्याण: गेल्या काही दिवसांपासून महागाई प्रचंड वाढली आहे. त्यातच आता सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी एक चटका बसणार

1098 Toll Free Number : आता इयत्ता पहिलीच्या अभ्यासक्रमात ‘१०९८’ टोल फ्री क्रमांक! काय प्रकार नक्की? जाणून घ्या...

अमरावती : राज्य शिक्षण मंडळाने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. पहिलीच्या अभ्यासक्रमात बालहिताच्या दृष्टीने

Pandharpur Wari : वारकऱ्यांचं जेवणाचं मॅनेजमेंट कसं असतं?

कशी केली जाते खाणपानची तयारी? काही जणी कणिक मळतात. कुणी ​ चपात्या लाट​तय. कोण भाजी निवडतयं​, असं चित्र तुम्हाला

Nitin Gadkari Stucks in Traffic Jam: केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरीच अडकले वाहतूक कोंडीत; दौरा करावा लागला रद्द

पुणे: वाहतूक कोंडी सोडवणाऱ्या प्रकल्पाच्या पाहणीसाठी गेलेले केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी यांना वाहतूक

डिप्लोमा परीक्षेचा निकाल जाहीर, अभियांत्रिकी आणि फार्मसीच्या थेट दुसऱ्या वर्षाच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा

मुंबई: महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने (MSBTE) तंत्रशिक्षण पदविका परीक्षांचे निकाल जाहीर केले आहेत. यामुळे

Maharashtra Rain: उद्या मुंबई आणि कोकण किनारपट्टीसह घाट माथ्यावर ऑरेंज अलर्ट

मुंबई: भारतीय हवामान विभागाकडून राज्यात पुढील २४ तासात मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे घाट आणि सातारा