PM Narendra Modi : जेव्हा लोकशाहीची चर्चा होईल तेव्हा मनमोहन सिंग यांची आठवण येईल!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे केले भरभरुन कौतुक


नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा (Budget Session of the Parliament) आज ७ वा दिवस आहे. आज ५६ राज्यसभा खासदारांच्या (Rajyasabha MP) निरोपावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आपले मत व्यक्त केले. तसेच अंतरिम अर्थसंकल्पावर चर्चा करण्यात आली. काल पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसच्या (Congress) आजवरच्या भ्रष्टाचारावर तसेच नाकर्तेपणावर बोट ठेवत काँग्रेसला चांगलेच धारेवर धरले. दरम्यान, आज राज्यसभेत खासदारांना दिलेल्या निरोपाच्या भाषणात मोदी यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग (Manmohan Singh) यांचे भरभरुन कौतुक केले.


पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, जेव्हा लोकशाहीची चर्चा होईल तेव्हा मनमोहन सिंग यांची आठवण येईल. मनमोहन सिंग यांनी जबाबदारी काय असते हे शिकवले. ते खासदारांसाठी प्रेरणादायी उदाहरण आहेत. मनमोहन सिंग यांचे या सभागृहात महत्त्वाचे योगदान असल्याचे ते म्हणाले.


पीएम मोदी म्हणाले की, मला विशेषत: मनमोहनजींचे स्मरण ठेवायचे आहे. त्यांनी या सदनाला आणि देशाला दीर्घकाळ मार्गदर्शन केले आहे. जेव्हा सभागृहामध्ये चर्चा होईल तेव्हा त्यात मनमोहन सिंग यांची नक्कीच चर्चा होईल. मनमोहन सिंग यांनी व्हील चेअरवर बसून सभागृहात मतदान केले. त्यांनी आपले कर्तव्य बजावले. मनमोहनजींनी लोकशाहीला बळ दिले.


तसेच पीएम मोदी पुढे म्हणाले की, सद्गुणी लोकांसोबत राहून आपल्यातील गुणही वाढले आहेत. नद्यांमधील पाणी जोपर्यंत वाहत राहते तोपर्यंतच ते पिण्यायोग्य राहते. पण नदी कितीही गोड असली तरी समुद्राला भेटताच ती पिण्यास अयोग्य होते. हा संदेश प्रत्येकासाठी प्रेरणादायी असेल असे मला वाटते.

Comments
Add Comment

Murshidabad Train Accident : मुर्शिदाबादमध्ये भीषण अपघात! ट्रेन-स्कूल व्हॅनच्या धडकेत ३ विद्यार्थ्यांचा मृत्यू

मुर्शिदाबाद : पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद (Murshidabad) जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी भीषण रेल्वे अपघात (Train Accident) झाला.

Hydrogen Train : भारताच्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनला आज हिरवा झेंडा; जाणून घ्या काय आहेत खास वैशिष्ट्ये

जिंद : तब्बल ११० वर्षांपूर्वी, म्हणजेच १९१६ मध्ये ईस्ट इंडिया रेल्वेने (East India Railway) जिंद–पानीपत रेल्वेमार्ग (Railway Line)

India's energy storage : भारताची ऊर्जा साठवणूक क्षमता २०३५-३६ पर्यंत दहा पटींनी वाढणार

नवी दिल्ली : भारताच्या विकासाच्या प्रवासात ऊर्जा क्षेत्राचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. देशाची वाढती वीज गरज आणि

CUTS International : बाईक टॅक्सींसाठी देशव्यापी सुसंगत धोरणाची गरज, 'कट्स इंटरनॅशनल'चा अहवाल

नवी दिल्ली : देशातील बाईक टॅक्सी सेवांसाठी सध्या असलेल्या विसंगत राज्यनिहाय नियमांऐवजी, एक सुसंगत आणि

Jagannath Rath Yatra Stampede : जगन्नाथ रथयात्रेदरम्यान प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती; एकाचा मृत्यू, अनेक जखमी

भुवनेशवर : ओडिसातील पुरी येथे गुरुवारी जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेदरम्यान चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती

Strait of Hormuz : होर्मुज सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर भारतीय नाविकांच्या तैनातीला मनाई

अमेरिका-इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर डीजीएमएचा मोठा निर्णय नवी दिल्ली : अमेरिका आणि इराण यांच्यात वाढलेल्या