मीरा भाईंदरमध्ये मराठ्यांचा गुलाल उधळत जल्लोष

  121

मीरा रोड - मनोज जरांगे पाटील गेल्या अनेक दिवसांपासून मराठ्यांना आरक्षण मिळण्यासाठी आंदोलन करत होते. या आंदोलनाची दखल घेत राज्य सरकारने मनोज जरांगे पाटलांनी केलेल्या सर्व मागण्या मान्य करून शुक्रवारी पहाटे अध्यादेश काढले. यामुळे मराठ्यांच्या लढ्याला मोठं यश मिळाल आहे.

सकल मराठा समाज, मिरा भाईंदर यांनी लढ्याला यश मिळाल्याबद्दल शनिवारी सायंकाळी ढोल ताश्याच्या तालात काशिमीरा परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या जवळ एकत्र येऊन महाराजांना अभिवादन करत एकमेकांना पेढे वाटत , गुलाल उधळत जल्लोष साजरा केला आहे.

मराठ्यांना आरक्षण मिळण्यासाठी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांनी सराटी अंतरवाली येथून पायी चालत नवी मुंबई वाशी येथे पोहोचले. त्यावेळी सरकारने मुंबई येथील आझाद मैदानावर आंदोलनासाठी येऊ नये अशी विनंती केली. जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य करत शनिवारी सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक, वाशी - नवी मुंबई या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटलांच्या उपस्थितीत विजयी सभा पार पडली आहे.

एका सामान्य घरातला सुशिक्षित तरुण प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर समाजकारणात-राजकारणात काय किमया घडवू शकतो ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे मनोज जरांगे पाटील आहेत असे मराठा समाजच्या वतीने सांगितले जात आहे. याचा आनंद साजरा करण्यासाठी सकल मराठा समाज , मीरा भाईंदर यांनीही काशी मीरा येथे कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होते.
Comments
Add Comment

हरिनामाच्या गजराने दुमदुमली श्री विठ्ठलाची पंढरी, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

आषाढी एकादशीचा आज मुख्य सोहळा, पंढरीत जमली १५ लाखांवर वैष्णवांची मांदियाळी सोलापूर(सूर्यकांत आजबे) : 'अवधे गर्जे

‘निर्मल दिंडी’च्या माध्यमातून संतांचे संदेश प्रत्यक्षात उतरविण्याचे काम-मुख्यमंत्री

मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 'निर्मल दिंडी', 'चरणसेवा' आणि 'आरोग्यवारी' उपक्रमाचा

आषाढी वारीत भक्तीचा गजर आणि स्वच्छतेचा संदेश!

पंढरपूरच्या आषाढी वारीत सुमित ग्रुपच्या स्वच्छता मोहिमेचा अनोखा संगम पंढरपूर: आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या

महाराष्ट्र हादरला! धावत्या रिक्षात अल्पवयीन मुलीचा विनयभंग

रिक्षा चालक जाफर खान सुबेदार खान अटक अकोला: महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना काही कमी होताना दिसत नाहीयेत.

फडणवीस यांनी मानले राज यांचे आभार!

मुंबई: देवेंद्र फडणवीस हे आषाढीच्या निमित्ताने आज पंढरपूरमध्ये आहेत. पंढरपुरात पत्रकारांनी प्रश्न विचारला

Amravati News : भयानक...अमरावतीत १३ फूट लांबीच्या अजगराने घेतला बकरीचा जीव

अमरावती : तालुक्यातील सुरवाडी खुर्द शेत शिवार परिसरात एका १३ फूट लांबीच्या अजगराने २० किलो वजनाची बकरी