Samruddhi highway accident : चालकाला झोप लागल्याने समृद्धी महामार्गावर भीषण अपघात

  168

तिघांचा मृत्यू तर अपघातानंतर चालक पसार


अहमदनगर : गेल्या काही दिवसांत अपघाताच्या घटनांमध्ये (Accidents) प्रचंड वाढ झाली आहे. त्यात समृद्धी महामार्गावरील (Samruddhi highway) अपघातांचे सत्र सुरुच आहे. आज पहाटेच्या सुमारास समृद्धीवर पुन्हा एकदा अपघाताची घटना घडली आहे. चालकाला झोप लागल्याने बाजूच्या कंटेनरला धडक लागल्याने हा भीषण अपघात झाला. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे.


समृद्धी महामार्गावर पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशासर पोलीस स्टेशन हद्दीत अपघाताची घटना घडली. अहमदनगरहून रायपूरकडे जाणाऱ्या खासगी टेम्पो ट्रॅव्हलची बाजूच्या कंटेनरला धडक लागल्याने हा भीषण अपघात झाला.


चालकाला पहाटे झोप लागल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अमरावती जिल्ह्यातील वाढोना शिवणी दरम्यान चॅनल १२८ वर हा अपघात घडला. यामध्ये तिघांचा मृत्यू झाला तर काही जण जखमी आहेत. अपघातातील जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अपघातानंतर चालक घटनास्थळावरून पसार झाला. या अपघाताचा पुढील तपास तळेगाव दशासर पोलीस करत आहेत.

Comments
Add Comment

मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी अमित साटम यांची निवड, पालिकेआधी भाजपचा मोठा निर्णय, कोण आहेत अमित साटम?

मुंबई पालिका निवडणुकीच्याआधी भाजपने एक मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई अध्यक्षपदी अमित साटम यांची निवड झाली आहे.

मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी, काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम, दोन दिवस पावसाचा अंदाज

मुंबई : विश्रांती घेतलेल्या पावसाने मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी केली आहे. सकाळपासून रिमझिम पावसाळा सुरुवात

मुंबईत सकाळी मुसळधार पाऊस, तासाभरात २० मिमी. पावसाची नोंद

मुंबई : मागच्या आठवड्याच्या सुरुवातीला पावसानं मुंबईला झोडपलं. यानंतर चार दिवस विश्रांती घेऊन पाऊस पुन्हा हजर

मुंबई : एकनाथ शिंदेंच्या खात्यावर मुख्यमंत्र्यांची नाराजी, बैठकीला शिंदे उपस्थित नसल्याची माहिती

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नाराजीच्या बातम्या समोर येत असताना

Health: मुलांची उंची आणि चांगले आरोग्य वाढवण्यासाठी उपयुक्त पदार्थ

मुंबई : मुलांच्या योग्य शारीरिक वाढीसाठी त्यांना योग्य आहार देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. विशेषतः त्यांची उंची

Mumbai Rain Update: चार दिवसांच्या विश्रांतीनंतर मुंबईसह उपनगरात पावसाचा पुन्हा जोर

मुंबई: बाप्पाच्या आगमनाला अवघे दोन दिवस शिल्लक असताना मुंबईसह उपनगरात पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली