Eknath Shinde : लबाड लांडग्याने वाघाचे कातडे पांघरले म्हणजे तो काय वाघ होत नाही!

बाळासाहेबांचा पोशाख करणार्‍या उद्धव ठाकरेंवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची जोरदार टीका


मुंबई : अयोध्येत (Ayodhya) २२ जानेवारी रोजी भव्य असा रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा (RamLalla Pran Pratishtha) सोहळा पार पडला. ठाकरे गटाचे (Thackeray Group) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना या सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले होते, मात्र ते अयोध्येला गेले नाहीत. त्यांनी नाशिकच्या काळाराम मंदिरात (Nashik Kalaram Mandir) जाऊन पूजा केली. तसेच गोदावरीची महाआरती केली. यानंतर त्यांनी राज्य व केंद्र सरकारवर टीका केली. शिवाय नाशिकमधील या पूजेसाठी त्यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंसारखा (Balasaheb Thackeray) पोशाख केला होता. भगव्या रंगाचा कुर्ता, पांढरा पायजमा आणि गळ्यात माळा घातल्या होत्या.या सर्व प्रकारामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरेंविरोधात टीकास्त्र उपसले. 'लबाड लांडग्याने वाघाचे कातडे पांघरले म्हणजे तो काय वाघ होत नाही', अशी सणसणीत टीका मुख्यमंत्र्यांनी केली आहे.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “बाळासाहेबांसारखे भगवे कपडे आणि रुद्राक्षांच्या माळा घातल्या म्हणजे कुणाला बाळासाहेब होता येणार नाही. त्यासाठी बाळासाहेबांसारखे प्रखर विचार असावे लागतात. लबाड लांडग्यांने वाघाचे कातडे पांघरले म्हणजे तो वाघ होत नाही. त्यासाठी वाघाचे काळीज लागते. वाघ एकच आणि तो म्हणजे बाळासाहेब ठाकरे".


उद्धव ठाकरे म्हणाले होते की, आमची घराणेशाही आहे. पण ती वडिलोपार्जित घराणेशाही आहे. आम्ही ३० वर्षांत भाजपवाले झालो नाहीत, मग काँग्रेसवासी कसे होऊ असा सवाल ठाकरेंनी विचारला होता. त्यावर, चोख प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, काँग्रेसच्या ताटाखालील मांजर होऊन सत्तेसाठी, मुख्यमंत्री पदासाठी मिंधेपणा करणारे सर्वात मोठे मिंधे कोण..? ये पब्लिक है... सब जानती है!, अशी चपराक मुख्यमंत्र्यांनी लगावली.

Comments
Add Comment

BMC : नाना शंकरशेठ यांच्या स्मारक उभारणीची प्रतीक्षा संपली, महापालिका स्वनिधीतून उभारणार स्मारक

बांधकामासाठी कंत्राटदाराची अखेर निवड मुंबई (सचिन धानजी) : आधुनिक मुंबईचे शिल्पकार, शिक्षणप्रेमी आणि समाजसुधारक

BMC : नालेसफाईचे काम १०० टक्के तर मग गाळ आणि कचऱ्याचे तुडुंब नाले भरलेले कसे?

मनसेचे महापालिका गटनेते यशवंत किल्लेदार यांचा सवाल मुंबई (विशेष प्रतिनिधी): सत्ताधारी आणि प्रशासन कितीही ओरडून

BMC News : मुंबईत १,१२४ दुकानांना मराठीतील फलकांची ऍलर्जी

महिनाभरात ३५ हजारांहून अधिक दुकानांच्या तपासणीतून झाले उघड मुंबई : मराठी भाषेतील नामफलक सक्तीच्या

BMC : महापालिकेच्या किती कर्मचाऱ्यांनी अद्यापही जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नाही

स्थायी समिती सदस्याने केली विचारणा समितीपुढे माहिती सादर करण्याची केली मागणी मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई

Artificial intelligence (AI) : एआयने शोधली कंत्राटदारांची हातचलाखी

नालेसफाई कामांमध्ये कंपन्यांना ९.२५ कोटी रुपयांचा दंड मुंबई : नाले स्वच्छतेच्या कामात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI)

EL Nino : 'अल निनो'मुळे दुष्काळाचा धोका ? पाणी जपून वापरण्याचे हवामान खात्याचे आवाहन

मुंबई : भारतीय हवामान विभागाने व्‍यक्‍त केलेल्‍या अंदाजानुसार यावर्षी एल निनो परिस्थितीचा प्रभाव राहण्‍याची