Samruddhi highway accident : चालकाला झोप लागल्याने समृद्धी महामार्गावर भीषण अपघात

तिघांचा मृत्यू तर अपघातानंतर चालक पसार


अहमदनगर : गेल्या काही दिवसांत अपघाताच्या घटनांमध्ये (Accidents) प्रचंड वाढ झाली आहे. त्यात समृद्धी महामार्गावरील (Samruddhi highway) अपघातांचे सत्र सुरुच आहे. आज पहाटेच्या सुमारास समृद्धीवर पुन्हा एकदा अपघाताची घटना घडली आहे. चालकाला झोप लागल्याने बाजूच्या कंटेनरला धडक लागल्याने हा भीषण अपघात झाला. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे.


समृद्धी महामार्गावर पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशासर पोलीस स्टेशन हद्दीत अपघाताची घटना घडली. अहमदनगरहून रायपूरकडे जाणाऱ्या खासगी टेम्पो ट्रॅव्हलची बाजूच्या कंटेनरला धडक लागल्याने हा भीषण अपघात झाला.


चालकाला पहाटे झोप लागल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अमरावती जिल्ह्यातील वाढोना शिवणी दरम्यान चॅनल १२८ वर हा अपघात घडला. यामध्ये तिघांचा मृत्यू झाला तर काही जण जखमी आहेत. अपघातातील जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अपघातानंतर चालक घटनास्थळावरून पसार झाला. या अपघाताचा पुढील तपास तळेगाव दशासर पोलीस करत आहेत.

Comments
Add Comment

महापालिका आयुक्तपदी नियुक्ती होताच आश्विनी भिडे यांनी घेतला धाडसी निर्णय

ई-ऑफिस,पेपरलेस करण्याचे सर्व खात्यांना दिले आदेश मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी

पश्चिम रेल्वेवर आज वांद्रे येथे 'मेजर ब्लॉक'

मुंबई सेंट्रल आणि माहीम दरम्यान 'जम्बो ब्लॉक मुंबई : वांद्रे टर्मिनस आणि वांद्रे दरम्यान असलेल्या मोऱ्या

दहिसर मेट्रो आणि पॉड टॅक्सीच्या उदघाटनाची तारीख ढकलली, काय आहे कारण ?

मुंबई : मुंबईच्या लोकलवरचा भार कमी व्हावा आणि नागरिकांना सुरक्षित आणि आरामदायी प्रवास करता यावा यासाठी

शाळांना 'इंटरनॅशनल', 'ग्लोबल' नाव वापरण्यास मज्जाव!

राज्य सरकारचा मोठा निर्णय; पालकांची दिशाभूल थांबवण्यासाठी निर्बंध मुंबई : आपल्या पाल्याला 'आंतरराष्ट्रीय'

मुंबईतील प्रलंबित एलआयसी इमारतीच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होणार, शेकडो कुटुंबांना दिलासा

कॅबिनेट मंत्री श्री मंगलप्रभात लोढा यांच्या प्रयत्नांना यश, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामनजी यांची

शिवरायांच्या स्वराज्य संकल्पनेतून नव्या पिढीला ऊर्जा व दिशा मिळेल - उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई : स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३४६ व्या पुण्यतिथीनिमित्त मुंबईतील विधानभवन