EVM Machine : तहसील कार्यालयातून ईव्हीएम मशीनचं कंट्रोल युनिट चोरीला!

  96

सासवडमधील धक्कादायक प्रकार


पुणे : आजवर दागिने,पैसे, मौल्यवान वस्तू यांसारख्या अनेक गोष्टींची चोरी झाल्याचे आपण ऐकले आहे. पण पुण्यातील (Pune) सासवडच्या (Saswad) तहसील कार्यालयात एक वेगळा व धक्कादायक प्रकार घडला आहे. या ठिकाणी ठेवण्यात आलेलं चक्क ईव्हीएम मशीनचं कंट्रोल युनिट (EVM Machine control unit) चोरीला गेलं आहे. निवडणुका तोंडावर आलेल्या असताना झालेल्या या प्रकारामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.


पुरंदर तालुक्यातील सासवड तहसील कार्यालयातील स्ट्रॉंगरूम मध्ये ईव्हीएम मशीन ठेवण्यात आल्या होत्या. मात्र, यापैकी एका मशीनच्या कंट्रोल युनिटचीच चोरी झाली आहे. यासंदर्भात पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.



नेमकं काय घडलं?


शनिवार आणि रविवार असे दोन दिवस सासवड तहसील कार्यालयाला सुट्टी होती. सोमवारी सकाळी अकरा वाजता तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांना स्ट्राँग रूमचं कुलूप तोडण्यात आलेलं आढळून आलं. या ठिकाणी असलेल्या ईव्हीएम मशीन मधून एका ईव्हीएम मशीनचे कंट्रोल युनिट चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याप्रकरणी आता वेगाने तपास सुरु आहे.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या