Ram Mandir: केवळ नारळपाणी आणि जमिनीर झोपणे, श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेसाठी पंतप्रधान मोदी करतायत या नियमांचे पालन

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी २२ जानेवारीलाअयोध्येत होणाऱ्या प्राण प्रतिष्ठेच्या अनुष्ठानसाठी यम-नियमांचे कठोरतेने पालन करत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पंतप्रधान प्राण प्रतिष्ठेसाठी पाळण्यात येणाऱ्या नियमांचे कठोरपणे पालन करत आहे. यामुळे पंतप्रधान केवळ नारळपाणी पित आहेत आणि जमिनीवर कांबळं टाकून झोपत आहे. यम-नियम अनुष्ठानचा हा आठवा दिवस आहे. पंतप्रधानांनी अन्न खाल्लेले नाही.


 यम-नियमाचे पालन करणे अतिशय कठीण मानले जाते. या कठीण नियमांचे पालन करण्यासोबतच पंतप्रधान आपले सरकारी कामही करत आहे. पंतप्रधान मोदींनी गेल्या एका आठवड्यात महाराष्ट्र, केरळ आणि आंध्र प्रदेशचाही दौरा केला आहे.


 खास अनुष्टठान करत आहेत पंतप्रधान मोदी


पंतप्रधान मोदी या दिवसांत अयोध्येत बनत असलेल्या राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठेच्या आधी ११ दिवसांचे विशेष अनुष्ठान करत आहेत. त्यांनी १२ जानेवारी २०२४ला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले होते की अयोध्ये श्रीरामांच्या प्राण प्रतिष्ठेच्या कार्यक्रमासाठी केवळ ११ दिवस शिल्लक आहेत. माझे हे सौभाग्य आहे की मी याचा साक्षीदार बनू शकतो. प्राण प्रतिष्ठेआधी मी आजपासून ११ दिवसांच्या विशेष अनुष्ठानची सुरूवात करत आहे.


 प्राण प्रतिष्ठेच्या समारंभाला मुख्य यजमान असतील पंतप्रधान


 पंतप्रधान नरेंद्र मोदी आगामी २२ जानेवारीला अयोध्येतील राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठेच्या सोहळ्याचे मुख्य यजमान असणार आहे. याला पंडित लक्ष्मीकांत दीक्षित यांनी दुजोरा दिला आहे.

Comments
Add Comment

१ नोव्हेंबरपासून जीएसटी नोंदणी आणखी सोपी होणार

नवी दिल्ली :  केंद्र सरकारने १ नोव्हेंबरपासून वस्तू आणि सेवा कर नोंदणी आणखी सोपी करण्यासाठी नवी प्रणाली सुरू

जयंत नारळीकर यांना मरणोत्तर ‘विज्ञान रत्न’

नवी दिल्ली : विज्ञान, तंत्रज्ञान आणि तंत्रज्ञानाधारित नवोन्मेषाच्या विविध क्षेत्रांतील उत्कृष्ट आणि

'तो' एक फोन आणि आयुष्याचा शेवट, आशियाई खेळात भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या रोहिणी कलमची आत्महत्या!

मध्यप्रदेश: आशियाई खेळात भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रोहिणी कलमने गळफास घेत आत्महत्या केली आहे. रोहिणी

कुर्नूल येथे झालेल्या भीषण अपघाताचे कारण आले समोर! फॉरेन्सिक रिपोर्टच्या आधारे पोलिसांनी केली प्रकरणाची पुष्टी

हैदराबाद: आंध्र प्रदेशातील कुर्नूल येथे २४ ऑक्टोबरला झालेल्या भीषण बस अपघातप्रकरणी फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे.

मराठी, मल्याळम, तेलुगू, कन्नड… यांसारख्या ११ भाषांतून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली 'मन की बात'

 मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' याचा १२७ व भाग प्रसारित झाला. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी

भारत निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद! SIR बाबत घोषणा करणार असल्याची शक्यता

नवी दिल्ली: भारत निवडणूक आयोग सोमवार, २७ ऑक्टोबर रोजी एक पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत देशभरातील