EVM Machine : तहसील कार्यालयातून ईव्हीएम मशीनचं कंट्रोल युनिट चोरीला!

सासवडमधील धक्कादायक प्रकार


पुणे : आजवर दागिने,पैसे, मौल्यवान वस्तू यांसारख्या अनेक गोष्टींची चोरी झाल्याचे आपण ऐकले आहे. पण पुण्यातील (Pune) सासवडच्या (Saswad) तहसील कार्यालयात एक वेगळा व धक्कादायक प्रकार घडला आहे. या ठिकाणी ठेवण्यात आलेलं चक्क ईव्हीएम मशीनचं कंट्रोल युनिट (EVM Machine control unit) चोरीला गेलं आहे. निवडणुका तोंडावर आलेल्या असताना झालेल्या या प्रकारामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.


पुरंदर तालुक्यातील सासवड तहसील कार्यालयातील स्ट्रॉंगरूम मध्ये ईव्हीएम मशीन ठेवण्यात आल्या होत्या. मात्र, यापैकी एका मशीनच्या कंट्रोल युनिटचीच चोरी झाली आहे. यासंदर्भात पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.



नेमकं काय घडलं?


शनिवार आणि रविवार असे दोन दिवस सासवड तहसील कार्यालयाला सुट्टी होती. सोमवारी सकाळी अकरा वाजता तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांना स्ट्राँग रूमचं कुलूप तोडण्यात आलेलं आढळून आलं. या ठिकाणी असलेल्या ईव्हीएम मशीन मधून एका ईव्हीएम मशीनचे कंट्रोल युनिट चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याप्रकरणी आता वेगाने तपास सुरु आहे.

Comments
Add Comment

पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला; मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणावर हल्ला, परिसरात भीती

पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढत असून, रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये