Eknath Shinde : लबाड लांडग्याने वाघाचे कातडे पांघरले म्हणजे तो काय वाघ होत नाही!

बाळासाहेबांचा पोशाख करणार्‍या उद्धव ठाकरेंवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची जोरदार टीका


मुंबई : अयोध्येत (Ayodhya) २२ जानेवारी रोजी भव्य असा रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा (RamLalla Pran Pratishtha) सोहळा पार पडला. ठाकरे गटाचे (Thackeray Group) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना या सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले होते, मात्र ते अयोध्येला गेले नाहीत. त्यांनी नाशिकच्या काळाराम मंदिरात (Nashik Kalaram Mandir) जाऊन पूजा केली. तसेच गोदावरीची महाआरती केली. यानंतर त्यांनी राज्य व केंद्र सरकारवर टीका केली. शिवाय नाशिकमधील या पूजेसाठी त्यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंसारखा (Balasaheb Thackeray) पोशाख केला होता. भगव्या रंगाचा कुर्ता, पांढरा पायजमा आणि गळ्यात माळा घातल्या होत्या.या सर्व प्रकारामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरेंविरोधात टीकास्त्र उपसले. 'लबाड लांडग्याने वाघाचे कातडे पांघरले म्हणजे तो काय वाघ होत नाही', अशी सणसणीत टीका मुख्यमंत्र्यांनी केली आहे.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “बाळासाहेबांसारखे भगवे कपडे आणि रुद्राक्षांच्या माळा घातल्या म्हणजे कुणाला बाळासाहेब होता येणार नाही. त्यासाठी बाळासाहेबांसारखे प्रखर विचार असावे लागतात. लबाड लांडग्यांने वाघाचे कातडे पांघरले म्हणजे तो वाघ होत नाही. त्यासाठी वाघाचे काळीज लागते. वाघ एकच आणि तो म्हणजे बाळासाहेब ठाकरे".


उद्धव ठाकरे म्हणाले होते की, आमची घराणेशाही आहे. पण ती वडिलोपार्जित घराणेशाही आहे. आम्ही ३० वर्षांत भाजपवाले झालो नाहीत, मग काँग्रेसवासी कसे होऊ असा सवाल ठाकरेंनी विचारला होता. त्यावर, चोख प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, काँग्रेसच्या ताटाखालील मांजर होऊन सत्तेसाठी, मुख्यमंत्री पदासाठी मिंधेपणा करणारे सर्वात मोठे मिंधे कोण..? ये पब्लिक है... सब जानती है!, अशी चपराक मुख्यमंत्र्यांनी लगावली.

Comments
Add Comment

Rahul Narvekar : शिक्षक केवळ वाचायला शिकवत नाही, तर समाज घडवतो आणि वाचवतो" - राहुल नार्वेकर यांचे गौरवोद्गार

मुंबई : "शिक्षक हा केवळ अक्षरांची ओळख करून देणारा घटक नाही, तर तो खऱ्या अर्थाने समाज घडवणारा आणि संकटाच्या काळात

Mohan Bhagwat : अस्थिर जगाचा आधार केवळ भारतच; पण त्यासाठी शेवटच्या घटकाचा विकास हवा" – डॉ. मोहन भागवत

आदिवासी अस्मिता हीच देशाची ओळख"; कर्मयोगी एकल शिक्षक मेळाव्यात डॉ. मोहन भागवत यांचे प्रेरक उद्गार सत्ता नव्हे, तर

First Tribal University : विदर्भात साकारणार देशातील पहिले आदिवासी विद्यापीठ

५०० कोटींच्या प्रकल्पातून शैक्षणिक क्रांतीचे नवे पर्व मुंबई : गेल्या तीन दशकांपासून आदिवासी आणि दुर्गम भागात

BMC News : मुंबईच्या महापौर रस्ते आणि नालेसफाईच्या पाहणी मोहिमेवर

रस्ते कामांचा वेग वाढवताना बांधकामात आणि दर्जा राखण्यात हयगय नको; प्रशासनाला दिले निर्देश मुंबई : रस्त्यांची

HSC Result : बारावीचा निकाल जाहीर झाला पण टक्क्यांना लागलेली गळती कायम राहिली

मुंबई : महाराष्ट्र उच्च माध्यमिक आणि महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने बारावीची

Mumbai Crime : आधी विटेने वार, मग गळा आवळला...वांद्र्यातील ७८ वर्षीय वृद्धेची निर्घृण हत्या

मुंबई : मुंबईतील वांद्रे (पूर्व) भागात उघडकीस आलेल्या एका खळबळजनक हत्याकांडाचा छडा लावण्यात खेरवाडी पोलिसांना