चिंताजनक! राज्यात १८ वर्षाखालील ३६ लाख युवक उच्च रक्तदाबाच्या विळख्यात तर ४ लाख जणांना मधुमेह

राज्यात अडीच कोटी युवकांची तपासणी, ४ कोटी ६७ लाख पुरुषांच्या तपासणीचे ध्येय


मुंबई : राज्यात गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यापासून ‘निरोगी तरूणाईचे, वैभव महाराष्ट्राचे’ या अभियानाद्वारे १८ वर्षांवरील युवकांची आरोग्यविषयक तपासणी करण्यात येत आहे. या तपासणीद्वारे आतापर्यंत राज्यात अडीच कोटी पुरूषांची तपासणी करण्यात आली असून त्याद्वारे ३६ लाख पुरूषांना उच्च रक्तदाब, (blood pressure) ४ लाख जणांना मधुमेह (diabetes) आढळून आला आहे. यामुळे, राज्य उच्च रक्तदाबाची राजधानी होऊ पाहतेय का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.


गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यापासून ‘निरोगी तरूणाईचे, वैभव महाराष्ट्राचे’ हे अभियान राज्याच्या आरोग्य विभागाने सुरू केले असून ते यावर्षी मार्च महिन्याअखेर सूरू राहणार आहे. या अभियानाद्वारे राज्यातील १८ वर्षावरील ४ कोटी ६७ लाख पुरूषांची तपासणी करण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती देताना आरोग्य खात्यातील एक वरिष्ठ अधिकारी म्हणाले की, राज्यात अडीच कोटी पुरूषांची तपासणी झाली असून त्यापैकी ३२.६६ लाख जणांना वेगवेगळया आजारांसाठी वैद्यकीय उपचार देण्यात आले आहेत. तर २७ हजार ९७४ जण छोट्या-मोठ्या शस्त्रक्रियांना सामोरे गेले.


या अभियानाद्वारे अठरा वर्षावरील प्रत्येक पुरूषाची असंसर्गजन्य आजारांबाबत तपासणी करण्याचे ध्येय आहे. यामध्ये रक्तदाब, बीएमआय, लठ्ठपणासोबत गरज पडल्यास चाचण्या जसे इसीजी, सीटीस्कॅन, एक्सरे आदी सुविधा दिल्या जाणार आहेत. तसेच ज्यांना शस्त्रक्रियांची गरज पडेल त्यांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून उपचार देण्यात येणार आहेत.


आरोग्यवर्धिनी केंद्र, उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, शहरी भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र व सामुदायिक आरोग्य केंद्र, हिंदुह्रदयसम्राट आपला दवाखाना, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, सामान्य रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, संदर्भ सेवा रुग्णालय अशा विविध स्तरावरील आरोग्य संस्थांमध्ये ही तपासणी केली जात आहे.



पुण्यात ९ लाख जणांना उच्च रक्तदाब


या अभियानाअंतर्गत पुणे विभागात ९ लाख जणांना रक्तदाब असल्याचे निदान झाले आहे. तसेच, ७५ हजार ५०० जणांना मधुमेहाचे निदान करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत.

Comments
Add Comment

Tuljabhavani Temple : चैत्र पौर्णिमा महोत्सवानिमित्त २२ तास खुलं राहणार तुळजाभवानीचं दर्शन

तुळजापूर : तुळजाभवानी देवीच्या मंदिरात यंदा विशेष दर्शन व्यवस्था करण्यात आली असून चैत्र पौर्णिमा

21 प्रवर्गातील दिव्यांगांना शासन योजनांचा लाभ

सचिव तुकाराम मुंढे मुंबई : दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, 2016 अंतर्गत निर्धारित करण्यात आलेल्या सर्व 21

नाशिकमध्ये तथागत आंबेडकरी विचारक संघाच्या वतीने अधिवेशन पार पडले; अॅड. संदीप जाधव यांच्या “बोधगया : सत्य आणि विपर्यास” पुस्तकाचे अनावरण

नाशिक : नाशिक येथे तथागत आंबेडकरी विचारक संघाच्या वतीने आयोजित भव्य अधिवेशनात अॅड. संदीप जाधव लिखित “बोधगया :

 रामनवमी भंडाऱ्यासाठी मंत्री लोढा यांच्याकडून मंडळांना गॅसची मद

गिरगावच्या ओम श्री सदगुरू साईनाथ मंडळाकडून मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे आभार धार्मिक कार्यात सहकार्याची

Ashok Kharat Case Update: खरात प्रकरणात न्यायालयात काय घडलं?, जाणून घ्या A to Z माहिती

नाशिक: अशोक खरातच्या भोंदूगिरीने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. हे प्रकरण बाहेर आल्यापासून नवनवे खुलासे

Ashok Kharat Case: अशोक खरात महिलांना कसं भुलवायचा?; तपासात धक्कादायक माहिती समोर

नाशिक: नाशिक जिल्ह्यातील अशोक खरात प्रकरणात रोज नवीन खुलासे समोर येत आहेत. अशोक खरात महिलांना टार्गेट करुन