झारखंडमध्ये आज शक्तीपरीक्षा, चंपाई बहुमत सिद्ध करणार का?

रांची : झारखंडमध्ये आज राजकीयदृष्ट्या सोमवारचा दिवस महत्त्वपूर्ण आहे. चंपाई सरकार आज विधानसभेत बहुमत सादर कऱणार आहे. शक्तीपरीक्षेत सामील होण्यासाठी झारखंड मुक्ती मोर्चा आणि सहकारी पक्षांचे एकूण ४० आमदार हैदराबाद येथून रांचीला परतले आहेत.


याआधी सर्व आमदारांना हैदराबादच्या एका रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आले होते. येथून ते रात्री उशिरा रांचीला परतले. माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेनही फ्लोर टेस्टमध्ये सामील होण्याची शक्यता आहे.


झारखंडच्या ८१ सदस्यी विधानसभेत बहुमताचा आकडा ४१ इतका आहे. गठबंधनाच्या हिशेबाने पाहिले असता चंपाई सरकारकडून बहुमताच्या या कमीतत कमी अंकापेक्षा पाच आमदार अधिक आहेत. विधानसभेच्या ८१ जागांपैकी एक जागा रिकामी आहे. यासाठी ८० जागांच्या गणनेनुसार बहुमताचा आकडा ४१ आहे. जेएमएमने दावा केला आहे की त्यांच्याकडे पुरेशी संख्या आहे आणि फ्लोर टेस्टला त्यांना कोणताही प्रॉब्लेम येणार नाही.


विधानसभेत जेएमएम, काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे एकूण ४६ आमदार आहेत. यात २८ जेएमएमचे, काँग्रेसचे १६, आरजेडीचा एक आणि सीपीआयच्या एका आमदाराचा समावेश आहे. विरोधी पक्ष भाजपा आणि त्यांचे सहकारी पक्षांकडे एकूण २९ आमदार आहेत.jha


माजी मु्ख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी राजीनामा दिल्यानंतर आणि जेलमध्ये गेल्यावर ही परिस्थिती बनली. यामुळे घाईघाईत चंपाई यांना मुख्यमंत्री बनवावे लागले. याआधी सप्टेंबर २०२२मध्ये हेमंत सोरेन यांच्या सरकारने फ्लोर टेस्टमध्ये आपल्या पक्षातील ४८ मतांसह बहुमत सिद्ध केले होते.

Comments
Add Comment

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीच्या मुदतवाढीवर सुप्रीम कोर्टात मंगळवारी सुनावणी

नवी दिल्ली : महाराष्ट्रात बहुप्रतिक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी जानेवारी

'वनतारा'चा मोठा विजय! रिलायन्सच्या ‘वनतारा’ला सर्वोच्च न्यायालयाची ‘क्लीन चिट’

नवी दिल्ली: प्राण्यांच्या खरेदी-विक्रीसंदर्भात कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप असलेल्या रिलायन्स

Railway Ticket Booking : १ ऑक्टोबरपासून बदलणार तिकीट बुकिंगचे नियम, या लोकांना होणार मोठा फायदा

मुंबई: भारतीय रेल्वेने ऑनलाइन तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये एक मोठा बदल केला आहे, जो 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू होणार

रतन टाटांचे TCS कार्यालय बंद होणार! हजारो नोकऱ्या धोक्यात

भोपाळ: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने मध्य प्रदेशातील भोपाळ येथील आपले कार्यालय १३ वर्षांनी बंद करण्याचा

BMW Car Accident: कारच्या धडकेने अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

नवी दिल्ली येथे काल रविवारी (१५ सप्टेंबर), अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागात उपसचिव म्हणून कार्यरत

वक्फ सुधारणा कायद्यातील निवडक तरतुदींना स्थगिती, जिल्हाधिकाऱ्यांना नसेल निर्णय घेण्याचा अधिकार

नवी दिल्ली : संसदेत याच वर्षी मंजूर झालेल्या वक्फ सुधारणा कायद्यातील काही तरतुदींना सोमवारी सर्वोच्च