Manipur violence: मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार, गोळीबारात २ जणांचा मृत्यू

इंफाळ: मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार भडकला आहे. मंगळवारी येथे गोळीबार झाला. या दरम्यान दोन लोकांचा मृत्यू झाला. या हिंसाचारादरम्यान भारतीय जनता पक्षाचे माजी युवा अध्यक्षांसह पाच जण जखमी झाल्याची माहिती आहे. पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांच्या संख्येत वाढ होऊ शतकते.


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मणिपूरमधील हा गोळीबार मंगळवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास सुरू झाला. त्यानंतर अनेक तास हा गोळीबार सुरू होता. या गोळीबारात मृत झालले्या लोकांची ओळख पटली आहे. ३३ वर्षीय नोंगथोम्बम मायकल आणि २५ वर्षीय मीस्नाम खाबा अशी यांची नावे आहेत. दोघांचे मृतदेह रीजनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सला नेण्यात आले.



काय म्हणतायत मणिपूर पोलीस?


मणिपूर पोलिसांनी आपल्या अधिकृत हँडलवरून याची माहिती दिली. त्यात त्यांनी सांगितले की इंफाळ पश्चिम आणि कांगपोकपी जिल्ह्यात सीमेवर दोन गटाच्या लोकांमध्ये गोळीबार झाला.



महिन्याभरात ९ जणांचा मृत्यू


एका रिपोर्टनुसार गेल्या एक महिन्यात मणिपूरमध्ये उसळलेल्या हिंसाचारात कमीत कमी ९ लोकांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये हिंसाक्षेत्र भागात तैनात असलेल्या दोन पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. सुबेमध्ये गेल्या वर्षी ३ मे २०२२मध्ये झालेल्या हिंसाचारात १८०हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता तर ३०००हून अधिक जखमी झाले होते. या हिंसाचारात हजारो लोक स्थलांतरित झालेत.

Comments
Add Comment

माजी सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाला चोप! समाज माध्यमांवर व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली: देशाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई सरन्यायाधीशपदावर असताना त्यांच्यावर भर सुनावणी दरम्यान बुट फेकून

भारताच्या विकासात वाढणार एआयचा वेग; मायक्रोसॉफ्टने भारतात केली तब्बल १७.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक!

नवी दिल्ली: जगावर सध्या एआयची भूरळ आहे. भविष्यातही असंख्य गोष्टी एआयमुळे नष्ट होणार आहेत असा अंदाजही आतापासून

अवघ्या २० मिनिटांत अब्जाधीश झाला, असं काय घडलं त्या भारतीय माणसासोबत ?

नवी दिल्ली : प्रत्येक माणसाच्या आयुष्यात आलेला आनंदाचा क्षण कधी दुःखात आणि संकटात बदलेल हे सांगता येत नाही . एका

राज्यसभेत 'वंदे मातरम'वर बोलले अमित शाह, त्यांच्या भाषणातील महत्त्वाचे १० मुद्द

  नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी राज्यसभेत वंदे मातरमवर चर्चा सुरू केली. त्यांनी हे

वंदे मातरम् ही पवित्र प्रतिज्ञा : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : वंदे मातरम् हे केवळ राजकीय संघर्षाचे घोषवाक्य नव्हते, तर भारत मातेला गुलामगिरीतून मुक्त करण्याची

गोवा क्लब अग्निकांडातील मुख्य आरोपींनी ठोकली परदेशात धूम!

गोवा: गोव्यातील बर्च बाय रोमियो लेन क्लब अग्निकांड प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणजे क्लबचे मालक सौरभ आणि गौरव