Ram Mandir: केवळ नारळपाणी आणि जमिनीर झोपणे, श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेसाठी पंतप्रधान मोदी करतायत या नियमांचे पालन

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी २२ जानेवारीलाअयोध्येत होणाऱ्या प्राण प्रतिष्ठेच्या अनुष्ठानसाठी यम-नियमांचे कठोरतेने पालन करत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पंतप्रधान प्राण प्रतिष्ठेसाठी पाळण्यात येणाऱ्या नियमांचे कठोरपणे पालन करत आहे. यामुळे पंतप्रधान केवळ नारळपाणी पित आहेत आणि जमिनीवर कांबळं टाकून झोपत आहे. यम-नियम अनुष्ठानचा हा आठवा दिवस आहे. पंतप्रधानांनी अन्न खाल्लेले नाही.


 यम-नियमाचे पालन करणे अतिशय कठीण मानले जाते. या कठीण नियमांचे पालन करण्यासोबतच पंतप्रधान आपले सरकारी कामही करत आहे. पंतप्रधान मोदींनी गेल्या एका आठवड्यात महाराष्ट्र, केरळ आणि आंध्र प्रदेशचाही दौरा केला आहे.


 खास अनुष्टठान करत आहेत पंतप्रधान मोदी


पंतप्रधान मोदी या दिवसांत अयोध्येत बनत असलेल्या राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठेच्या आधी ११ दिवसांचे विशेष अनुष्ठान करत आहेत. त्यांनी १२ जानेवारी २०२४ला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले होते की अयोध्ये श्रीरामांच्या प्राण प्रतिष्ठेच्या कार्यक्रमासाठी केवळ ११ दिवस शिल्लक आहेत. माझे हे सौभाग्य आहे की मी याचा साक्षीदार बनू शकतो. प्राण प्रतिष्ठेआधी मी आजपासून ११ दिवसांच्या विशेष अनुष्ठानची सुरूवात करत आहे.


 प्राण प्रतिष्ठेच्या समारंभाला मुख्य यजमान असतील पंतप्रधान


 पंतप्रधान नरेंद्र मोदी आगामी २२ जानेवारीला अयोध्येतील राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठेच्या सोहळ्याचे मुख्य यजमान असणार आहे. याला पंडित लक्ष्मीकांत दीक्षित यांनी दुजोरा दिला आहे.

Comments
Add Comment

फॉलोअर्सच्या शर्यतीत मुलांचं बालपण धोक्यात, सुधा मूर्तींची सरकारकडे महत्त्वाची मागणी

नवी दिल्ली : इंटरनेटवर आज असंख्य रील्स आणि व्हिडिओ पाहायला मिळतात ज्यात लहान मुलांचा थेट कंटेंट म्हणून वापर केला

उड्डाणं रद्द, तिकीटदर वाढले; हवाई प्रवासातील गोंधळावर सरकारची मोठी कारवाई

नवी दिल्ली : इंडिगोच्या तांत्रिक आणि व्यवस्थापकीय अडचणींमुळे मागील काही दिवसांपासून देशात मोठे विमान प्रवास

प्रवाशांना विमान रद्दीकरणाची पूर्ण परतफेड मिळणार! इंडिगोचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून इंडिगो विमान कंपनीला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. चेक-इन प्रणालीत

सिगारेट, पान मसाला महागणार!

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतेच लोकसभेत 'आरोग्य सुरक्षेपासून राष्ट्रीय सुरक्षा

इंडिगोचा सावळा गोंधळ, नागपूरहून पुण्यासाठी निघालेले प्रवासी हैदराबादला पोहोचले

नागपूर : इंडिगो विमानांच्या बिघडण्याचे, अपघात होण्याचे आणि क्रू मेम्बर्सच्या सावळ्या गोंधळाचे सत्र हे अजूनही

मोदी पुतिन बैठकीतले महत्त्वाचे मुद्दे आणि भारत आणि रशिया दरम्यानच्या करारांची यादी जाणून घ्या एका क्लिकवर...

नवी दिल्ली : भारत आणि रशिया यांच्यातील धोरणात्मक मैत्रीला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या आणि दिल्लीत होत असलेल्या २३