बिहारमध्ये भाजपसोबत सरकार बनवणार नितीश कुमार - सूत्र

  104

पाटणा - बिहारमध्ये(bihar) राजकीय हालचालींना मोठा वेग आला आहे. पुढील २४ तास बिहारच्या राजकारणातील महत्त्वाचे आहेत. नितीश कुमार राजीनामा देऊ शकतात. ते भाजपसोबत जात आपले सरकार बनवू शकतात. २८ जानेवारीला नितीश यांचा शपथग्रहण विधी होऊ शकतो. उपमुख्यमंत्री भाजपचे सुशील मोदी बनू शकतात.


सूत्रांच्या माहितीनुसार जदयू-भाजपसोबत आल्याने नीतीश कुमार मुख्यमंत्री बनत आहेत. तर उपमुख्यमंत्री भाजपचे सुशील मोदी असतील. असेही म्हटले जात आहे की भाजपकडून दोन उपमुख्यमंत्री बनू शकतात. विधानसभा आणि लोकसभा निवडणूक एकत्र करण्याच्या शक्यतेवर बिहारच्या भाजप नेत्यांनी समर्थनार्थ आपले मत मांडलेले नाही. सूत्रांच्या मते लोकसभेसोबतच बिहारमध्ये विधानसभा निवडणूक होणार नाही.


बिहारच्या राजकारणात झालेली हालचातल आणि नितीश कुमार भाजपसोबत जाण्याच्या चर्चांमुळे सध्या पक्ष सार्वजनिकरूपाने आपले पत्ते खोलण्यास तयार नाही. पाटणामध्ये झालेल्या राजकीय घमासानदरम्यान भाजपा अलकमानने बिहार भाजपच्या नेत्यांना बैठकीसाठी दिल्लीत बोलावले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी ही उच्चस्तरीय बैठक पार पडली. शाह यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत अमित शाह आणि जेपी नड्डा यांनी बिहार भाजप नेत्यांसोबत पावणे दोन तास विचारमंथन केले.

Comments
Add Comment

श्री दत्तात्रेयाच्या गिरनार पर्वतावर धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न

येत्या २ जुलै रोजी स्थानिक प्रशासन घेणार योग्य खबरदारी जुनागढ : गुजरातमधील जुनागड येथे असलेल्या गिरनार

"अंतराळातून भारत खूप भव्य दिसतो" अंतराळवीर शुभांशू शुक्लाने मारल्या पंतप्रधान मोदींशी गप्पा

अंतराळातील सर्वात मोठे आव्हान काय आहे? पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लासोबत संवाद नवी

मोठी बातमी: आयपीएस पराग जैन भारताचे नवे 'RAW' प्रमुख

प्रतिनिधी: भारताची परकीय गुप्तचर संस्था म्हणून जगभरातही ख्याती असलेल्या रिसर्च अँड ॲनालिसिस विंग (Research and Analysis Wing (RAW)

Local Train Derails: तामिळनाडू पॅसेंजर ट्रेन रुळाहून घसरली, प्रवाशांमध्ये गोंधळ

चित्तेरी स्थानकावरून ट्रेन सुटल्यानंतर काही वेळातच मोठा आवाज ऐकू आला चेन्नई: तामिळनाडूच्या रानीपेट जिल्ह्यात

भाजपने ३ राज्यात नेमले निवडणूक अधिकारी

नवी दिल्ली  : महाराष्ट्र, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमधील भाजपच्या संघटनात्मक निवडणुकांवर लक्ष ठेवण्यासाठी

देशभरात पुढील ७ दिवसांत मुसळधार पाऊस

नवी दिल्ली : देशभरात पुढील ७ दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्याने दिलाय.