या कारणामुळे शरीरात बनतो कफ, करा हे उपाय मिळेल कफापासून सुटका

मुंबई: थंडीच्या दिवसात सर्दी-खोकल्याने सारेजण हैरण होतात. या मोसमात शरीरात मोठ्या प्रमाणात कफ जमा होतो. काही लोकांना तर या संपूर्ण हंगामादरम्यान सर्दीखोकल्याचा त्रास होत असते. अशातच तुम्हाला माहीत असणे गरजेचे असते की शरीरात कफ बनण्याचे काय कारण आहे.



शरीरामध्ये कफ का तयार होतो?


कफ एक पातळ चिकट द्रव्य पदार्थ आहे जे तुमच्या श्वासनलिकेची सफाई करण्यात महत्त्वाची भूमिका निभावतो. मात्र जर हा कफ वाढला तर तुमच्यासाठी बऱ्याच समस्या निर्माण करतो. घश्यात खवखव, सातत्याने खोकला, यामुळे उलटी होणे हे कफ वाढल्यामुळे होऊ शकते. शरीरात कफ वाढल्याने श्वासनलिकेला सूज, अॅल्रजी, घश्यात अथवा फुफ्फुसांमध्ये जळजळ, फुफ्फुसांचा कॅन्सर, सिस्टीक फायब्रोसिस, ब्रोन्कायटिससारखे आजार निर्माण होऊ शकतात.



काय आहेत कफ कमी करण्याचे उपाय


खूप पाणी प्या


डिहायड्रेशनमुळे कफ वाढतो. यामुळे जितके शक्य असेल तितके पाणी प्या. तसेच मुलांनाही भरपूर पाणी द्या. दिवसभर स्वत:ला हायड्रेट ठेवा. पाणी प्यायल्याने कफ मोकळा होण्यास मदत होते तसेच आरामात बाहेर निघतो. श्वास नलिकेत कफ जमा झाल्यास तो पाणी प्यायल्याने बाहेर निघण्यास मदत होते.



घरात रूम हीटरचा वापर नका करू


कोरड्या हवेमुळेही शरीरात कफ वाढू लागको. स्टीम शॉवरच्या माध्यमातून कफ बाहेर काढण्याचा प्रयत्न करा.



मिठाच्या पाण्याने गुळण्या करा


घश्यात खवखव अथवा कफ जमा झाल्याने कोमट पाण्यात मीठ मिसळून गुळण्या करा. यामुळे घश्याची सूज कमी होईल.

Comments
Add Comment

Summer Tips : दही आणि ताक या दोन्हीपैकी उन्हाळ्यात पोटाच्या आरोग्यासाठी काय भारी ? जाणून घ्या

मुंबई : उन्हाळ्याचा तडाखा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. त्यामुळे अनेकजण उन्हाळ्यात दही आणि ताक घेणं पसंत

महिलांना नसतो हृदयविकाराचा धोका ? कारण जाणून घ्या

हृदयविकाराचा झटका हा आजच्या काळातील सर्वात धोकादायक आणि सामान्य आजारांपैकी आहे. जेव्हा हृदयाकडे होणारा

जाणून घ्या लसूण आणि मधाचे चमत्कारिक फायदे

- रोज सकाळी रिकाम्या पोटी सेवन करणे ठरते फायदेशीर तुम्हाला माहित आहे का की रोजच्या जेवणाची चव वाढवणारा लसूण

'या' फळाचं नियमित सेवन ठरेल फायदेशीर, जाणून घ्या फायदे

आपल्या आरोग्यासाठी फळे ही अंत्यत फायदेशीर असतात. त्यामुळे फळांच सेवन करणं महत्वाचं मानलं जातं. यापैकीच चिकू हे

Homemade Chyawanprash: देशी च्यवनप्राश हिवाळ्यात वारंवार होणारे आजार टाळेल घरगुती, जाणून घ्या सोपी रेसिपी

मुंबई : हिवाळा ऋतूमध्ये खोकला, सर्दी आणि अशक्तपणाच्या तक्रारी येतात. मजबूत प्रतिकारशक्ती राखणे अत्यंत महत्वाचे

वजन कमी आणि सौंदर्यासाठी आवळ्याचा जादुई फॉर्म्युला

मुंबई : शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग्य आणि संतुलित पोषण मिळणे अत्यंत आवश्यक असते. व्हिटॅमिन सी आणि