Nashik ATS : नाशिकमध्ये दहशतवाद्यांना निधी पुरवल्याप्रकरणी एकाला अटक!

  75

एटीएसची मोठी कारवाई


नाशिक : गेल्या काही दिवसांत ड्रग्ज प्रकरणामुळे (Drugs Cases) नाशिक (Nashik News) चर्चेत आलं आहे. नाशिकमधून अनेकदा अवैध कारभार होत असल्याचं समोर आलं आहे. त्यातच आता नाशिकमध्ये दहशतवादविरोधी पथकाने (ATS) मोठी कारवाई केली आहे. भारतात बंदी असलेल्या दहशतवादी संघटनेला (Terrosrist organization) निधी पुरवल्याप्रकरणी एटीएसने एकाला अटक केली आहे. हुजेफ अब्दुल अजीज शेख असं या आरोपीचं नाव आहे. कोर्टाने आरोपीला ३१ जानेवारीपर्यंत एटीएस कोठडी सुनावली आहे.


नाशिकच्या तिडके कॉलनी परिसरात आरोपीच्या घरी एटीएसने झाडाझडती केली. यात ७ मोबाईल फोन्स, लॅपटॉप आणि पेन ड्राइव्ह हस्तगत करण्यात आला. संशयित हुजेब शेख सीरिया मधील राबिया उर्फ उम ओसामा या आयसिसशी संबंधित महिलेला पैसे पाठवत असल्याची एटीएसची माहिती आहे. आयसिस आणि इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनांना फंडींग आणि दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग असल्याचा त्याच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे.


आरोपी हा उच्च शिक्षित आणि अनेक खासगी कंपन्यांमध्ये भागीदार असल्याची माहिती एटीएसच्या सूत्रांनी दिली. आता एटीएसने शेखच्या साथीदारांच्या तपासासाठी कर्नाटक, बिहार, तेलंगणामध्ये आपली पथकं रवाना केली आहेत.

आरोपीला अटक करण्यात आल्यानंतर विशेष न्यायालयाकडून आरोपी शेखला ३१ जानेवारीपर्यंत एटीएस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात अधिक तपास सुरू असून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या