Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांना मिळणार सरकारी सुरक्षा

पोलीस कर्मचारी करणार तैनात


जालना : जालना (Jalna) येथील आंतरवाली सराटी येथून सुरु झालेला मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रवास आता अखेरच्या टप्प्यात आला आहे. आरक्षणासाठी उपोषण करमारे आणि ठिकाणठिकाणचे दौरे करुन मराठा बांधवांना एकत्रित करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचा लढा येत्या काही दिवसांतच संपण्याची शक्यता आहे. त्याच दरम्यान, जरांगेंबाबत राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. मनोज जरांगे यांना राज्य सरकारकडून (State Government) सुरक्षा (Security) पुरवण्यात येणार आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.


राज्य गुप्त वार्ता विभागाच्या आदेशाने मनोज जरांगे यांना सरकारी सुरक्षा प्रदान करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जरांगे यांच्या सुरक्षेसाठी २४ तास दोन सशस्त्र पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. दरम्यान, त्याआधी सकल मराठा समाजाकडून मुख्यमंत्र्यांकडे मनोज जरांगे यांना सुरक्षा पुरवण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार आजपासून दोन कॉन्स्टेबल सुरक्षेसाठी नेमण्यात आले आहेत.


आंतरवाली सराटी गावात २९ ऑगस्ट रोजी सुरु झालेला जरांगेचा लढा पोलिसांनी आंदोलकांवर केलेल्या लाठीचार्जमुळे राज्यभर पोहोचला. जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही, अशी भूमिका मनोज जरांगे यांनी घेतली होती. जरांगे यांच्या आंदोलनाने राज्यातील मराठा आरक्षण आंदोलनाचा वणवा पुन्हा एकदा पेटला. मराठा समाजाने आरक्षणासाठी मुंबईवर मोर्चा काढला. या मुंबई मोर्चाला मोठा प्रतिसाद मिळाला. त्यानंतर नवी मुंबईत आल्यानंतर राज्य सरकारने जरांगे यांना सरकारने आश्वासन दिल्यानंतर मोर्चा स्थगित करण्यात आला. यानंतर आता जरांगेंना सुरक्षा पुरवण्यात आली आहे.


Comments
Add Comment

कोकणवासीयांचा 'शिमगा' गोड

मुंबई-विजयदुर्ग जलप्रवासाचा १ मार्चपासून श्रीगणेशा; मंत्री नितेश राणे यांचे स्वप्न साकार मुंबई : कोकणच्या लाल

Kumbhdoot App : मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले 'कुंभदूत ॲप'चे अनावरण

- एआय समिटमधील महाराष्ट्र पॅव्हेलियनला भेट नवी दिल्ली येथील भारत मंडपम येथे आयोजित 'इंडिया एआय समिट २०२६' मध्ये

सैनिक शाळेत शिकण्याची सुवर्णसंधी

पुणे : महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय भारतीय सैन्य महाविद्यालय, डेहराडून, उत्तराखंड येथील इयत्ता

नोकरी लावून देतो सांगत २५ वर्षीय तरुणीवर अत्याचार; शरद पवार गटाच्या जिल्हाध्यक्षाविरुद्ध गुन्हा दाखल

अहिल्यानगर शहरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. अहिल्यानगर शहरात शरद पवार गटाच्या जिल्हाध्यक्षाविरुद्ध

चक्क व्हॉट्सअ‍ॅप वरून बारावीचा पेपर मुलांपर्यंत पोहोचला? नागपुरातील धक्कादायक प्रकार समोर

मुंबई : राज्यात सध्या परीक्षेचे वारे वाहत आहेत, दहावी आणि बारावीची मुले आपल्या आयुष्यातील निर्णायक परीक्षा देत

भिगवण प्रकरणाला कलाटणी; मुलीने फिरवली बाजी निवडली पोलिसांची गाडी

पुणे : पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुका मधील भिगवण येते घडलेल्या अपहरण प्रकरणाचे दिवसेंदिवस नवीन पैलू उलघडत जात