झारखंडमध्ये आज शक्तीपरीक्षा, चंपाई बहुमत सिद्ध करणार का?

Share

रांची : झारखंडमध्ये आज राजकीयदृष्ट्या सोमवारचा दिवस महत्त्वपूर्ण आहे. चंपाई सरकार आज विधानसभेत बहुमत सादर कऱणार आहे. शक्तीपरीक्षेत सामील होण्यासाठी झारखंड मुक्ती मोर्चा आणि सहकारी पक्षांचे एकूण ४० आमदार हैदराबाद येथून रांचीला परतले आहेत.

याआधी सर्व आमदारांना हैदराबादच्या एका रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आले होते. येथून ते रात्री उशिरा रांचीला परतले. माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेनही फ्लोर टेस्टमध्ये सामील होण्याची शक्यता आहे.

झारखंडच्या ८१ सदस्यी विधानसभेत बहुमताचा आकडा ४१ इतका आहे. गठबंधनाच्या हिशेबाने पाहिले असता चंपाई सरकारकडून बहुमताच्या या कमीतत कमी अंकापेक्षा पाच आमदार अधिक आहेत. विधानसभेच्या ८१ जागांपैकी एक जागा रिकामी आहे. यासाठी ८० जागांच्या गणनेनुसार बहुमताचा आकडा ४१ आहे. जेएमएमने दावा केला आहे की त्यांच्याकडे पुरेशी संख्या आहे आणि फ्लोर टेस्टला त्यांना कोणताही प्रॉब्लेम येणार नाही.

विधानसभेत जेएमएम, काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे एकूण ४६ आमदार आहेत. यात २८ जेएमएमचे, काँग्रेसचे १६, आरजेडीचा एक आणि सीपीआयच्या एका आमदाराचा समावेश आहे. विरोधी पक्ष भाजपा आणि त्यांचे सहकारी पक्षांकडे एकूण २९ आमदार आहेत.jha

माजी मु्ख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी राजीनामा दिल्यानंतर आणि जेलमध्ये गेल्यावर ही परिस्थिती बनली. यामुळे घाईघाईत चंपाई यांना मुख्यमंत्री बनवावे लागले. याआधी सप्टेंबर २०२२मध्ये हेमंत सोरेन यांच्या सरकारने फ्लोर टेस्टमध्ये आपल्या पक्षातील ४८ मतांसह बहुमत सिद्ध केले होते.

Recent Posts

या २ घरांच्या उंबरठ्यावरूनच मागे जाते लक्ष्मी, कुटुंबात राहते आर्थिक तंगी

मुंबई: आचार्य चाणक्य यांनी अशा घरांचे वर्णन निती शास्त्रात केले आहे जिथे लक्ष्मी मातेला जायला…

6 hours ago

विधिमंडळात विश्वविजेत्या क्रिकेटपटूंचा सत्कार; मुख्यमंत्र्यांकडून ११ कोटींचे बक्षीस

मुंबई : आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने दैदीप्यमान कामगिरी करत विश्वचषक जिंकला. भारतीय…

7 hours ago

Motorolaने भारतात लाँच केला नवा फ्लिप फोन, ५ इंचाचा कव्हर डिस्प्ले

मुंबई: Motorola Razr 50 Ultra गुरूवारी भारतात लाँच करण्यात आला. हा कंपनीचा नवा क्लॅमशेल-स्टाईलचा फोल्डेबल…

8 hours ago

Video: बरं झालं सूर्याच्या हाताला बॉल बसला नाहीतर…विधानभवनात रोहितची मराठीत फटकेबाजी

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकून आलेल्या टीम इंडियाचे गुरूवारी मुंबईत अतिशय भव्य दिव्य स्वागत झाले.…

8 hours ago

‘ब्रेन इटिंग अमिबा’ मुळे केरळमध्ये तीन मुलांचा मृत्यू

थिरुवनंतपुरम : केरळमध्ये दुषित पाण्यात आंघोळ केल्यामुळे १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. अमिबामुळे मेंदूला…

9 hours ago

T20 World Cup नंतर ऑलिम्पिकमध्ये फडकणार तिरंगा? राहुल द्रविडने पंतप्रधान मोदींना दिले वचन!

मुंबई: भारतीय खेळाडू टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर मायदेशात परतले आहेत. यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाच्या…

9 hours ago