येवल्यात मराठा आरक्षण जाहीर होताच शिवसेना व सकल मराठा समाजाच्या वतीने जल्लोष

मनोज जरांगे पाटील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नावाने जोरदार घोषणाबाजी


येवला प्रतिनिधी - तालुक्यामध्ये शिवसेना व सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षण मिळाल्याबद्दल मोठा जल्लोष साजरा करण्यात आला शहरातील विंचूर चौफुली येथे शेकडो समाज बांधव व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते येथील शिवसेनेचे तालुकाप्रमुख पांडुरंग शेळके पाटील यांच्या नेतृत्वामध्ये हा विजय चा जल्लोष साजरा करण्यात आला. याच तालुक्यामधील मराठा आरक्षणाचा सर्वाधिक मोठा लढा उभा राहिला होता त्यामुळे महाराष्ट्राचे विशेष लक्ष येवला तालुक्यावरती होते मनोज जरांगे पाटील यांच्या सभेमध्ये देखील अनेकदा येवला तालुक्याचा उल्लेख होताना आपण बघितला आहे ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या मतदारसंघ असल्यामुळे येवला तालुक्यातील मराठा आरक्षणाच्या लढ्याला मोठे महत्त्व होते. त्यामुळे या तालुक्यामध्ये सर्वाधिक मोठे आंदोलन देखील झाले आहे.

सकाळी नऊ वाजेच्या सुमारास विंचूर चौफुली येथे शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते यांनी एकच गर्दी केली सुरुवातीला मनोज तरंगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है एक मराठा लाख मराठा अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. त्यानंतर फटाक्यांची आतिषबाजी करत डीजेच्या तालावर ती पुरुष महिला व तरुण मंडळी यांनी चांगलाच ठेका धरला होता. त्यामुळे परिसरामध्ये मोठे वातावरण तयार झाले होते. या जल्लोषाच्या उपस्थितांनी प्रामाणिकपणे यांनी लढा उभारला असे मनोज जारंगे पाटील व त्या लढ्याला राजकीय वळण न देता एक काम करणारा मुख्यमंत्री म्हणून ज्यांनी या लढ्याला यश दिले असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष आभार मानले.

या जल्लोषाच्या वेळी उपस्थित असलेले येथील शिवसेनेचे तालुकाप्रमुख पांडुरंग शेळके पाटील, ज्येष्ठ नेते किशोर सोनवणे शहर प्रमुख अतुल घाटे,अमोल सोनवणे, संतोष वल्टे, प्रा.प्रवीण निकम,युवराज पाटोळे, राजेंद्र गायकवाड,मनोज गायकवाड,राजू आहेर,तात्या पाटोळे,महेश लासुरे विष्णू पवार राजेंद्र जाधव, विष्णू जाधव,महिला आघाडीच्या सुमित्रा बोठे, बबीता कोल्हे, जोती माळी,प्रिया वर्पे,सुनीता लहरे,गणेश मोरे,प्रवीण खैरणार, रामकृष्ण खोकले, शैलेश करपे, लकी गायखे,किसान बोठे मंदाताई रोठे सुभाष रोठे.यांच्यासह आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

'मनोज जारंगे पाटील यांनी प्रामाणिकपणे उभा केलेल्या मराठ्यांच्या लढ्याला आज खऱ्या अर्थाने यश मिळाले आहेत हे यश मराठा समाजातील प्रत्येक बांधवांना समर्पित केल्या जात आहे. अनेक राज्यकर्ते होऊन गेले पण कुणाची हिंमत झाली नाही ते काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करून दाखवले त्यामुळे मराठा समाज त्यांना कधीच विसरणार नाही."
-पांडुरंग शेळके पाटील.
Comments
Add Comment

Four years Degree Course : आता पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचा - नव शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी; पदवीस्तरावरच मिळणार संशोधनाची संधी

मुंबई : राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची (२०२०) अंमलबजावणी

CM Devendra Fadnavis : “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” राज्यव्यापी अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

- उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्र्यासह मंत्रिमंडळाची उपस्थिती मुंबई : जागतिक आरोग्य दिनाच्या

Transfers Of IAS Officers : राज्यातील ११ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्य शासनाने मंगळवारी प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल करत ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे (Transfers Of IAS Officers)

Export of fruits and vegetables : उपलब्ध निर्यात सुविधा केंद्रांचा प्रभावी वापर करून फळे व भाजीपाल्याची निर्यात वाढवावी - मंत्री जयकुमार रावल

मुंबई : राज्यात निर्यातक्षम फळे व भाजीपाला मोठ्या प्रमाणावर उत्पादित होतो. या पार्श्वभूमीवर उपलब्ध निर्यात

अवकाळीने झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना १२८ कोटी ६५ लाखांची मदत

जानेवारीपासून झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याची कार्यवाही सुरू मुंबई : राज्यात ऑक्टोंबर ते डिसेंबर २०२५

Chipi-Mumbai Flights चिपी–मुंबई विमानसेवा जलदगतीने सुरू करा - सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश

सकाळी व संध्याकाळी अशी दोनदा विमानसेवा देण्याबाबत विचार करण्याच्या ही दिल्या सूचना मुंबई : सिंधुदुर्ग जिल्हा