Chhatrapati sambhaji nagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये भरधाव ट्रकने उडवल्या ३ कार, ७ दुचाकी आणि १ रिक्षा!

Share

भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू तर सहाजण जखमी

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati sambhaji nagar) काल संध्याकाळच्या सुमारास एक भीषण आणि विचित्र अपघाताची घटना (Accident News) घडली. पैठण रोडवर नक्षत्रवाडीजवळ एका भरधाव ट्रकने ३ कार, ७ दुचाकी आणि १ रिक्षा उडवली. अपघातामधील मृतांबद्दल अधिकृत माहिती समोर येऊ शकलेली नाही. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार, अपघातामध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर सहाजण जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.

धुळे सोलापूर हायवेवरून पैठण रोडवर ट्रक उतरत होता. हा रस्ता अरुंद होता. त्यात रात्रीचेही काम चालू होते. त्यामुळे सोलापूरकडून धुळ्याकडे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. त्याचवेळी ट्रक चालकाचे नियंत्रण सुटले आणि हा विचित्र अपघात झाला. उतारावरून खाली उतरत असताना भरधाव ट्रक थांबलेल्या वाहनांना उडवत गेला. संध्याकाळी सात वाजण्याच्या आसपास ही घटना घडली. या भीषण अपघातामध्ये जवळपास १० ते १५ पेक्षा अधिक वाहनचालक जखमी झाले, त्यापैकी सहाजण गंभीर अवस्थेत आहेत. त्यांच्यावर जवळील सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

या अपघातामुळे रस्त्यावर वाहने, काचांचा ढिग साचला होता. अपघात झाल्यानंतर स्थानिकांची प्रचंड गर्दी झाली. शेकडो लोक घटनास्थळी दाखल झाले होते. सर्व वाहने एकमेकांमध्ये अडकलेली असल्याने त्यांना काढण्यात बराच वेळ गेला. त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली होती. या अपघातामध्ये १ महिला जागीच ठार झाली तर तीन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Recent Posts

LSG vs DC, IPL 2025: के एल राहुलची तडाखेबंद खेळी, दिल्लीचा लखनऊवर ८ विकेटनी विजय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…

1 hour ago

हिंदी अनिवार्य नाही तर ऐच्छिक ठेवणार; शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडून भूमिका स्पष्ट

मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…

2 hours ago

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू

मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…

2 hours ago

१५ जुलैपर्यंतच्या पाणीसाठ्याचे नियोजन करावे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…

2 hours ago

मराठीचा अभिमान म्हणजे हिंदीचा द्वेष नव्हे…

इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…

3 hours ago

Pahalgam Attack: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांकडून अंदाधुंद गोळीबार, २७ ठार तर १२ गंभीर जखमी

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…

3 hours ago