छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati sambhaji nagar) काल संध्याकाळच्या सुमारास एक भीषण आणि विचित्र अपघाताची घटना (Accident News) घडली. पैठण रोडवर नक्षत्रवाडीजवळ एका भरधाव ट्रकने ३ कार, ७ दुचाकी आणि १ रिक्षा उडवली. अपघातामधील मृतांबद्दल अधिकृत माहिती समोर येऊ शकलेली नाही. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार, अपघातामध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर सहाजण जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.
धुळे सोलापूर हायवेवरून पैठण रोडवर ट्रक उतरत होता. हा रस्ता अरुंद होता. त्यात रात्रीचेही काम चालू होते. त्यामुळे सोलापूरकडून धुळ्याकडे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. त्याचवेळी ट्रक चालकाचे नियंत्रण सुटले आणि हा विचित्र अपघात झाला. उतारावरून खाली उतरत असताना भरधाव ट्रक थांबलेल्या वाहनांना उडवत गेला. संध्याकाळी सात वाजण्याच्या आसपास ही घटना घडली. या भीषण अपघातामध्ये जवळपास १० ते १५ पेक्षा अधिक वाहनचालक जखमी झाले, त्यापैकी सहाजण गंभीर अवस्थेत आहेत. त्यांच्यावर जवळील सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
या अपघातामुळे रस्त्यावर वाहने, काचांचा ढिग साचला होता. अपघात झाल्यानंतर स्थानिकांची प्रचंड गर्दी झाली. शेकडो लोक घटनास्थळी दाखल झाले होते. सर्व वाहने एकमेकांमध्ये अडकलेली असल्याने त्यांना काढण्यात बराच वेळ गेला. त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली होती. या अपघातामध्ये १ महिला जागीच ठार झाली तर तीन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…
मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…
इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…