PM Narendra Modi : जेव्हा लोकशाहीची चर्चा होईल तेव्हा मनमोहन सिंग यांची आठवण येईल!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे केले भरभरुन कौतुक


नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा (Budget Session of the Parliament) आज ७ वा दिवस आहे. आज ५६ राज्यसभा खासदारांच्या (Rajyasabha MP) निरोपावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आपले मत व्यक्त केले. तसेच अंतरिम अर्थसंकल्पावर चर्चा करण्यात आली. काल पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसच्या (Congress) आजवरच्या भ्रष्टाचारावर तसेच नाकर्तेपणावर बोट ठेवत काँग्रेसला चांगलेच धारेवर धरले. दरम्यान, आज राज्यसभेत खासदारांना दिलेल्या निरोपाच्या भाषणात मोदी यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग (Manmohan Singh) यांचे भरभरुन कौतुक केले.


पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, जेव्हा लोकशाहीची चर्चा होईल तेव्हा मनमोहन सिंग यांची आठवण येईल. मनमोहन सिंग यांनी जबाबदारी काय असते हे शिकवले. ते खासदारांसाठी प्रेरणादायी उदाहरण आहेत. मनमोहन सिंग यांचे या सभागृहात महत्त्वाचे योगदान असल्याचे ते म्हणाले.


पीएम मोदी म्हणाले की, मला विशेषत: मनमोहनजींचे स्मरण ठेवायचे आहे. त्यांनी या सदनाला आणि देशाला दीर्घकाळ मार्गदर्शन केले आहे. जेव्हा सभागृहामध्ये चर्चा होईल तेव्हा त्यात मनमोहन सिंग यांची नक्कीच चर्चा होईल. मनमोहन सिंग यांनी व्हील चेअरवर बसून सभागृहात मतदान केले. त्यांनी आपले कर्तव्य बजावले. मनमोहनजींनी लोकशाहीला बळ दिले.


तसेच पीएम मोदी पुढे म्हणाले की, सद्गुणी लोकांसोबत राहून आपल्यातील गुणही वाढले आहेत. नद्यांमधील पाणी जोपर्यंत वाहत राहते तोपर्यंतच ते पिण्यायोग्य राहते. पण नदी कितीही गोड असली तरी समुद्राला भेटताच ती पिण्यास अयोग्य होते. हा संदेश प्रत्येकासाठी प्रेरणादायी असेल असे मला वाटते.

Comments
Add Comment

Fire News : ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, उत्तर प्रदेशातील हापूर जिल्ह्यात भीषण अग्नितांडव

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील हापूर जिल्ह्यात ( Hapur district of Uttar Pradesh ) भीषण अग्नितांडवाची घटना घडली आहे. आतापर्यंत या

भारतासाठी आनंदाची बातमी ! चीन, पाकिस्तानची झोपच उडणार ; भारत आणि रशियामध्ये मोठा करार

Big deal between India and Russia : भारत आणि रशिया या दोन देशांतील मैत्रीपूर्ण संबंध संपूर्ण जगाला माहित आहे. जगाचा विरोध धुडकावत कधी

Heat Wave: पुढील तीन दिवस जरा जपूनच ! राज्यातील 'हे' शहर जगातील सर्वाधिक उष्ण शहरांच्या यादीत; नाशिकची स्थिती काय ?

Maharashtra Weather Update : राज्यभरात तपमानानं कहर केल्याचे चित्र आहे. अशातच प्रादेशिक हवामान विभागाने वर्तविलेल्या

West Bengal Election 2026 : विक्रमी मतदानामुळे ममता बॅनर्जींचे सरकार संपुष्टात येईल - अमित शाह

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जिल्ह्यातील राणाघाट येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

Karnataka : पादचारी पूल कोसळला, आठ जखमी

मंगळुरू : कर्नाटकमध्ये दक्षिण कन्नड जिल्ह्यातील मूडबिद्री तालुक्यात एक अरुंद पादचारी पूल कोसळला. या

West Bengal : पश्चिम बंगालमध्ये ठिकठिकाणी ईडीच्या धाडी

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वीच अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) राजधानी कोलकात्यात