चौथीपर्यंतच्या शाळा सकाळी ९नंतर भरवा, राज्य सरकारचे आदेश

मुंबई: राज्यात इयत्ता चौथी पर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शाळा सकाळी ९ वाजल्यानंतर भरवा असे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. याबाबतचा जीआर राज्य सरकारने काढला आहे. याबाबतच्या सूचना सरकारकडून शाळांना देण्यात आल्या आहेत.


मुलांचे मानसिक आरोग्य चांगले राहावे या दृष्टीने सरकारने हा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वी मुलांच्या झोपेबाबत चिंता व्यक्त करत शाळांच्या वेळा बदलण्यात यावा असे राज्यपालांनी सूचना दिल्या होत्या.


शालेय शिक्षण मंत्र्यांकडून याबाबत विचारविनिमय सुरू होता. मात्र आता याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. याआधी प्राथमिक शाळा सकाळी ७ वाजता सुरू होत असता. मात्र यामुळे लहान मुलांच्या झोपेवर परिणाम होत होता. मुलांची नीट झोप न झाल्याने त्यांच्या आरोग्यावर परिणाम होत होता. यामुळेच सरकारने हा निर्णय घेतला आहे.


राज्यात विनाअनुदानित, अनुदानित, सरकारी आणि खाजगी अशा मिळून एकूण १,१०,११४ शाळा आहे. दरम्यान, सरकारने केलेल्या निर्णयाची अंमलबजावणी राज्यातील ६५ हजाराहून अधिक शाळांमध्ये होऊ शकते.


Comments
Add Comment

मुंबईत पावसाचे टार्गेट पूर्ण, आतापर्यंत तब्बल १०३ टक्के पावसाची नोंद

मुंबई (खास प्रतिनिधी) : यंदा पावसाने वेळेआधीच हजेरी लावल्यानंतर ज्या प्रकारे बरसात करत आहे, ते पाहता आता मुंबईतील

दादर पश्चिमेला झाड कोसळलं, चारचाकी थोडक्यात बचावली

मुंबई: दादरच्या पश्चिम येथील पोर्तुगीज चर्च जवळील परिसरात झाड कोसळल्याची घटना घडली आहे. दादरच्या अमर हिंद

काहीही झाले तरी मुंबई महापौर महायुतीचाच असणार- देवेंद्र फडणवीस

मुंबई: राज्यात लवकरच महापालिकेच्या निवडणुका होणार आहे. त्यासाठी सर्वच पक्ष जोरदार तयारी करत आहे. नेत्यांच्या

मुंबईत देवींच्या आगमन मिरवणुकांनी परिसर उजळले

मुंबई: शारदीय नवरात्रोत्सवाच्या आधी शहरात सर्वात पूज्य देवींच्या मूर्तींचे उत्साही स्वागत करण्यात आले.

मुंबई मेट्रो स्टेशनच्या खराब डिझाइनवर प्रवासी नाराज

मुंबई: मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर पंख्यांची कमतरता असल्याबद्दल 'रेडिट'वरील एका पोस्टनंतर मुंबई मेट्रो

मदर डेअरीचे टेट्रा पॅक दूध आजपासून प्रति लिटर २ रुपयांनी स्वस्त

मुंबई: मदर डेअरीने आपल्या युएचटी दूधाच्या (टेट्रा पॅक) किमतींमध्ये २ रुपयांची कपात करण्याची घोषणा आज, मंगळवारी