Ind vs Eng: तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडला विजयासाठी हव्यात ३३२ धावा

विशाखापट्टणम : भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळवल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडच्या १ बाद ६७ धावा झाल्या आहेत. इंग्लंडला विजयासाठी ३३२ धावांची आवश्यकता आहे.


पहिला विकेट गमावल्यानंतर इंग्लंडने रेहान अहमदला नाईट वॉचमन म्हणून तिसऱ्या स्थानावर पाठवले आणि तो विकेट वाचवण्यात यशस्वीही ठरला. याशिवाय सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताने दुसऱ्या डावात एकूण २५५ धावा केल्या.


तिसऱ्या दिवसाची सुरूवात भारताच्या दुसऱ्या डावासोबत झाली. तेव्हा भारताच्या बिनबाद २८ धावा झाल्या होत्या. या दरम्यान यशस्वी जायसवालने १७ बॉलमध्ये १५ तर कर्णधार रोहित शर्मा १९ बॉलमध्ये १३ धावांवर खेळत होते. भारतासाठी तिसरा दिवस काही खास राहिला नाही. कारण त्यांनी तीन सत्रे न खेळताना सर्व १० विकेट गमावल्या. या दरम्यान इंग्लंडसाठी स्पिनर टॉम हार्टलेने सर्वाधिक ३ विकेट मिळवल्या. भारतासाठी शुभमन गिलने शतक ठोकताना १४७ चेंडूत ११ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने १०४ धावांची खेळी केली.


दिवसाच्या तिसऱ्या सत्रात टीम इंडिया आपल्या दुसऱ्या डावात २५५ धावांवर ऑलआऊट झाली. दोन्ही डावांत बॅटिंग केल्यानंतर भारताने इंग्लंडसमोर ३९९ धावांचे आव्हान ठेवले. तिसरा दिवस संपेपर्यंत इंग्लंडने १ विकेट गमावताना ६७ धावा केल्या यानंतर दोन दिवसांमध्ये विजयासाठी ३२२ धावांचे आव्हान आहे.


दिवस संपेपर्यंत इंग्लंडसाठी सलामीवीर जॅक क्रॉली ५० चेंडूत ३ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने २९ धावांवर नाबाद आहे. तर रेहान अहमद ८ चेंडूत २ चौकारांच्या मदतीने ९ धावांवर नाबाद आहे.

Comments
Add Comment

FIFA WORLDCUP 2026 : कॅनडातील वणव्यांचा धूर आणि स्पेनच्या सराव सत्रावर परिणाम

कॅनडातील वणव्यांमुळे निर्माण झालेला विषारी धूर सध्या उत्तर अमेरिकेच्या अनेक भागांत पसरला आहे. या गंभीर हवामान

Football fever in Kolhapur : क्रिकेटच्या देशात फुटबॉलचा थरार; अर्जेंटिनाच्या विजयाने कोल्हापूर झाले 'फुटबॉलमय'!

Kolhapur : भारत हा तसा क्रिकेटवेडा देश, पण कोल्हापूरची गोष्टच न्यारी आहे! 'सॉकर सिटी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या

FIFA WORLDCUP 2026 : अर्जेंटिनाच्या टीकाकारांना मेस्सीचे चोख उत्तर: 'आम्हाला काहीही आयते मिळालेले नाही'

लिओनेल मेस्सीने अर्जेंटिनाच्या विश्वचषक प्रवासावर टीका करणाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत. "आम्हाला काहीही फुकट

Major Cricket League : एका सामन्यात ३ शतकं, ५१ सिक्स अन् ५३७ रन; क्रिकेटच्या इतिहासात लिहिला गेला नवा अध्याय

मुंबई : टी-२० क्रिकेटच्या इतिहासात असा सामना पाहायला मिळाला, ज्याने या फॉरमॅटमधील (Format) जवळपास सगळे मोठे विक्रम (Records)

ICC : वर्ल्ड कपमध्ये आयसीसीचा ‘मास्टर प्लॅन’? भारत-पाक सामन्यांसाठी मोठा बदल

मुंबई : क्रिकेट विश्वातील सर्वात चर्चेचा विषय ठरलेला भारत-पाकिस्तान सामना पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला आहे.

Rohit Sharma Retirement News : रोहित शर्माच्या निवृत्तीची चर्चा; इंग्लंडविरुद्धचा सामना ठरणार शेवटचा?

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा (Indian Cricket Team) माजी कर्णधार आणि अनुभवी फलंदाज (Batsman) रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या वनडे (ODI)