Ram Mandir Celebration : रामजन्माच्या उत्साहात फटाके फोडल्याने मुंबईत पुन्हा एकदा प्रदूषण!

हवेची गुणवत्ता पातळी घसरली...


मुंबई : अयोध्येच्या राम मंदिरात (Ayodhya Ram Mandir) काल रामलल्लाच्या मूर्तीची पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा (Pran Pratistha) पार पडली. यामुळे हिंदूंची (Hindu) पाचशे वर्षांची प्रतिक्षा संपली. हा अभूतपूर्व क्षण देशभरात अत्यंत आनंद आणि उत्साहात साजरा करण्यात आला. विविध ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, रामाच्या कलाकृतींचे प्रदर्शन, महाप्रसाद वाटप, महाआरती असे उपक्रम राबवण्यात आले. मात्र, काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात फटाके फोडून हा दिवस साजरा करण्यात आला. मुंबईत याचे प्रमाण जास्त होते, त्यामुळे मुंबईत पुन्हा एकदा प्रदूषणाची (Pollution) पातळी घसरली आहे.


गेल्या वर्षी दिवाळीच्या काळात मुंबईच्या हवेची गुणवत्ता पातळी (Air Quality Index)अत्यंत घसरली होती, हवेचा निर्देशांक अतिधोकादायक पातळीपर्यंत पोहोचला होता. अवकाळी पावसामुळे हे प्रदूषण आटोक्यात येण्यास मदत झाली होती. मात्र, आता मुंबईकर मोकळा श्वास घेतात तोच पुन्हा एकदा मुंबईची हवा प्रदूषित झाली आहे. काल ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर फोडण्यात आलेल्या फटाक्यांमुळे हवेच्या गुणवत्ता पातळीचा निर्देशांक १२३ वर पोहोचला आहे, जो हवा खराब असल्याचे दर्शवतो.


मुंबईतील PM2.5 वायू प्रदूषणामुळे १ जानेवारी २०२१ पासून अंदाजे १४ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील सध्याचे PM2.5 चे प्रमाण जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) २४ तास हवा गुणवत्ता मार्गदर्शक तत्त्वे मूल्यांद्वारे शिफारस केलेल्या मर्यादेपेक्षा तीनपट जास्त आहे. त्यामुळे मुंबईकरांना पुन्हा एकदा काळजी घेणं गरजेचं आहे.

Comments
Add Comment

महापुरुषांची नावे संक्षिप्त घेणाऱ्यांवर कारवाई करा; शिवसेना नगरसेवकांची मागणी

मुंबई: मुंबई महापालिकेच्या वतीने जोगेश्वरी रुग्णालयाचे नामकरण हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब

महापालिका शाळांमधील न्युट्रीबार वादात; मध्यान्ह भोजनात इस्कॉनच्या खिचडीची झाली मागणी

मुंबई: मुंबई महापालिका शाळांमधील मुलांना पोषक आहारांतर्गत देण्यात येणाऱ्या न्युट्रीबारच्या वाटपाबाबत आता

मुंबईतील टँकर माफियांची लॉबी नष्ट करा; महापालिका सभागृहात सर्वच नगरसेवकांची एकमुखी मागणी

मुंबई: मुंबईत सध्या पाण्याची काही भागांमध्ये समस्या निर्माण झाली असून ही टंचाई फक्त आणि फक्त टँकर माफियांसाठी

मुंबईचा पश्चिम आणि पूर्व द्रुतगती महामार्ग पावसाळ्यापूर्वी समतल करा; उपमहापौरांची आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी

मुंबई: मुंबई महानगरातील रस्त्यांची स्थिती अधिक सुधारण्यासाठी पश्चिम व पूर्व द्रुतगती महामार्ग तसेच प्रमुख

महापालिकेच्यावतीने मुंबई क्लीन लीग स्पर्धा; स्वच्छता विषयक स्पर्धेच्या नोंदणीचा अक्षय कुमार यांच्या उपस्थितीत शुभारंभ

मुंबई: मुंबई अधिक स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याच्या अनुषंगाने, महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने

मुंबई वॉटर मेट्रो जलवाहतूक प्रकल्पाला गती देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

मुंबई : "मुंबई महानगर प्रदेशात जलप्रवासी वाहतुकीसाठी वॉटर मेट्रो प्रकल्प तीन टप्प्यात कार्यान्वित करण्यात