paytmवर रिझर्व्ह बँकेकडून मोठी कारवाई

नवी दिल्ली: ऑनलाईन पेमेंटची सुविधा बहाल करणारी दिग्गज कंपनी पेटीएमला(paytm) भारतीय रिझर्व्ह बँकेकडून(indian reserve bank) मोठा झटका बसला आहे. खरंतर, बुधवारी डिजीटल पेमेंट आणि फायनान्शियल सर्व्हिस देणारी कंपनी पेटीएमच्या बँकिंग शाखा पेटीएम पेमेंट बँकेला नवे ग्राहक जोडण्यावर बंदी घालण्यात आली आहे. म्हणजेच PPBLमध्ये आता कोणतेही नवे ग्राहक जोडले जाणार नाहीय. भारतीय रिझर्व्ह बँकेने बुधवारी हे आदेश दिले.

डिपॉझिट टॉपअप स्वीकारले जाणार नाहीत


पेटीएम पेमेंट बँकने नवे ग्राहक जोडण्यावरील बंदीसोबतच आरबीआयने हे आदेशही दिलेत की पेटीएम पेमेंट्स बँक २९ फेब्रुवारी २०२४ यानंतर कोणत्याही ग्राहकाचे खाते, वॉलेट आणि फास्टटॅगमध्ये डिपॉझिट अथवा टॉपअप स्वीकार करणार नाही.

बँकेच्या ग्राहकांकडून सेव्हिंग अकाऊंट, करंट अकाऊंट, प्रीपेड इस्ट्रुमेंटेस, फास्टॅटॅग, नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डसह आपल्या खात्यात राहिलेली रक्कम अथवा त्याचा उपयोगाची परवानगी कोणत्याही बंदीशिवाय दिली जाणार आहे.आरबीआयने पेटीएम पेमेंट्स  बँकविरुद्ध ही कारवाई बँकिंग रेग्युलेशन अॅक्ट १९४९ च्या कलम ३५ए अंतर्गत केली आहे.

पेटीएमच्या शेअर्सवर दिसू शकतो परिणाम


रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयाचा परिणाम गुरूवारी पेटीएमच्या शेअर्सवर दिसू शकतो. गेल्या काही दिवसांपूर्वी कंपनीच्या शेअर्समध्ये २० टक्क्यांपर्यंत घसरले होते.
Comments
Add Comment

El Nino: चिंतेची बातमी, १९०१ नंतर भारतात सर्वात कमी पाऊस असलेला पाचवा जून

नवी दिल्ली : भारतात १९०१ पासूनच्या नोंदीनुसार यावर्षी जून महिन्यात पाचव्या क्रमांकाचा सर्वात कमी पाऊस झाला आहे.

Haldia Refinery Fire : हल्दिया रिफायनरीच्या पाइपलाइनला आग; १५ कर्मचारी जखमी, रेल्वे सेवेवरही परिणाम

कोलकाता : पश्चिम बंगालमधील पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील हल्दिया पेट्रोकेमिकल्सच्या नॅफ्था पुरवठा पाइपलाइनला

General Upendra Dwivedi : जनरल उपेंद्र द्विवेदी निवृत्त; जनरल धीरज सेठ नवे सैन्य प्रमुख

नवी दिल्ली : भारतीय लष्कराचे प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी मंगळवारी आपल्या पदावरून निवृत्त झाले. निवृत्तीपूर्वी

Supreme Court : 'त्या' प्रकरणात आसारामला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा नाहीच; अंतरिम जामीनावर तत्काळ सुनावणीस नकार

Supreme Court : अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या आसारामला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा धक्का

Assam Rain : ईशान्य भारतात पावसाचा कहर! आसाममध्ये महापूराने रेल्वे पूल वाहून गेला; २२ हजार नागरिक बेघर, १२ जिल्ह्यांचा संपर्क तुटला

- ६० वर्षांपूर्वीचा रेल्वे पूल कोसळला; रेल्वे वाहतुकीवर परिणाम गुवाहाटी : ईशान्य भारतात मुसळधार पावसाने थैमान

NEET Case : नीटप्रकरणी १० आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत ११ जुलैपर्यंत वाढ

नवी दिल्ली: नीट परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने तपासाचा वेग वाढवला आहे. दिल्लीतील राऊस एव्हेन्यू