Manoj jarange : घरी जाण्याआधी मनोज जरांगेंनी बोलावली गोदा पट्ट्यातील आंदोलकांची बैठक

काय आहे कारण?


जालना : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या लढयाला अखेर काल यश आले. राज्य सरकारने मराठा समाजाच्या (Maratha Samaj) सर्व मागण्या मान्य केल्या. त्यामुळे उपोषणकर्ते मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उपोषण सोडले. संपूर्ण मराठा समाजात यानंतर आनंदाचे व उत्साहाचे वातावरण आहे. ठिकठिकणी पेढे वाटून, गुलाल उधळून हा जल्लोष साजरा केला जात आहे.


हे आरक्षण मिळेपर्यंत घराच्या उंबर्‍यावर पायदेखील ठेवायचा नाही, असा निश्चय मनोज जरांगे केला होता. यामुळे ते घरी कधी येणार याची सर्वजण वाट पाहत असतानाच मनोज जरांगे यांनी आंतरवाली सराटी येथे गोदा पट्ट्यातील आंदोलकांची बैठक बोलावली आहे. आज दुपारी १२ वाजता ही बैठक होणार आहे.


मराठा आरक्षणाचा निर्णय झाल्यावर सर्व मराठ्यांची एक विजयी सभा आयोजित करण्याची घोषणा मनोज जरांगे यांनी केली होती. त्यानुसार आज बोलावण्यात आलेल्या बैठकीत याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. विजयी सभा कुठे आयोजित करायची, कधी करायची यावर चर्चा होणार आहे. या बैठकीत गोदा पट्ट्यातील प्रमुख मराठा आंदोलक उपस्थित राहणार आहेत. सर्वांच्या चर्चेनंतर यावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.

Comments
Add Comment

Kolhapur Women Abuse Case : धक्कादायक! परतवाडा प्रकरणाची कोल्हापुरात पुनरावृत्ती; तरुणीवर अत्याचार करून ...

मुंबई : नाशिक आणि अमरावतीतील घटनांनंतर राज्यातील कायदा-सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त होत असतानाच आता कोल्हापूर

Vande Bharat : पुण्यात वंदे भारतचा डबा घसरला

पुणे : पुणे स्टेशनजवळ संध्याकाळी २२२२५ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसचा चौथा डबा

Land Scam : अमरावती भूखंड घोटाळ्याची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी

मुंबई : अमरावती शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आरक्षित असलेले भूखंड अन्य व्यक्तींना बेकायदेशीरपणे

Agriculture Minister Dattatray Bharne : "बोगस बियाणे ओळखण्यासाठी बियाण्यांची डीएनए फिंगर प्रिंट टेस्ट केली जाणार" : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

"बियाण्यांची डिजिटल नोंद ठेवण्यासाठी ‘साथी’ पोर्टलचा वापर बंधनकारक : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे बियाणे उत्पादक

लक्ष द्या ! लग्नपत्रिकेवर वधू-वराची जन्मतारीख टाकणे अनिवार्य होणार ? नेमकी शिफारस काय ?

लग्न म्हणजे दोन व्यक्तींचे , दोन कुटुंबाचे मिलन. पण वयोमर्यादा अपूर्ण असली तरी अनेक लग्न होतात, अर्थात बालविवाह

Crime : पत्नीचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल, मित्रावर संशय गेला; पारा चढला अन मित्रानंच मित्राचा काटा काढला

Beed Crime : बीड जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनांनी पुन्हा एकदा डोके वर काढल्याचं चित्र आहे. बीडमध्ये मैत्रीला काळिमा