Manipur violence: मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार, गोळीबारात २ जणांचा मृत्यू

इंफाळ: मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार भडकला आहे. मंगळवारी येथे गोळीबार झाला. या दरम्यान दोन लोकांचा मृत्यू झाला. या हिंसाचारादरम्यान भारतीय जनता पक्षाचे माजी युवा अध्यक्षांसह पाच जण जखमी झाल्याची माहिती आहे. पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांच्या संख्येत वाढ होऊ शतकते.


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मणिपूरमधील हा गोळीबार मंगळवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास सुरू झाला. त्यानंतर अनेक तास हा गोळीबार सुरू होता. या गोळीबारात मृत झालले्या लोकांची ओळख पटली आहे. ३३ वर्षीय नोंगथोम्बम मायकल आणि २५ वर्षीय मीस्नाम खाबा अशी यांची नावे आहेत. दोघांचे मृतदेह रीजनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सला नेण्यात आले.



काय म्हणतायत मणिपूर पोलीस?


मणिपूर पोलिसांनी आपल्या अधिकृत हँडलवरून याची माहिती दिली. त्यात त्यांनी सांगितले की इंफाळ पश्चिम आणि कांगपोकपी जिल्ह्यात सीमेवर दोन गटाच्या लोकांमध्ये गोळीबार झाला.



महिन्याभरात ९ जणांचा मृत्यू


एका रिपोर्टनुसार गेल्या एक महिन्यात मणिपूरमध्ये उसळलेल्या हिंसाचारात कमीत कमी ९ लोकांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये हिंसाक्षेत्र भागात तैनात असलेल्या दोन पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. सुबेमध्ये गेल्या वर्षी ३ मे २०२२मध्ये झालेल्या हिंसाचारात १८०हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता तर ३०००हून अधिक जखमी झाले होते. या हिंसाचारात हजारो लोक स्थलांतरित झालेत.

Comments
Add Comment

भारत-पाकिस्तान संघर्षामधील मध्यस्थीचा आणखी एक दावेदार, चीनचा दावा भारताने फेटाळला

नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत

ओडिशाच्या किनाऱ्यावरून एकाच लाँचरमधून लागोपाठ दोन प्रलय क्षेपणास्त्रांचे यशस्वी प्रक्षेपण

हैद्राबाद : संरक्षण क्षेत्रात भारताने आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने

माजी एनआयए प्रमुख सदानंद दातेंची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती

मुंबई : माजी एनआयए प्रमुख सदानंद दाते यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झाली आहे. ही नियुक्ती

अयोध्येत रामलल्लाच्या प्राण-प्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली : अयोध्येत रामलल्लाच्या अर्थात प्रभू रामाच्या प्राण-प्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या वर्धापनदिनाच्या

स्वच्छ शहर इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे मृत्यू, प्रशासनावर गंभीर आरोप

इंदूर : देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे.

तिथीनुसार आज राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! अयोध्येत आनंदाचे वातावरण

अयोध्या: समस्त हिंदूंच्या संस्कृतीचे प्रतिक असलेल्या राम मंदिराचा आज दुसरा वर्धापन आहे. तिथीनुसार म्हणजेच