Health: ओला नारळ आहे आरोग्यासाठी वरदान, खाल्ल्याने मिळतील भरपूर फायदे

  578

मुंबई: ओला नारळ आपल्या गुणांमुळे आरोग्यासाठी अतिशय वरदान असतो. तुम्ही कोणत्याही मोसमात ओल्या नारळाचे सेवन केल्यास याचे अनेक फायदे मिळतात. खासकरून थंडीच्या दिवसांत ओला नारळ शरीराला भरपूर पोषण देतात. कारण या हंगामात शरीराला अधिक एनर्जीची गरज असते. ओल्या नारळामध्ये भरपूर फायबर आणि आर्यन असतात यासोबतच कॉपर, सेलेनियम, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम असतात जे शरीराच्या वाढीसाठी अतिशय महत्त्वाचे असतात. जर तुम्ही याचे दररोज सेवन केले तर शरीर मजबूत होते आणि एनर्जी भरपूर राहते.



ओल्या नारळाचे आरोग्याला होणारे फायदे


पाचनतंत्र सुधारते


ओल्या नारळामध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते. हे खाल्ल्याने पचनाच्या समस्या निर्माण होत नाहीत. ओल्या नारळामध्ये ६० टक्क्यांपेक्षा जास्त पाणी असते. याच्या सेवनाने बद्धकोष्ठता, अॅसिडिटी, पोटात जळजळ या समस्येपासून आराम मिळतो. यामुळे पाचनशक्ती सुधारते.

वजन कमी करण्यात फायदेशीर


वजन कमी करण्यामध्ये ओला नारळ अतिशय मदतगार ठरतो. ओल्या नारळामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते हे खाल्ल्याने बराच काळ भूक लागत नाही. ओल्या नारळामध्ये ट्रायग्लिसराईड असते जे शरीरातील फॅट बर्न कऱण्यास मदत होते. ओल्या नारळाच्या सेवनाने शरीरात कोलेस्ट्रॉलचा स्तर योग्य प्रमाणात राहतो.

मेंदू तल्लख होतो


ओल्या नारळामुळे केवळ शरीरच नाही मेंदूच्या विकासातही फायदा होतो. यात आर्यन आणि व्हिटामिन बी ६ आढळते. यामुळे मेंदूचा विकास होतो. हे खाल्ल्याने मेंदू तल्लख होतो.

स्किन आणि केसांसाठी फायदेशीर


ओल्या नारळामध्ये व्हिटामिन सोबत खूप सारे अँटी ऑक्सिडंट असतात जे स्किनसोबतच केसांनाही पोषण मिळते. यात आढळणारे व्हिटामिन ई त्वचेला सुंदर, स्वस्थ आणि चमकदार बनवतात. यासोबतच यांच्या सेवनाने केसांचा रुक्षपणा आणि तुटण्याची समस्याही कमी होते.
Comments
Add Comment

तुळस सौंदर्य नव्हे, तर आरोग्याची गुरुकिल्ली!

मुंबई : तुळस आपल्या घरात पूजेला वापरली जाणारी ही पवित्र वनस्पती केवळ धार्मिकदृष्ट्या नव्हे, तर आरोग्याच्या

Health: दररोज सकाळी उठून खा २ अंजीर, फायदे ऐकल्यावर व्हाल हैराण

मुंबई: अंजीरामध्ये मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे असतात. हे केवळ एक ड्रायफ्रुट्सच नाही तर सुपरफूड आहे. खासकरून

मासिक पाळी म्हणजे प्रजननाचं लक्षण नाही; टाटा ट्रस्ट्सची जनजागृती मोहिम

मुंबई : भारतात दर महिन्याला सुमारे ३५.५ कोटी महिलांना मासिक पाळी येते. अनेक वेळा मासिक पाळी ही केवळ लैंगिक

भाजी-डाळींमध्ये आरोग्य आहे, पण अति केलं तर पचन बिघडतं!

जास्त फायबर, जास्त कॅलरी आणि अयोग्य प्रमाण या सवयी पचन, वजन आणि पोषणावर करू शकतात वाईट परिणाम. तुमचं रोजचं अन्न

Face Mask : चेहऱ्यावर झटपट चमक आणण्यासाठी वापरा स्वयंपाकघरातील एक फळभाजी!

मुंबई : आपल्या सर्वांनाच आपली त्वचा चमकदार हवी असते. यासाठी आपण बाजारात असलेल्या महागड्या उत्पादनांचाही वापर

आयोडीन युक्त मिठाचा वापर करा, आरोग्य विभागाचे आवाहन

मुंबई: जागतिक थायरॉईड दिवस दरवर्षी २५ मे रोजी साजरा केला जातो, ज्याचा उद्देश थायरॉईड रोगांबद्दल जागरूकता वाढवणे