Ram Mandir: केवळ नारळपाणी आणि जमिनीर झोपणे, श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेसाठी पंतप्रधान मोदी करतायत या नियमांचे पालन

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी २२ जानेवारीलाअयोध्येत होणाऱ्या प्राण प्रतिष्ठेच्या अनुष्ठानसाठी यम-नियमांचे कठोरतेने पालन करत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पंतप्रधान प्राण प्रतिष्ठेसाठी पाळण्यात येणाऱ्या नियमांचे कठोरपणे पालन करत आहे. यामुळे पंतप्रधान केवळ नारळपाणी पित आहेत आणि जमिनीवर कांबळं टाकून झोपत आहे. यम-नियम अनुष्ठानचा हा आठवा दिवस आहे. पंतप्रधानांनी अन्न खाल्लेले नाही.


 यम-नियमाचे पालन करणे अतिशय कठीण मानले जाते. या कठीण नियमांचे पालन करण्यासोबतच पंतप्रधान आपले सरकारी कामही करत आहे. पंतप्रधान मोदींनी गेल्या एका आठवड्यात महाराष्ट्र, केरळ आणि आंध्र प्रदेशचाही दौरा केला आहे.


 खास अनुष्टठान करत आहेत पंतप्रधान मोदी


पंतप्रधान मोदी या दिवसांत अयोध्येत बनत असलेल्या राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठेच्या आधी ११ दिवसांचे विशेष अनुष्ठान करत आहेत. त्यांनी १२ जानेवारी २०२४ला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले होते की अयोध्ये श्रीरामांच्या प्राण प्रतिष्ठेच्या कार्यक्रमासाठी केवळ ११ दिवस शिल्लक आहेत. माझे हे सौभाग्य आहे की मी याचा साक्षीदार बनू शकतो. प्राण प्रतिष्ठेआधी मी आजपासून ११ दिवसांच्या विशेष अनुष्ठानची सुरूवात करत आहे.


 प्राण प्रतिष्ठेच्या समारंभाला मुख्य यजमान असतील पंतप्रधान


 पंतप्रधान नरेंद्र मोदी आगामी २२ जानेवारीला अयोध्येतील राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठेच्या सोहळ्याचे मुख्य यजमान असणार आहे. याला पंडित लक्ष्मीकांत दीक्षित यांनी दुजोरा दिला आहे.

Comments
Add Comment

'वनतारा'चा मोठा विजय! रिलायन्सच्या ‘वनतारा’ला सर्वोच्च न्यायालयाची ‘क्लीन चिट’

नवी दिल्ली: प्राण्यांच्या खरेदी-विक्रीसंदर्भात कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप असलेल्या रिलायन्स

Railway Ticket Booking : १ ऑक्टोबरपासून बदलणार तिकीट बुकिंगचे नियम, या लोकांना होणार मोठा फायदा

मुंबई: भारतीय रेल्वेने ऑनलाइन तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये एक मोठा बदल केला आहे, जो 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू होणार

रतन टाटांचे TCS कार्यालय बंद होणार! हजारो नोकऱ्या धोक्यात

भोपाळ: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने मध्य प्रदेशातील भोपाळ येथील आपले कार्यालय १३ वर्षांनी बंद करण्याचा

BMW Car Accident: कारच्या धडकेने अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

नवी दिल्ली येथे काल रविवारी (१५ सप्टेंबर), अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागात उपसचिव म्हणून कार्यरत

वक्फ सुधारणा कायद्यातील निवडक तरतुदींना स्थगिती, जिल्हाधिकाऱ्यांना नसेल निर्णय घेण्याचा अधिकार

नवी दिल्ली : संसदेत याच वर्षी मंजूर झालेल्या वक्फ सुधारणा कायद्यातील काही तरतुदींना सोमवारी सर्वोच्च

पाचगणी ते महाबळेश्वर, युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत भारताची ७ ठिकाणे झळकली!

महाराष्ट्राचा डंका! नवी दिल्ली : देशातील ७ सुंदर ऐतिहासिक स्थळांची नावे युनेस्कोच्या संभाव्य जागतिक वारसा