Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी आज मराठा आंदोलक निघाले मुंबईकडे!

  83

तत्पूर्वी पत्रकार परिषद घेत काय म्हणाले मनोज जरांगे?


जालना : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मराठा आंदोलक आज मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या नेतृत्वाखाली मुंबईकडे कूच करणार आहेत. आरक्षणाच्या मुद्द्यावर कुणबी प्रमाणपत्रे शोधण्याचे काम सुरु असले, तरी आरक्षणाबाबत अद्याप तोडगा निघालेला नाही. आरक्षणासाठी दिलेला अल्टिमेटम देखील संपला आहे. त्यामुळे ठरलेल्या निर्णयानुसार मनोज जरांगे आणि मराठा समाज (Maratha samaj) आज मुंबईकडे पायी रवाना होणार आहेत.


या पार्श्वभूमीवर आज सकाळी मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेतली. २६ जानेवारीपासून मनोज जरांगे मुंबईत आमरण उपोषण करणार आहेत. आमची पोरं जर मोठी करायची असतील तर आज मुंबईला जाण्यापासून पर्याय नाही. आरक्षण मुंबईतच आहे. यावेळी मनोज जरांगे यांच्या डोळ्यात अश्रू आले. मी असेन की नाही माहित नाही पण मराठ्यांना आरक्षण मिळालं हवं, असं मनोज जरांगे म्हणाले.


जरांगे म्हणाले, मराठा समाजातील पोरांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहा, ही पोरं मुंबईच्या दिशेने निघाली आहेत. मायबाप मराठ्यांना विनंती आहे, २६ तारखेला मुंबईला राज्यातील सर्व मराठ्यांनी मुंबईत यावं. माझं शरीर मला साथ देत नाही. मी असेन किंवा नसेन पण मला माहित नाही पण समाजाची एकजूट फुटू देऊ नका. सरकारला ७ महिने वेळ दिला आता मुंबईत गेल्याशिवाय पर्याय नाही. आम्ही दोन ते तीन खिंडा लढवणार आहोत. मुंबईत मराठ्यांचा कोटींचा आकडा दिसेल. शेवटची लढाई आहे. त्यामुळे सर्व मराठ्यांनी घराबाहेर पडा. छातीवर गोळ्या पडल्या तरी मी आता मागे हटणार नाही, असं मनोज जरांगे म्हणाले.



पुन्हा एकदा आमरण उपोषण करणार


आंतरवाली सराटीतूनच मी उपोषण करत निघणार आहे. सरकार मराठ्यांना वेठीस धरत असलेत तर आम्ही देखील आता मागे हटणार आहे. मराठ्यांच्या नोंदी सापडल्या तरी सरकार आरक्षण देत नसेल तर लढावं लागेल. उपोषणामुळे शरीर आता साथ देत नाही. पण तुम्ही विचार मरु देऊ नका. आता आरक्षण देऊन पोरांच्या डोक्यावर गुलाल टाकायचं आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबच चर्चा होते पण आरक्षण मिळत नाही. सर्वांनी शांततेत आंदोलन करावे, कोणी उद्रेक,जाळपोळ केली तर पोलिसांच्या स्वाधीन करा, असं मनोज जरांगे म्हणाले.



मनोज जरांगे आपल्या भूमिकेवर ठाम


मनोज जरांगे यांच्या मुंबई आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारडून त्यांचे आंदोलन थांबवण्यासाठी अनेक प्रयत्न झाले. अनेकदा सरकारच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली. बच्चू कडू यांच्या मार्फत देखील सरकारने जरांगे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, मनोज जरांगे आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे पाहायला मिळत आहे. सरकारच्या दारात मरण आले तरीही चालेल पण आपण मुंबईला जाणारच आणि मराठा आरक्षण मिळवणारच असे जरांगे म्हणाले आहेत.

Comments
Add Comment

कोकण रेल्वे मुंबई-मडगाव मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी मुंबई मडगाव मार्गावर धावणार आहे. या गाडीचे आरक्षण

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात होणार!

येत्या सप्टेंबर -ऑक्टोबर महिन्यात मतदान निवडणूक खर्चात वाढ करण्याबाबतही विचार राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली

महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु -

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात किसान क्रेडिट योजना लाखो शेतकऱ्यांसाठी ठरली जीवनवाहिनी - निर्मला सीतारामन

प्रतिनिधी: सरकारची योजना किसान क्रेडिट कार्ड (KCC) हे भारतीय शेतकऱ्यांसाठी जीवनरेखा ठरली आहे असे प्रतिपादन

Gold Silver Rate: चार दिवस सनसनाटी वाढीनंतर गुंतवणूकदारांना चालून आली संधी सोने 'इतक्या' रुपयांनी स्वस्त चांदी 'जैसे थे'

प्रतिनिधी: चार दिवसांच्या सनसनाटी वाढीनंतर सोन्याच्या दराने विश्रांती घेतली आहे. आज सराफ बाजारात सोन्याच्या

Mehul Choksi Breaking : फरार उद्योगपती मेहूल चोक्सी सेबीच्या रडारवर त्यांच्या सगळ्या मालमत्ता यंत्रणेने जप्त केल्या

प्रतिनिधी: नीरव मोदीनंतर आता मेहूल चोक्सींची घेराबंदी सेबीने केली आहे. सेबी (Security Exchange Board of India) एजन्सीने उद्योगपती