झारखंडमध्ये आज शक्तीपरीक्षा, चंपाई बहुमत सिद्ध करणार का?

रांची : झारखंडमध्ये आज राजकीयदृष्ट्या सोमवारचा दिवस महत्त्वपूर्ण आहे. चंपाई सरकार आज विधानसभेत बहुमत सादर कऱणार आहे. शक्तीपरीक्षेत सामील होण्यासाठी झारखंड मुक्ती मोर्चा आणि सहकारी पक्षांचे एकूण ४० आमदार हैदराबाद येथून रांचीला परतले आहेत.


याआधी सर्व आमदारांना हैदराबादच्या एका रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आले होते. येथून ते रात्री उशिरा रांचीला परतले. माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेनही फ्लोर टेस्टमध्ये सामील होण्याची शक्यता आहे.


झारखंडच्या ८१ सदस्यी विधानसभेत बहुमताचा आकडा ४१ इतका आहे. गठबंधनाच्या हिशेबाने पाहिले असता चंपाई सरकारकडून बहुमताच्या या कमीतत कमी अंकापेक्षा पाच आमदार अधिक आहेत. विधानसभेच्या ८१ जागांपैकी एक जागा रिकामी आहे. यासाठी ८० जागांच्या गणनेनुसार बहुमताचा आकडा ४१ आहे. जेएमएमने दावा केला आहे की त्यांच्याकडे पुरेशी संख्या आहे आणि फ्लोर टेस्टला त्यांना कोणताही प्रॉब्लेम येणार नाही.


विधानसभेत जेएमएम, काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे एकूण ४६ आमदार आहेत. यात २८ जेएमएमचे, काँग्रेसचे १६, आरजेडीचा एक आणि सीपीआयच्या एका आमदाराचा समावेश आहे. विरोधी पक्ष भाजपा आणि त्यांचे सहकारी पक्षांकडे एकूण २९ आमदार आहेत.jha


माजी मु्ख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी राजीनामा दिल्यानंतर आणि जेलमध्ये गेल्यावर ही परिस्थिती बनली. यामुळे घाईघाईत चंपाई यांना मुख्यमंत्री बनवावे लागले. याआधी सप्टेंबर २०२२मध्ये हेमंत सोरेन यांच्या सरकारने फ्लोर टेस्टमध्ये आपल्या पक्षातील ४८ मतांसह बहुमत सिद्ध केले होते.

Comments
Add Comment

मेघालयमध्ये कोळसा खाणीत मोठी दुर्घटना

पूर्व जैंतिया हिल्स : मेघालयमधील पूर्व जैंतिया हिल्स (East Jaintia Hills district) जिल्ह्यातील कोळसा खाणीत मोठी दुर्घटना झाली. ही

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला