चिंताजनक! राज्यात १८ वर्षाखालील ३६ लाख युवक उच्च रक्तदाबाच्या विळख्यात तर ४ लाख जणांना मधुमेह

  103

राज्यात अडीच कोटी युवकांची तपासणी, ४ कोटी ६७ लाख पुरुषांच्या तपासणीचे ध्येय


मुंबई : राज्यात गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यापासून ‘निरोगी तरूणाईचे, वैभव महाराष्ट्राचे’ या अभियानाद्वारे १८ वर्षांवरील युवकांची आरोग्यविषयक तपासणी करण्यात येत आहे. या तपासणीद्वारे आतापर्यंत राज्यात अडीच कोटी पुरूषांची तपासणी करण्यात आली असून त्याद्वारे ३६ लाख पुरूषांना उच्च रक्तदाब, (blood pressure) ४ लाख जणांना मधुमेह (diabetes) आढळून आला आहे. यामुळे, राज्य उच्च रक्तदाबाची राजधानी होऊ पाहतेय का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.


गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यापासून ‘निरोगी तरूणाईचे, वैभव महाराष्ट्राचे’ हे अभियान राज्याच्या आरोग्य विभागाने सुरू केले असून ते यावर्षी मार्च महिन्याअखेर सूरू राहणार आहे. या अभियानाद्वारे राज्यातील १८ वर्षावरील ४ कोटी ६७ लाख पुरूषांची तपासणी करण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती देताना आरोग्य खात्यातील एक वरिष्ठ अधिकारी म्हणाले की, राज्यात अडीच कोटी पुरूषांची तपासणी झाली असून त्यापैकी ३२.६६ लाख जणांना वेगवेगळया आजारांसाठी वैद्यकीय उपचार देण्यात आले आहेत. तर २७ हजार ९७४ जण छोट्या-मोठ्या शस्त्रक्रियांना सामोरे गेले.


या अभियानाद्वारे अठरा वर्षावरील प्रत्येक पुरूषाची असंसर्गजन्य आजारांबाबत तपासणी करण्याचे ध्येय आहे. यामध्ये रक्तदाब, बीएमआय, लठ्ठपणासोबत गरज पडल्यास चाचण्या जसे इसीजी, सीटीस्कॅन, एक्सरे आदी सुविधा दिल्या जाणार आहेत. तसेच ज्यांना शस्त्रक्रियांची गरज पडेल त्यांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून उपचार देण्यात येणार आहेत.


आरोग्यवर्धिनी केंद्र, उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, शहरी भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र व सामुदायिक आरोग्य केंद्र, हिंदुह्रदयसम्राट आपला दवाखाना, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, सामान्य रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, संदर्भ सेवा रुग्णालय अशा विविध स्तरावरील आरोग्य संस्थांमध्ये ही तपासणी केली जात आहे.



पुण्यात ९ लाख जणांना उच्च रक्तदाब


या अभियानाअंतर्गत पुणे विभागात ९ लाख जणांना रक्तदाब असल्याचे निदान झाले आहे. तसेच, ७५ हजार ५०० जणांना मधुमेहाचे निदान करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत.

Comments
Add Comment

मनोज जरांगेंची २९ ऑगस्टला 'चलो मुंबई'ची हाक

मराठा समाजाच्या विजयाचा गुलाल उधळण्याचा निर्धार जालना : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या

Electricity Price : इलेक्ट्रिक वाहनधारकांच्या खिशाला कात्री, महावितरणाकडून दरवाढ होणार?

मुंबई : पेट्रोलच्या वाढत्या किंमतीला कंटाळून अनेक वाहनधारकांनी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करायला सुरवात केली.

दोन लाखांच्या बनावट नोटासह तिघे जेरबंद ; राहुरी पोलिसांची कारवाई

राहुरी : राहुरी पोलिसांच्या पथकाने शनिवारी मध्यरात्री शहराच्या हद्दीत मोठी कारवाई करत दोन लाख रुपयांच्या २०० व

सायन पनवेल महामार्ग स्वच्छता मोहीम यशस्वी, 3500 हून श्रीसदस्यांचा सहभाग

नवी मुंबई : स्वच्छ मुंबई शुद्ध मुंबई या संकल्पनेतून नवी मुंबईकरांनी सायन - पनवेल महामार्गावर स्वच्छता मोहिम

आई एकविरा मंदिरात भाविकांना सात जुलैपासून ड्रेस कोड, तोकडे कपडे घालून आल्यास मंदिरात प्रवेश नाही

पिंपरी-चिंचवड : कोळी बांधवांची आराध्य दैवत असलेल्या आई एकविरा मंदिरात भाविकांना ड्रेस कोड बंधनकारक करण्यात आला

Pratap Sarnaik : इ-ट्रॅक्टर शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती घडवून आणेल, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा दावा

ठाणे : पर्यावरण पूरक व पैशाची बचत करणारा इ- ट्रॅक्टर कृषी क्षेत्रात (E-tractor agriculter sector) क्रांती घडवून आणेल, असे प्रतिपादन