Ram Mandir: केवळ नारळपाणी आणि जमिनीर झोपणे, श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेसाठी पंतप्रधान मोदी करतायत या नियमांचे पालन

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी २२ जानेवारीलाअयोध्येत होणाऱ्या प्राण प्रतिष्ठेच्या अनुष्ठानसाठी यम-नियमांचे कठोरतेने पालन करत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पंतप्रधान प्राण प्रतिष्ठेसाठी पाळण्यात येणाऱ्या नियमांचे कठोरपणे पालन करत आहे. यामुळे पंतप्रधान केवळ नारळपाणी पित आहेत आणि जमिनीवर कांबळं टाकून झोपत आहे. यम-नियम अनुष्ठानचा हा आठवा दिवस आहे. पंतप्रधानांनी अन्न खाल्लेले नाही.


 यम-नियमाचे पालन करणे अतिशय कठीण मानले जाते. या कठीण नियमांचे पालन करण्यासोबतच पंतप्रधान आपले सरकारी कामही करत आहे. पंतप्रधान मोदींनी गेल्या एका आठवड्यात महाराष्ट्र, केरळ आणि आंध्र प्रदेशचाही दौरा केला आहे.


 खास अनुष्टठान करत आहेत पंतप्रधान मोदी


पंतप्रधान मोदी या दिवसांत अयोध्येत बनत असलेल्या राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठेच्या आधी ११ दिवसांचे विशेष अनुष्ठान करत आहेत. त्यांनी १२ जानेवारी २०२४ला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले होते की अयोध्ये श्रीरामांच्या प्राण प्रतिष्ठेच्या कार्यक्रमासाठी केवळ ११ दिवस शिल्लक आहेत. माझे हे सौभाग्य आहे की मी याचा साक्षीदार बनू शकतो. प्राण प्रतिष्ठेआधी मी आजपासून ११ दिवसांच्या विशेष अनुष्ठानची सुरूवात करत आहे.


 प्राण प्रतिष्ठेच्या समारंभाला मुख्य यजमान असतील पंतप्रधान


 पंतप्रधान नरेंद्र मोदी आगामी २२ जानेवारीला अयोध्येतील राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठेच्या सोहळ्याचे मुख्य यजमान असणार आहे. याला पंडित लक्ष्मीकांत दीक्षित यांनी दुजोरा दिला आहे.

Comments
Add Comment

मध्य प्रदेशात कफ सिरप प्रकरणात ११ मुलांच्या मृत्यूनंतर डॉक्टरला अटक

मृतांच्या नातेवाइकांना ४ लाख रुपयांची मदत जाहीर भोपाळ (वृत्तसंस्था): छिंदवाडा जिल्ह्यातील पारसिया भागात कफ

जयपूर SMS हॉस्पिटलच्या ICU मध्ये भीषण आग, ६ रुग्णांचा मृत्यू

जयपूर: राजस्थानची राजधानी जयपूर येथील सवाई मानसिंह (SMS) हॉस्पिटलच्या ट्रॉमा सेंटरच्या न्यूरो आयसीयू (ICU)

दार्जिलिंगमध्ये भूस्खलनाने हाहाकार; २३ जणांचा मृत्यू, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उत्तर बंगालच्या दौऱ्यावर

दार्जिलिंग: पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग जिल्ह्यातील डोंगराळ प्रदेशात मुसळधार पावसामुळे झालेल्या भीषण

प्रतिकूल हवामानामुळे वैष्णोदेवी यात्रा ७ ऑक्टोबरपर्यंत स्थगित

जम्मू :  जम्मू आणि काश्मीरमधील तीव्र हवामानाच्या इशाऱ्यामुळे, वैष्णोदेवी यात्रा ५ ते ७ ऑक्टोबर दरम्यान स्थगित

दार्जिलिंगमध्ये मुसळधार पावसाचा कहर; भूस्खलनात १७ जणांचा मृत्यू, सिक्कीमशी संपर्क तुटला

उत्तराखंड : दार्जिलिंगमध्ये झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाले असून, आतापर्यंत १७

‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना

मुंबई : ईशान्य अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘शक्ती’ (Shakti) या चक्रीवादळाची तीव्रता वाढत असून, पुढील काही दिवसांत