Ajit Pawar Vs Sharad Pawar : शरद पवार सुप्रीम कोर्टात जाण्यापूर्वीच अजित पवारांनी दाखल केली कॅव्हेट!

  115

काय असेल राष्ट्रवादीच्या राजकीय नाट्याचा पुढील अंक?


मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (Nationalist Congress Party) पडलेल्या फुटीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड उलथापालथी झाल्या. शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar) हे काका-पुतण्या एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले. मात्र, अजित पवारांकडे बहुमत असल्याने निवडणूक आयोगाने (Election commission) निकाल अजितदादांच्या बाजूने दिला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे नाव आणि घड्याळाचं चिन्ह अजितदादांना मिळाल्याने निवडणुका तोंडावर आल्या असताना शरद पवार गटाला प्रचंड मोठा धक्का बसला. हा निर्णय अमान्य असल्याने शरद पवार गटात सुप्रीम कोर्टात धाव घेणार आहे. मात्र, त्यापूर्वीच अजितदादांनी सुप्रीम कोर्टात धाव घेत कॅव्हेट (Caveat) दाखल केली आहे.


निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शरद पवार गटाकडून सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी केली जात आहे. मात्र यापूर्वीच अजित पवार गटाने मागणी केली आहे की विरोधी पक्षाकडून प्रकरणात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करण्यापूर्वी बाजू मांडण्याची संधी अजित पवार गटाला मिळावी. अजित पवार गटाने कॅव्हेट दाखल करत सर्वोच्च न्यायालयात शरद पवारांकडून या प्रकरणात कुठलीही याचिका दाखल झाल्यास त्यावर एकतर्फा निर्णय घेतला जाऊ नये असे म्हटले आहे.



कॅव्हेट काय असते?


कॅव्हेट म्हणजे इशारा’ किंवा ‘सावधानपत्र’. एखाद्या व्यक्तीला त्याच्याविरुद्ध दाखल झालेल्या किंवा दाखल होणाऱ्या दाव्याची पूर्वसूचना देण्यात यावी, त्याशिवाय त्या व्यक्तीविरुद्ध न्यायालयाने कोणताही एकतर्फा हुकूम देऊ नये, याकरिता करण्यात आलेला अर्ज म्हणजे कॅव्हेट. ही न्यायालयाला देण्यात आलेली एक कायदेशीर नोटीस असते.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या