लालबागचा राजा मंडळाला मिळाले अयोध्येचे निमत्रंण

मुंबई : अयोध्येत रामलल्लांच्या अभिषेकासाठी श्री रामजन्मभूमी ट्रस्टने या सोहळ्यासाठी देश-विदेशातल्या दिग्गजांना निमंत्रणे पाठवली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अध्यक्ष मोहन भागवत या तिघांच्या प्रमुख उपस्थितीत मंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे.


मंदिर समितीने केंद्रीय मंत्रिमंडळातील अनेक मंत्री, अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, मोठे नेते, राम मंदिरासाठी आंदोलन करणारे कारसेवक, खेळाडू, कलाकार आणि साधू-संतांसह मुंबईतल्या लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळालाही या सोहळ्याचे निमंत्रण पाठवले आहे.


लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट करून या निमंत्रणाबाबतची माहिती दिली आहे. त्याचबरोबर मंडळाचे पदाधिकारी या सोहळ्यासाठी अयोध्येला रवाना झाले आहेत. मंडळाने इन्स्टाग्रामवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, लालबागच्या राजाला अयोध्येतून बोलावणे आल्याने मंडळाचे अध्यक्ष या सोहळ्यासाठी अयोध्येला रवाना झाले आहेत.

Comments
Add Comment

मुलांचे 'डिजिटल व्यसन' सुटणार! राज्य सरकारकडून तज्ज्ञांची 'टास्क फोर्स' नियुक्त; मंत्री आशिष शेलार यांची माहिती

मुंबई : मुलांमध्ये वाढत चाललेल्या डिजिटल व्यसनाबाबत आणि त्याचा होणारा दुष्परिणाम लक्षात घेता याबाबत अभ्यास

मुंबईत २७,२८ फेब्रुवारीला पीएम विश्वकर्मा प्रदर्शन व व्यापार मेळावा

मुंबई: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वदेशी उत्पादनांच्या वापराचे केलेले आवाहन तसेच पीएम विश्वकर्मा

Devendra fadanvis : मुंबईत आता 'AI' करणार प्रदूषणाचे मॉनिटरिंग; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

मुंबई : मुंबईतील वाढते वायू प्रदूषण आणि बांधकामाच्या ठिकाणी पायदळी तुडवले जाणारे नियम यावर आज विधान परिषदेत

मुंबईहून मिरा भाईंदर ते वसई-विरार दरम्यानचा प्रवास होणार सुसाट

मुंबई: मुंबई शहरातून बरीच लोक अनेक उपनगरात कामानिमित्ताने जात असतात. ज्यात मुंबई ते पालघर जाणाऱ्यांची संख्याही

मुंबई महापालिकेच्या शिक्षणविभागाच्या अर्थसंकल्पाचा आकार ४२४८ कोटींचा; शिक्षण समिती अध्यक्ष राजेश्री शिरवडकर यांना सादर केला अर्थसंकल्प

मुंबई: मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाचा स्वतंत्र अर्थसंकल्प बुधवारी सकाळी शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प ८० हजार कोटी?

मुंबई: देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महानगरपालिका चा सन २०२६-२७ या आर्थिक