Mumbai police : मुंबईत सहा ठिकाणी बॉम्ब ठेवल्याचा मेसेज; पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर

पुणे पोलिसांनाही आला होता धमकीचा मेसेज


मुंबई : मुंबई वाहतूक पोलीस नियंत्रण कक्षाला (Mumbai Traffic Police Control Room) धमकीचा एक मेसेज (Threat message) आला आहे. अज्ञात व्यक्तीकडून हा मेसेज पाठवण्यात आला आहे. मुंबईमध्ये सहा ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात आल्याची धमकी या मेसेजमध्ये देण्यात आली आहे. त्यानंतर मुंबई पोलीस आणि इतर यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. संदेश पाठवणाऱ्याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच सर्व यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत.


याआधी पुणे पोलिसांच्या कंट्रोलरुमध्येही धमकीचा मेसेज आला. गुरुवारी रात्री पुणे पोलिसांच्या कंट्रोल रूमच्या व्हॉट्सअप नंबरवर पुना हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याचा मेसेज आला होता. त्यानंतर पुना हॉस्पिटलची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. बॉम्ब शोधक पथके देखील पुना हॉस्पिटलमधे तैनात करण्यात आली होती. धमकीचा हा मेसेज करणाऱ्या व्यक्तीचा पोलीस शोध घेत आहेत.


मुंबई पोलिसांना धमकीचे मेसेज येण्याची ही पहिली वेळ नव्हे. मात्र मुंबई पोलीस आपल्या सतर्कतेने काही तासांच्या आतच या आरोपींच्या मुसक्या आवळतात आणि संभाव्य धोका टाळतात. यावेळेसही मुंबई पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर आली असून कसून तपास सुरु आहे.


Comments
Add Comment

BMC: दादरच्या जे.के.सावंत मार्गावरील सार्वजनिक वाहनतळात स्थानिकांना ५० टक्के सवलत

मॉडेल वाहनतळ म्हणून प्रायोगिक तत्वावर करणार विकसित पहिल्या टप्प्यात ४०० मासिक पास उपलब्ध मुंबई (विशेष

BMC Action : हॉटेलच्या मोकळ्या जागांचा अनधिकृत वापर

अंधेरीतील ‍हॉट्स युअर बहाना, ट्रोव्‍ह ९, ज्‍युलिएट व याझु या हॉटेलांचे वाढीव बांधकामांवर कारवाई मुंबई : सेवा

BMC : नगरसेवकांचे सर्व मानधन पुढील आठवड्यात होणार खात्यात जमा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महापालिकेच्या (BMC) निवडून आलेल्या २२७ नगरसेवकांसह १० नामनिर्देशित नगरसेवकांना

BMC : मुंबई महानगरपालिका मुख्यलयात मंत्रालयाच्या धर्तीवर प्रवेश

मुंबई  : मुंबई महापालिका मुख्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी प्राप्त झाल्यानंतर पुन्हा एकदा महापालिका

BMC मुख्यालय उडवून देण्याची धमकी, महापौरांसह इमारतीच्या सुरक्षेत वाढ

महापािलका मुख्यालय उडवून देण्याची धमकी ; महापौरांसह इमारतीच्या सुरक्षेत वाढ अशा धमक्यांना मी मुळीच घाबरत नाही-

अवकाळी पावसाने बाधित फळपिकांचे पंचनामे पूर्ण करा, कृषिमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : 'राज्यात मे आणि जून २०२६ या कालावधीत अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे बाधित झालेल्या फळपिकांच्या