Manipur violence: मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार, गोळीबारात २ जणांचा मृत्यू

  86

इंफाळ: मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार भडकला आहे. मंगळवारी येथे गोळीबार झाला. या दरम्यान दोन लोकांचा मृत्यू झाला. या हिंसाचारादरम्यान भारतीय जनता पक्षाचे माजी युवा अध्यक्षांसह पाच जण जखमी झाल्याची माहिती आहे. पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांच्या संख्येत वाढ होऊ शतकते.


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मणिपूरमधील हा गोळीबार मंगळवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास सुरू झाला. त्यानंतर अनेक तास हा गोळीबार सुरू होता. या गोळीबारात मृत झालले्या लोकांची ओळख पटली आहे. ३३ वर्षीय नोंगथोम्बम मायकल आणि २५ वर्षीय मीस्नाम खाबा अशी यांची नावे आहेत. दोघांचे मृतदेह रीजनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सला नेण्यात आले.



काय म्हणतायत मणिपूर पोलीस?


मणिपूर पोलिसांनी आपल्या अधिकृत हँडलवरून याची माहिती दिली. त्यात त्यांनी सांगितले की इंफाळ पश्चिम आणि कांगपोकपी जिल्ह्यात सीमेवर दोन गटाच्या लोकांमध्ये गोळीबार झाला.



महिन्याभरात ९ जणांचा मृत्यू


एका रिपोर्टनुसार गेल्या एक महिन्यात मणिपूरमध्ये उसळलेल्या हिंसाचारात कमीत कमी ९ लोकांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये हिंसाक्षेत्र भागात तैनात असलेल्या दोन पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. सुबेमध्ये गेल्या वर्षी ३ मे २०२२मध्ये झालेल्या हिंसाचारात १८०हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता तर ३०००हून अधिक जखमी झाले होते. या हिंसाचारात हजारो लोक स्थलांतरित झालेत.

Comments
Add Comment

अभिनेता सलमान खानने घेतली राजनाथ सिंह यांची भेट

नवी दिल्ली : अभिनेता सलमान खानने आज, रविवारी दिल्लीत लखनौचे खासदार आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट

आसारामला मोठा झटका! हायकोर्टाने अंतरिम जामीन नाकारला, ३० ऑगस्टपर्यंत आत्मसमर्पण करण्याचे आदेश

नवी दिल्ली: अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूच्या अडचणी

एकाच पाषाणात १९० टन वजनाची गणेशमूर्ती

कोईम्बतूर : दक्षिण भारतातील ‘मँचेस्टर’ म्हणून ओळखले जाणारे कोईम्बतूर शहर अद्वितीय गणेश मंदिरासाठी प्रसिद्ध

रशियाकडून तेल खरेदी करत भारताने रोखले जागतिक संकट, अहवालात मोठा खुलासा

नवी दिल्ली: रशियाकडून भारत तेल खेरदी करत असल्याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्या विरोधात

दहशतवादी संघटनांना मदत करणारा समंदर चाचा उर्फ '​​Human GPS' चकमकीत ठार, भारतीय सुरक्षा दलाला मोठं यश

जम्मू आणि काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या गुरेझ सेक्टरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश आलं आहे. दहशतवादी

जम्मू-काश्मीर: रामबनमध्ये ढगफुटीमुळे हाहाकार; तीन ठार, पाच बेपत्ता

जम्मू-काश्मीर: जम्मू आणि काश्मीरमधील रामबन जिल्ह्यात ढगफुटीसदृश पाऊस आणि भूस्खलनामुळे मोठे नुकसान झाले आहे.