Solapur university : सोलापूर विद्यापीठाचा ओंगळ कारभार; विद्यार्थ्यांना ५० गुणांच्या परिक्षेत चक्क ९९ गुण!

नेमकी काय चूक घडली?


सोलापूर : विद्यापीठात परिक्षांच्या वेळापत्रकात तसेच गुणपत्रिकेत चुका झाल्याने विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यातच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या (Solapur university) ओंगळ कारभाराची एक घटना समोर आली आहे. ५० गुणांच्या परिक्षेत विद्यार्थ्यांना चक्क ९० गुण किंवा ५० हून अधिक गुण मिळाल्याचे निकालात (Exam results) दिसत आहे. बीएससी सेमिस्टर तीनच्या (BSC Semister 3) निकालातील हा प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे विद्यार्थीही चक्रावले.


सोलापूर विद्यापीठाकडून १३ डिसेंबर २०२३ पासून २२ डिसेंबरपर्यंत बीएससी सेमिस्टर ३ च्या परीक्षा पार पडल्या. याचा निकाल समोर येताच सर्वजण चकीत झाले. काही विद्यार्थ्यांना ५० गुणांच्या परीक्षेत एका विषयाला ५० हून अधिक गुण दिले गेले. या निकालामध्ये विद्यापीठाने ४० गुणांचा लेखी पेपर तर १० गुणांची असाइनमेंट अशी एकूण ५० गुणांची परीक्षा घेतली होती.


या परीक्षेचा ५ फेब्रुवारीला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या संकेतस्थळावर निकाल जाहीर करण्यात आला. मात्र, या निकालात झालेल्या चुकांमुळे विद्यार्थी गोंधळून गेले. क्लेरीकल चुकीमुळे हे घडल्याचं समोर आलं आहे. चूक लक्षात येताच विद्यार्थ्यांना गुणपत्रिका बदलून दिल्याची माहिती विद्यापीठाने दिली आहे. दरम्यान, क्लेरीकल चुकीमुळे केवळ चार विद्यार्थ्यांच्या बाबतीत असा प्रकार घडल्याची विद्यापीठ प्रशासनाने कबुली दिली आहे.

Comments
Add Comment

मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

रायगड : मुंबई-पुणे महामार्गावर बुधवारी सकाळी भीषण अपघात घडून तिघांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत एकूण पाच

लातूर जिल्ह्यात काढणीच्या तोंडावर पाऊस; शेतकरी चिंतेत

लातूर : दोन तीन दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढला होता. अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने नुकताच जाहीर केला

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतले छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन

पुणे : छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३७ व्या बलिदान स्मरणदिनानिमित्त राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि पुणे

सातारा येथे २२ मार्चला चतुर्थ ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद'

मंदिर-संस्कृतीच्या रक्षणार्थ एक हजारांहून अधिक मंदिर प्रतिनिधींची उपस्थिती सातारा : लाखो वर्षांपासून हिंदु

पाणी समजून प्यायलं थिनर; चार वर्षांच्या चिमुकल्याच्या तोंडापासून ते पोटापर्यंत...

ठाणे : ठाण्याच्या इंदिरानगरमध्ये एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. चार वर्षाच्या चिमुकल्याने चुकून पाणी समजून

मराठमोळ्या मुलीशी लग्न करुन आता पत्नीला बुरख्यातच ठेवतो; म्हणाल्या, पुरुष स्त्रियांकडे...

मुंबई: प्रसिद्ध युट्यूबर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अदनान शेख सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत