Health: ओला नारळ आहे आरोग्यासाठी वरदान, खाल्ल्याने मिळतील भरपूर फायदे

मुंबई: ओला नारळ आपल्या गुणांमुळे आरोग्यासाठी अतिशय वरदान असतो. तुम्ही कोणत्याही मोसमात ओल्या नारळाचे सेवन केल्यास याचे अनेक फायदे मिळतात. खासकरून थंडीच्या दिवसांत ओला नारळ शरीराला भरपूर पोषण देतात. कारण या हंगामात शरीराला अधिक एनर्जीची गरज असते. ओल्या नारळामध्ये भरपूर फायबर आणि आर्यन असतात यासोबतच कॉपर, सेलेनियम, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम असतात जे शरीराच्या वाढीसाठी अतिशय महत्त्वाचे असतात. जर तुम्ही याचे दररोज सेवन केले तर शरीर मजबूत होते आणि एनर्जी भरपूर राहते.



ओल्या नारळाचे आरोग्याला होणारे फायदे


पाचनतंत्र सुधारते


ओल्या नारळामध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते. हे खाल्ल्याने पचनाच्या समस्या निर्माण होत नाहीत. ओल्या नारळामध्ये ६० टक्क्यांपेक्षा जास्त पाणी असते. याच्या सेवनाने बद्धकोष्ठता, अॅसिडिटी, पोटात जळजळ या समस्येपासून आराम मिळतो. यामुळे पाचनशक्ती सुधारते.

वजन कमी करण्यात फायदेशीर


वजन कमी करण्यामध्ये ओला नारळ अतिशय मदतगार ठरतो. ओल्या नारळामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते हे खाल्ल्याने बराच काळ भूक लागत नाही. ओल्या नारळामध्ये ट्रायग्लिसराईड असते जे शरीरातील फॅट बर्न कऱण्यास मदत होते. ओल्या नारळाच्या सेवनाने शरीरात कोलेस्ट्रॉलचा स्तर योग्य प्रमाणात राहतो.

मेंदू तल्लख होतो


ओल्या नारळामुळे केवळ शरीरच नाही मेंदूच्या विकासातही फायदा होतो. यात आर्यन आणि व्हिटामिन बी ६ आढळते. यामुळे मेंदूचा विकास होतो. हे खाल्ल्याने मेंदू तल्लख होतो.

स्किन आणि केसांसाठी फायदेशीर


ओल्या नारळामध्ये व्हिटामिन सोबत खूप सारे अँटी ऑक्सिडंट असतात जे स्किनसोबतच केसांनाही पोषण मिळते. यात आढळणारे व्हिटामिन ई त्वचेला सुंदर, स्वस्थ आणि चमकदार बनवतात. यासोबतच यांच्या सेवनाने केसांचा रुक्षपणा आणि तुटण्याची समस्याही कमी होते.
Comments
Add Comment

फक्त एक महिना 'या' पिठाची भाकरी खा आणि गव्हाची चपाती विसरा, वजन झटपट कमी होईल

आजच्या धावपळीच्या जीवनात लोकांना स्वतःसाठी वेळ काढता येत नाही. त्यामुळे सकाळचा नाश्ता होत नाही, दुपारी जे मिळेल

युरिक ऍसिड पासून मुक्तता हवी असेल तर रोज एक कप प्या हे पेय

शरीरामध्ये युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढल्यास सांधेदुखी, सांध्यावर सूज येणे आणि चालणंही कठीण होते. 2020 मधील एका

लिंबू पाणी प्यायल्यामुळे वजन कमी होते का ? वाचा सविस्तर...

बऱ्याच लोकांना आपला दिवस एक ग्लास लिंबू सरबताने सुरू करणे आवडते. लिंबाचे पाणी शरीराला डिटॉक्स करते आणि पचन

दिवसभरात किती चपात्या खाणं योग्य? जास्त खाल्ल्यास लगेच बदला ही सवय

आपल्या दैनंदिन आहारातील चपाती म्हणजेच पोळी हा अविभाज्य भाग आहे. मग डाळ असो वा भाजी, चपातीशिवाय आपलं जेवण अपूर्ण

पिवळ्या आणि काळ्या मनुका, आरोग्याला कोणत्या जास्त फायद्याच्या ?

मुंबई : मनुका आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जातात. लोक अनेकदा सकाळी रात्री भिजवलेले मनुका खातात, ज्यामुळे

तोंड येण्याची समस्या का होते? कारणे आणि घरगुती उपाय

मुंबई : तोंड येणे म्हणजे तोंडात किंवा जिभेवर येणारे छोटेसे पण वेदनादायक फोड. ही एक सामान्य समस्या असली, तरी