Mumbai police : मुंबईत सहा ठिकाणी बॉम्ब ठेवल्याचा मेसेज; पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर

पुणे पोलिसांनाही आला होता धमकीचा मेसेज


मुंबई : मुंबई वाहतूक पोलीस नियंत्रण कक्षाला (Mumbai Traffic Police Control Room) धमकीचा एक मेसेज (Threat message) आला आहे. अज्ञात व्यक्तीकडून हा मेसेज पाठवण्यात आला आहे. मुंबईमध्ये सहा ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात आल्याची धमकी या मेसेजमध्ये देण्यात आली आहे. त्यानंतर मुंबई पोलीस आणि इतर यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. संदेश पाठवणाऱ्याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच सर्व यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत.


याआधी पुणे पोलिसांच्या कंट्रोलरुमध्येही धमकीचा मेसेज आला. गुरुवारी रात्री पुणे पोलिसांच्या कंट्रोल रूमच्या व्हॉट्सअप नंबरवर पुना हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याचा मेसेज आला होता. त्यानंतर पुना हॉस्पिटलची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. बॉम्ब शोधक पथके देखील पुना हॉस्पिटलमधे तैनात करण्यात आली होती. धमकीचा हा मेसेज करणाऱ्या व्यक्तीचा पोलीस शोध घेत आहेत.


मुंबई पोलिसांना धमकीचे मेसेज येण्याची ही पहिली वेळ नव्हे. मात्र मुंबई पोलीस आपल्या सतर्कतेने काही तासांच्या आतच या आरोपींच्या मुसक्या आवळतात आणि संभाव्य धोका टाळतात. यावेळेसही मुंबई पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर आली असून कसून तपास सुरु आहे.


Comments
Add Comment

Bandra Encroachment Removal Campaign : वांद्रे स्थानकाबाहेर अतिक्रमण हटाव मोहीम; अनधिकृत मशिदीवर महापालिकेची कारवाई

मुंबई : मुंबईतील वांद्रे स्थानकाबाहेरील परिसरात आज सकाळी मोठी अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली. या

IPL 2026 : आरसीबीसाठी दिलासादायक बातमी! विराट कोहलीचा ओपनिंग पार्टनर प्लेऑफपूर्वी संघात परतणार...

RCB : आयपीएल २०२६ मध्ये अनेक खेळाडू दुखापतीमुळे संघातून बाहेर झाले आहेत. त्यामुळे संघांना त्याचा मोठा फटका बसला

भूमी अभिलेख विभागाचा; राज्यात ५० नवी कार्यालये सुरु होणार; १० हजार पदांच्या आकृतीबंधालाही मूर्तरूप

मुंबई : प्रशासकीय कामकाज लोकाभिमुख आणि वेगवान करण्यासाठी, भूमी अभिलेख विभागाच्या सुधारित आकृतीबंधानुसार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तेजस नेटवर्क्स आणि महाआयटीमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या

महाराष्ट्रातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना दूरसंचार तंत्रज्ञानाचे जागतिक दर्जाचे प्रशिक्षण मिळणार मुंबई :

Virat Kohli : ९ वर्षांत कुणी विचारलंच नाही – तू कसा आहेस ? कसोटी कर्णधारपद सोडण्यावरून विराट कोहलीचा भावनिक खुलासा ..

बेंगळुरू : विराटने कसोटी कर्णधारपद सोडून आज ४ वर्षे उलटून गेली आहेत तरीही त्याच्या त्या निर्णयावर अजूनही बऱ्याच

Minister Nitesh Rane : राज्यातील जलवाहतूक सेवा होणार डिजिटल

 मंत्री नितेश राणे यांचे निर्देश; ऑनलाईन तिकीट व्यवस्थेची अंमलबजावणी करणार मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील