प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी मुफ्ती सलमान अजहरींना अटक

मुंबई: गुजरातच्या जुनागढमध्ये प्रक्षोभक भाषण दिल्या प्रकरणी गुजरात एटीएसकडून रविवारी मुंबईचे इस्लाम अभ्यासक मुफ्ती सलमान अजहरी यांना अटक करण्यात आली. यादम्यान, त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली. जुनागढ येथे काही दिवसांपूर्वी दिलेल्या भाषणात गुजरात पोलिसांनी मुस्लिम मौलाना आणि इतर दोन लोकांविरोधात एफआयआर दाखल केला होता.पोलिसांनी मुफ्ती सलमान अजहरी यांना ताब्यात घेतले.


मुफ्ती सलमान अजहरी यांना मुंबईच्या घाटकोपर स्टेशन येथे ठेवण्यात आले. यावेळेस पोलीस ठाण्याच्या बाहेर त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान, कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी या परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मौलाना यांच्या वकिलांचे म्हणणे आहे की मुफ्ती सलमान तपासात संपूर्ण मदत करण्यास तयार आहेत.



समर्थकांना आंदोलन न करण्याचे अपील


दिवसाच्या वेळेस मुफ्ती सलमान अजहरी यांचे सोशल मीडिया हँडलवरून अनेक ट्वीट्स करण्यात आले. यात एकामध्ये म्हटले त्यांना गुजरात एटीएस, मुंबई एटीएस आणि चिराग नगर पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी सकाळी ११.५६ वाजता ताब्यात घेतले.


दरम्यान, प्रक्षोभक भाषण प्रकरणात आपल्या समर्थकांनी कोणत्याही प्रकारचे आंदोलन करू नये असे अपील करताना मौलाना दिसले.



काय आहे संपूर्ण प्रकरण?


मौलाना यांच्यावर ३१ जानेवारीला जुनागढ येथील एका कार्यक्रमादरम्यान प्रक्षोभक भाषण दिले असा आरोप आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी मुफ्ती सलमान, कार्यक्रमाचे आयोजन मोहम्मद युसुफ मलिक आणि अजीम हबीब ओडेदरा यांच्याविरोधात भारतीय दंड विधानाच्या कलम १५३ बी आणि ५०५(२) अंतर्गत एफआयआर दाखल केला.

Comments
Add Comment

Bandra Encroachment Removal Campaign : वांद्रे स्थानकाबाहेर अतिक्रमण हटाव मोहीम; अनधिकृत मशिदीवर महापालिकेची कारवाई

मुंबई : मुंबईतील वांद्रे स्थानकाबाहेरील परिसरात आज सकाळी मोठी अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली. या

IPL 2026 : आरसीबीसाठी दिलासादायक बातमी! विराट कोहलीचा ओपनिंग पार्टनर प्लेऑफपूर्वी संघात परतणार...

RCB : आयपीएल २०२६ मध्ये अनेक खेळाडू दुखापतीमुळे संघातून बाहेर झाले आहेत. त्यामुळे संघांना त्याचा मोठा फटका बसला

भूमी अभिलेख विभागाचा; राज्यात ५० नवी कार्यालये सुरु होणार; १० हजार पदांच्या आकृतीबंधालाही मूर्तरूप

मुंबई : प्रशासकीय कामकाज लोकाभिमुख आणि वेगवान करण्यासाठी, भूमी अभिलेख विभागाच्या सुधारित आकृतीबंधानुसार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तेजस नेटवर्क्स आणि महाआयटीमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या

महाराष्ट्रातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना दूरसंचार तंत्रज्ञानाचे जागतिक दर्जाचे प्रशिक्षण मिळणार मुंबई :

Virat Kohli : ९ वर्षांत कुणी विचारलंच नाही – तू कसा आहेस ? कसोटी कर्णधारपद सोडण्यावरून विराट कोहलीचा भावनिक खुलासा ..

बेंगळुरू : विराटने कसोटी कर्णधारपद सोडून आज ४ वर्षे उलटून गेली आहेत तरीही त्याच्या त्या निर्णयावर अजूनही बऱ्याच

Minister Nitesh Rane : राज्यातील जलवाहतूक सेवा होणार डिजिटल

 मंत्री नितेश राणे यांचे निर्देश; ऑनलाईन तिकीट व्यवस्थेची अंमलबजावणी करणार मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील