Threatning E-mails : देशातील प्रमुख संग्रहालये बॉम्बने उडवण्याची धमकी देणाऱ्याचा लागला शोध!

अल्पवयीन मुलाकडून करवून घेतले हे कृत्य


मुंबई : मुंबईसह (Mumbai) देशातील प्रमुख संग्रहालये (Museam) बॉम्बने उडवण्याची धमकी देणारे आठ ई-मेल (Threatning E-mails) ५ जानेवारीला मिळाले होते. पोलीस आणि बॉम्बशोधक पथकाने तपास केल्यानंतर संशयास्पद काही आढळून आले नाही. संग्रहालयात अनेक बॉम्ब ठेवले जातील आणि त्याचे कधीही स्फोट होतील, असे ई-मेलमध्ये म्हटले होते. त्यानंतर मुंबई पोलिसांनी संग्रहालय परिसरात बंदोबस्त तैनात केला आणि ई-मेल पाठवणाऱ्याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला. यात पोलिसांना यश मिळाले असून आसाममधील १२ वर्षांच्या मुलाच्या ई-मेल आयडीवरून हे ई-मेल पाठवल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.


कुलाब्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय आणि वरळीतील नेहरू विज्ञान केंद्रासह देशातील प्रमुख संग्रहालयांना बॉम्बने उडवण्याची धमकी देणारे आठ ई-मेल पाठवण्यात आले होते. याप्रकरणी मुंबईत गुन्हा दाखल करुन मुंबई पोलीस सायबर विभागाकडून शोधमोहीम सुरु करण्यात आली. त्यात व्हिडीओ गेम खेळताना अनोळखी व्यक्तीने १२ वर्षांच्या मुलाला फसवून त्याच्याकडून हा ई-मेल तयार करून घेतल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले.


या प्रकाराची माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या पथकाने आसामामध्ये जाऊन त्या मुलाकडून याबाबतची महिती घेतली. मुलाने दिलेल्या माहितीनुसार, व्हिडीओ गेम खेळताना मुख्य आरोपी या मुलाच्या संपर्कात राहत होता. ‘डिस्कॉर्ट’ या व्हिडिओ गेम खेळणाऱ्यांमध्ये प्रचलित असलेल्या प्लॅटफॉर्मवरून दोघेही एकमेकांच्या संपर्कात होते. त्या व्यक्तीने १२ वर्षांच्या मुलाकडून हा ई-मेल आयडी तयार करून घेतल्याचे सांगितले. या प्रकरणी पोलिसांची कारवाई सुरु आहे व मुख्य आरोपीचा शोध घेतला जात आहे.

Comments
Add Comment

कांदळवन क्षेत्रात अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, झेप्टोची बेकायदा गोदामे

आमदार संजय उपाध्याय यांचा गंभीर आरोप; पाहणीसाठी गेलेल्या लोकप्रतिनिधींना बाऊन्सर्सकडून दमदाटी मुंबई : मुंबईची

मानखुर्दचा SMS एन्व्होक्लीनचा भस्मीकरण प्रकल्प २१ महिन्यांत हलविणार

मुंबई : मानखुर्द व शिवाजीनगर भागातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेऊन मानखुर्द शिवाजी विधानसभा क्षेत्रातील

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी कॅनडाचे तंत्रज्ञान महाराष्ट्रात वापरणार

मुंबई : महाराष्ट्रातील शेतीला आधुनिकतेची जोड देण्यासाठी राज्य सरकारने आता जागतिक स्तरावर पावले उचलली आहेत. कृषी

भूमि अभिलेख विभागाचा सुधारित आकृतीबंध मंजूर, नव्या ९९४ पदांची भर पडणार

मुंबई : जमिनीच्या कायदेशीर नोंदी वेगवान होऊन जनतेला दिलासा देण्यासाठी राज्याच्या भूमिअभिलेख विभागाचा

अवैध गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांवर सरकारचा बडगा

३१ मार्चपर्यंत दंडवसुलीचे आदेश; सुनावणीनंतर १५ दिवसांच्या आत वसुलीची प्रक्रिया मुंबई : राज्यातील अवैध गौण खनिज

रस्ते बांधण्याचे काम ९० टक्के भूसंपादन झाल्यानंतरच सुरू होणार

मुंबई : भूसंपादन प्रक्रिया पूर्ण होऊन ९० टक्के जमीन प्रत्यक्ष ताब्यात आल्याशिवाय रस्त्याच्या कामाला सुरूवात