Amruta Fadnavis : देवेंद्रजींनी मारले नाकर्तेपणावर बाण आणि मी घेऊन आले विकासाचे वाण!

अमृता फडणवीस यांच्या जबरदस्त उखाण्याने विरोधकांना बसला चाप


नागपूर : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) सोशल मीडियावर (Social Media) कायम चर्चेत असतात. त्यांचे अनेक व्हिडीओज आणि गाणी सोशल मीडियावर लगेच व्हायरल होतात. त्यातच आता नागपुरातील (Nagpur) 'विकासाचं वाण' या हळदी कुंकू कार्यक्रमात (Haldi kunkum Ceremony) अमृता फडणवीस यांनी घेतलेला जबरदस्त उखाणा (Amruta Fadnavis Ukhana) चर्चेत आला आहे. या उखाण्यातून अमृता फडणवीस यांनी विरोधकांना जोरदार टोला हाणला आहे.


नागपुरातील भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीने दक्षिण-पश्चिम मंडळाकडून या हळदी कुंकू कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये अमृता फडणवीस यांनी 'देवेंद्रजीनी मारले नाकर्तेपणावर बाण आणि मी घेऊन आले विकासाचे वाण, आपण सर्वांनी ते स्वीकारावे आणि एकत्र महाराष्ट्र करू निर्माण' असा उखाणा घेतला. या उखाण्यातून त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.



हळदी-कुंकू कार्यक्रमात गायलं गाणं


'विकासाचे वाण' या हळदी कुंकू कार्यक्रमावेळी अमृता फडणवीस यांनी उपस्थित महिलांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महिलांच्या आग्रहास्तव एक गाणंही गायलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी आणलेल्या अनेक योजनांनी महिलांना समाजात सन्मानाने उभं राहण्याची संधी उपलब्ध करून दिल्याचेही त्या यावेळी म्हणाल्या.

Comments
Add Comment

Gudi Padwa 2026 Muhurat: गुढीपाडव्याचा इतिहास काय आहे?, जाणून घ्या मुहूर्त, पूजा आणि विधी

मुंबई: हिंदू धर्मात गुढीपाडवा सणाला अतिशय महत्त्व आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा दिवस चैत्र शुद्ध

महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..!, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गुढी पाडव्याच्या शुभेच्छा

मुंबई: 'महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..' या आकांक्षेसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

राज्यातील सर्व जमिनींच्या फेरफार नोंदी तपासणार; महसूलमंत्र्यांची घोषणा

मुंबई: महसूल कायद्यातील कलम १५५ चा गैरवापर करून जमिनीच्या नोंदीत फेरफार करणाऱ्या आणि सर्वसामान्यांच्या जमिनी

मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

रायगड : मुंबई-पुणे महामार्गावर बुधवारी सकाळी भीषण अपघात घडून तिघांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत एकूण पाच

लातूर जिल्ह्यात काढणीच्या तोंडावर पाऊस; शेतकरी चिंतेत

लातूर : दोन तीन दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढला होता. अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने नुकताच जाहीर केला

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतले छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन

पुणे : छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३७ व्या बलिदान स्मरणदिनानिमित्त राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि पुणे