Madhya Pradesh fire : मध्यप्रदेशच्या फॅक्टरीत भीषण आग! ६ कामगारांचा मृत्यू तर ५० हून अधिक जण जखमी

२५ हून अधिक जण आगीत अडकल्याची भीती


भोपाळ : मध्यप्रदेशातील (Madhya Pradesh) हरदामध्ये (Harda) फटाक्याच्या कारखान्यात (Firecracker Factory) भीषण स्फोट (Blast) होऊन मोठी दुर्घटना घडली. या स्फोटात सहा लोकांचा मृत्यू झाला आहे, तर ५० हून अधिक लोक होरपळले आहेत. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. कारखान्यात आणखी २० ते २५ कामगार अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेनंतर मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी आपत्कालीन बैठक बोलावली, तसंच मुख्यमंत्री जातीने या घटनेवर लक्ष ठेवून आहेत.


हरदा येथील बैरागढ फटाका कारखान्यात स्फोट झाला. या कारखान्यात काही लोक अडकले आहेत. त्यांना सोडवण्यासाठी SDRF ची टीम पोहचली आहे. तसंच घटनास्थळी रुग्णवाहिकाही दाखल झाल्या आहेत. आगीचे भलेमोठे लोळ आणि धुराचे प्रचंड लोट या ठिकाणी पसरले आहेत. या ठिकाणी अग्निशमन दलाचे लोक पोहचले असून ते आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. कारण त्यानंतरच बचावकार्य करता येणार आहे. या फॅक्टरीत फटाके असल्याने आग वारंवार भडकते आहे.


हरदामध्ये झालेल्या या दुर्घटनेनंतर नर्मदापुरम आणि बैतूर या ठिकाणांहूनही एसडीआरएफचं पथक आणि मदतीचं साहित्य पाठवण्यात आलं आहे. तसंच नर्मदापुरम या ठिकाणाहून तीन रुग्णवाहिका आणि सहा अग्निशमन दलाच्या गाड्या पोहचल्या आहेत. तसंच एसडीआरएफचे १९ जवानही पोहचले आहेत.



मुख्यमंत्री मोहन यादव यांनी केली मदत जाहीर


मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी या घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाखांची मदत जाहीर केली आहे. तसंच जे लोक या घटनेत जखमी झाले आहेत त्यांच्या उपचारांचा सगळा खर्च राज्य सरकार करणार आहे असंही त्यांनी सांगितलं आहे. जे लोक या घटनेत होरपळले आहेत त्यांना भोपाळ, इंदूर येथील रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

Comments
Add Comment

प्रतिकूल हवामानामुळे वैष्णोदेवी यात्रा ७ ऑक्टोबरपर्यंत स्थगित

जम्मू :  जम्मू आणि काश्मीरमधील तीव्र हवामानाच्या इशाऱ्यामुळे, वैष्णोदेवी यात्रा ५ ते ७ ऑक्टोबर दरम्यान स्थगित

दार्जिलिंगमध्ये मुसळधार पावसाचा कहर; भूस्खलनात १७ जणांचा मृत्यू, सिक्कीमशी संपर्क तुटला

उत्तराखंड : दार्जिलिंगमध्ये झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाले असून, आतापर्यंत १७

‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना

मुंबई : ईशान्य अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘शक्ती’ (Shakti) या चक्रीवादळाची तीव्रता वाढत असून, पुढील काही दिवसांत

फास्टॅगशिवाय रोखीने पैसे भरणाऱ्यांना १५ नोव्हेंबरपासून लागणार दुप्पट टोल

नवी दिल्ली : केंद्र सरकारने टोल प्लाझाच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. वैध फास्टॅग असलेल्या वाहन

फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या कामाच्या धकाधकीत लोकांची झोपण्याची वेळ कमी होत चालली आहे. दिवसभरात बऱ्याच गोष्टी

लालूंच्या निवासस्थांनी उमेदवारीवरुन गोंधळ

पाटणा : बिहारमधील विधानसभेची निवडणूक अगदी जवळ आली आहे. इच्छुक उमेदवार आणि त्यांचे समर्थक तिकीट पक्के करण्यासाठी