भिवंडीत पाच दिवस रंगणार आगरी महोत्सव

भिवंडी(मोनिश गायकवाड): भिवंडी तालुक्यात स्थानिक भूमिपुत्र समाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आगरी समाजाच्या आगरी महोत्सवाचे आयोजन दिनांक २५ ते ३० जानेवारी दरम्यान सोनाळे येथील ग्रामपंचायत क्रीडांगणावर करण्यात आल्याची माहिती आयोजन समितीचे प्रमुख संस्थापक विशु भाऊ म्हात्रे यांनी दिली आहे .या प्रसंगी महोत्सव समितीचे अध्यक्ष दयानंद चोरघे,पदाधिकारी यशवंत सोरे,संतोष पाटील,रमेश कराळे,सुनील पाटील,रवींद्र तरे,सौ नंदिनी भोईर,मनोहर तरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.


मागील अकरा वर्षांपासून या आगरी महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असून यंदा या महोत्सवात आगरी समाजा सोबत सर्व समाजाला सोबत घेऊन हा सोहळा साजरा केला जाणार आहे अशी माहिती आयोजन समितीचे यशवंत सोरे यांनी दिली.या महोत्सवात आगरी रूढी परंपरा,पारंपरिक शेतीचे प्रदर्शन,दुर्गाडी किल्ल्याची प्रतिकृती उभारण्यात आली आहे.


या महोत्सवाची सुरवात गुरुवारी वारकरी महोत्सव दिंडी भजन कीर्तन कार्यक्रम भगवंताच्या नामस्मरणाने साजरा केला जाणार आहे.या नंतर वसंत हंकारे यांचे युवतींसाठी प्रबोधनपर व्याख्यान आयोजन केले आहे.तर स्थानिक कलावंतांच्या सांस्कृतिक कार्यक्रम, आगरी पद्धतीचे खानपान स्टॉल यांची रेलचेल या ठिकाणी असणार आहे.तर सर्व समाजातील गुणवंतांचा सन्मान या कार्यक्रमा दरम्यान केला जाणार आहे अशी माहिती यशवंत सोरे यांनी दिली आहे.

Comments
Add Comment

मुंबई लोकलमध्ये नियम कडक; मासिक पाससाठी लागू होणार 'हे' कडक नियम

मुंबई : लोकलमध्ये विनातिकिट किंवा बनावट तिकिटांचा वापर करुन प्रवास करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी रेल्वे

सिडको घरांच्या किंमतीवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाराजी; 'हे चालणार नाही, गरिबांसाठी ती घरं आहेत' बैठकीत स्पष्ट निर्देश

नागपूर: सिडको अंतर्गत बांधण्यात आलेल्या घरांच्या किंमतींमध्ये केलेल्या मोठ्या वाढीवरून निर्माण झालेल्या

जमिनीच्या अकृषिक वापरानंतर आता ‘सनद’ची अटही रद्द!

नागपूर : राज्यातील जमीन महसूल प्रक्रियेत सुलभता आणण्यासाठी राज्य सरकारने आणखी एक महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे.

मालवणीत २०१० नंतर विशिष्ट धर्मियांची लोकसंख्या २० टक्क्यांवरून ३६ टक्क्यांपर्यंत कशी वाढली? - मंत्री मंगल प्रभात लोढा यांता काँग्रेस आमदार अस्लम शेख यांना सवाल

नागपूर : मुंबईतील मालाड-मालवणी भागात गेल्या १४ वर्षांत एका विशिष्ट समाजाची लोकसंख्या २० टक्क्यांवरून ३६

चालान न भरणाऱ्या वाहनांना पेट्रोल-डिझेल मिळणार नाही ? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सभागृहात मोठी घोषणा

नागपूर: महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. आजच्या कामकाजात विधान परिषदेत नियम

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान स्थळ ते समाधी स्थळापर्यंतनवीन रस्ता निर्मितीस मान्यता

तुळापूर व वढू बुद्रुक येथील विकास आराखड्यात ग्रामस्थांच्या सूचना लक्षात घेण्यात याव्यात - मुख्यमंत्री