मुंबईहून मिरा भाईंदर ते वसई-विरार दरम्यानचा प्रवास होणार सुसाट

मुंबई: मुंबई शहरातून बरीच लोक अनेक उपनगरात कामानिमित्ताने जात असतात. ज्यात मुंबई ते पालघर जाणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे त्या ठिकाणचा प्रवास सुखकर होण्यासाठी एमएमआरडीएने कंबर कसली आहे.



मुंबई महानगर क्षेत्राचा कायापालट होणार



जर तुम्हीही मुंबईतून वसई-विरारला जाणार आहात तर हा प्रवास आता अतिशय सोपा आणि कमी वेळात पार होणार आहे पण हे कसे आणि कधीपासून शक्य होईल ते जाणून घ्या.


सध्या दहिसर ते मिरा-भाईंदरदरम्यान सुरू असलेल्या एमएमआरडीएच्या मेट्रो ९ मार्गिकेचा विस्तार आता मिरा-भाईंदर ते वसई-विरार असा मेट्रो १३ मार्गिकेद्वारे केला जाणार आहे. अनेक वर्षे केवळ कागदावर असलेला हा प्रकल्प आता प्रत्यक्षात येण्याच्या मार्गावर आहे.



काय बदल होणार?



एमएमआरडीएच्या १६० व्या बैठकीत मेट्रो १३ च्या सुधारित आराखड्याला मान्यता देण्यात आली. नव्या आराखड्यानुसार या मार्गिकेची लांबी २५.०३ किमी असणार आहे. यापूर्वी ती २३ किमी प्रस्तावित होती. वाढती लोकसंख्या आणि भविष्यातील प्रवासीसंख्या लक्षात घेऊन मार्गात बदल करण्यात आले आहेत.



कामाला कधी होणार सुरुवात?



आता हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठवला जाणार आहे. मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.



कोणत्या प्रवाशांना फायदा होणार?



मेट्रो २, २बी, ९ आणि १३ या मार्गिका एकमेकांशी जोडल्या गेल्यास मानखुर्द ते वसई-विरार असा सलग मेट्रो प्रवास शक्य होणार आहे. त्यामुळे वसई-विरारकरांचे मेट्रोचे स्वप्न लवकरच पूर्ण होण्याची आशा निर्माण झाली आहे.

Comments
Add Comment

Arun Datte : गुरुत्वाकर्षणालाही चकवणारी कला!

मूर्तिकार अरुण दत्ते या वर्षी काय नवा 'बॅलन्स' साधणार ? मुंबई : गणेशोत्सवाचे वेध सर्वत्र लागले असून यंदाच्या

Makarand Jadhav-Patil : नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना ८६.६५ कोटींची मदत; मंत्री मकरंद जाधव-पाटील

नाशिक विभागातील नाशिक, अहिल्यानगर व जळगाव जिल्ह्यांसाठी शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई : “खरीप २०२५ मध्ये

Hasan Mushrif : किडनी, यकृत प्रत्यारोपणाच्या सुविधा शासकीय रुग्णालयांत वाढविण्यावर भर द्या; वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई : राज्यातील गरजू रुग्णांना किडनी व यकृत प्रत्यारोपणाची सुविधा शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून

Bharat Gogawale : ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कामांना गती द्या; मंत्री भरत गोगावले

मुंबई : ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरजू नागरिकांना अधिकाधिक रोजगार उपलब्ध करून

Prabhadevi Water Pipeline : प्रभादेवीत एलफिन्स्टन पुलाजवळ जलवाहिनी फुटली

मुंबई : प्रभादेवीत एलफिन्स्टन पुलाजवळ जलवाहिनी फुटल्यामुळे हजारो लिटर पाणी वाहून गेले. सेनापती बापट मार्गावर ही

Arrested for throwing eggs : माझगावच्या मोरया गणपतीच्या मिरवणुकीवर अंडी फेकल्याप्रकरणी दानिश शेर खानला अटक, भायखळा पोलिसांची कारवाई

Mumbai : २३ ऑगस्ट रोजी माझगावच्या मोरया गणपती मंडळाच्या मिरवणुकीत अंडी फेकल्याच्या आरोपानंतर मुंबईच्या भायखळा