चिंताजनक! राज्यात १८ वर्षाखालील ३६ लाख युवक उच्च रक्तदाबाच्या विळख्यात तर ४ लाख जणांना मधुमेह

  98

राज्यात अडीच कोटी युवकांची तपासणी, ४ कोटी ६७ लाख पुरुषांच्या तपासणीचे ध्येय


मुंबई : राज्यात गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यापासून ‘निरोगी तरूणाईचे, वैभव महाराष्ट्राचे’ या अभियानाद्वारे १८ वर्षांवरील युवकांची आरोग्यविषयक तपासणी करण्यात येत आहे. या तपासणीद्वारे आतापर्यंत राज्यात अडीच कोटी पुरूषांची तपासणी करण्यात आली असून त्याद्वारे ३६ लाख पुरूषांना उच्च रक्तदाब, (blood pressure) ४ लाख जणांना मधुमेह (diabetes) आढळून आला आहे. यामुळे, राज्य उच्च रक्तदाबाची राजधानी होऊ पाहतेय का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.


गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यापासून ‘निरोगी तरूणाईचे, वैभव महाराष्ट्राचे’ हे अभियान राज्याच्या आरोग्य विभागाने सुरू केले असून ते यावर्षी मार्च महिन्याअखेर सूरू राहणार आहे. या अभियानाद्वारे राज्यातील १८ वर्षावरील ४ कोटी ६७ लाख पुरूषांची तपासणी करण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती देताना आरोग्य खात्यातील एक वरिष्ठ अधिकारी म्हणाले की, राज्यात अडीच कोटी पुरूषांची तपासणी झाली असून त्यापैकी ३२.६६ लाख जणांना वेगवेगळया आजारांसाठी वैद्यकीय उपचार देण्यात आले आहेत. तर २७ हजार ९७४ जण छोट्या-मोठ्या शस्त्रक्रियांना सामोरे गेले.


या अभियानाद्वारे अठरा वर्षावरील प्रत्येक पुरूषाची असंसर्गजन्य आजारांबाबत तपासणी करण्याचे ध्येय आहे. यामध्ये रक्तदाब, बीएमआय, लठ्ठपणासोबत गरज पडल्यास चाचण्या जसे इसीजी, सीटीस्कॅन, एक्सरे आदी सुविधा दिल्या जाणार आहेत. तसेच ज्यांना शस्त्रक्रियांची गरज पडेल त्यांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून उपचार देण्यात येणार आहेत.


आरोग्यवर्धिनी केंद्र, उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, शहरी भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र व सामुदायिक आरोग्य केंद्र, हिंदुह्रदयसम्राट आपला दवाखाना, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, सामान्य रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, संदर्भ सेवा रुग्णालय अशा विविध स्तरावरील आरोग्य संस्थांमध्ये ही तपासणी केली जात आहे.



पुण्यात ९ लाख जणांना उच्च रक्तदाब


या अभियानाअंतर्गत पुणे विभागात ९ लाख जणांना रक्तदाब असल्याचे निदान झाले आहे. तसेच, ७५ हजार ५०० जणांना मधुमेहाचे निदान करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत.

Comments
Add Comment

अशोक नगरमधील पालिकेच्या मैदानाला तलावाचे स्वरूप

नागरिकांनी वारंवार तक्रार करूनही पालिकेचे दुर्लक्ष कांदिवली : कांदिवली पूर्वेला अशोक नगरमधील एकमेव असलेल्या

पुण्यात भिडे पूल दीड महिना बंद

पुणे : सदाशिवपेठेतून डेक्कन मेट्रो स्थानकात जाण्यासाठी महामेट्रोकडून भिडे पुलावरून लोखंडी पादचारी पूल

महिला सक्षमीकरणात शिक्षणाची भूमिका मोलाची

आरबीएलतर्फे विद्यार्थिनींना सायकलसह शालेय साहित्याचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे

ज्ञानेश्‍वर माउलींचा पालखी प्रस्थान सोहळा यंदाच्या वर्षी रात्री ८ वाजता

पुणे : आषाढी वारीतील संत ज्ञानेश्‍वर माउलींचा पालखी प्रस्थान सोहळा यंदाच्या वर्षी रात्री आठ वाजता होणार आहे.

कोकण रेल्वे मुंबई-मडगाव मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी मुंबई मडगाव मार्गावर धावणार आहे. या गाडीचे आरक्षण

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात होणार!

येत्या सप्टेंबर -ऑक्टोबर महिन्यात मतदान निवडणूक खर्चात वाढ करण्याबाबतही विचार राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली